नवरात्र (चौथी माळ)

आज रविवार, ऑक्टोबर ६, २०२४ रोजीचे पंचांग आणि दिनविशेष
युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अश्विन १४ शके १९४५
सूर्योदय : ०६:३० सूर्यास्त : १८:२२
चंद्रोदय : ०९:१४ चंद्रास्त : २०:३१
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
दक्षिणायन
ऋतू : शरद्
चंद्र माह : आश्विज
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : तृतीया – ०७:४९ पर्यंत
नक्षत्र : विशाखा – ००:११, ऑक्टोबर ०७ पर्यंत
योग : प्रीति – पूर्ण रात्रि पर्यंत
करण : गर – ०७:४९ पर्यंत
द्वितीय करण : वणिज – २०:५१ पर्यंत
सूर्य राशि : कन्या
चंद्र राशि : तूळ – १७:३४ पर्यंत
राहुकाल १६:५३ ते १८:२२
गुलिक काल १५:२४ ते १६:५३
यमगण्ड १२:२६ ते १३:५५
अभिजित मुहूर्त १२:०३ ते १२:५०
दुर्मुहूर्त १६:४७ ते १७:३५
अमृत काल १४:२५ ते १६:१२
वर्ज्य ०४:३३, ऑक्टोबर ०७ ते ०६:१८, ऑक्टोबर ०७
नवरात्र (चौथी माळ) दिवस ४ – कुष्मांडा
चतुर्थीला (चौथ्या दिवशी) कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. विश्वाची सर्जनशील शक्ती मानली जाणारी, कुष्मांडा पृथ्वीवरील वनस्पतींच्या संपत्तीशी संबंधित आहे आणि म्हणूनच, दिवसाचा रंग केशरी आहे. तिला आठ हात असून वाघावर बसलेले दाखवले आहे.
संत साहित्याचे गाढे अभ्यासक रत्नाकर मंचरकर– यांचा जन्म वडनिरे, ता. पारनेर, जि. अहमदनगर येथे झाला. जून १९६६पासून रयत शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यायां-मधून त्यांनी मराठीचे अध्यापन केले. अनेक सार्वजनिक शैक्षणिक, साहित्यिक संस्थांशी ते संबंधित होते व त्यात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. जुनी नवी साहित्य मीमांसा, नवे वाङ्मयप्रवाह, तौलनिक साहित्याभ्यास ही मंचरकरांच्या अभ्यासाची क्षेत्रे होत. विविध नियतकालिकांतून त्यांचे लेखन प्रकाशित झाले. त्यांना विविध ग्रंथपुरस्कार व संशोधन पुरस्कार, पारितोषिके मिळाली. त्यांनी संपादने, संहिता संपादने आणि सर्वांगीण संशोधनात्मक लेखन, सूत्रसंचालने इत्यादी कार्य केले. विशेषतः मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा सखोल व संशोधनात्मक अभ्यास व लेखन केले.
त्यांची ‘एकनाथ आणि मुक्तेश्वर’ (१९८५), ‘धर्मसंप्रदाय आणि मध्ययुगीन मराठी वाङ्मय’ (२०००), ‘तौलनिक साहित्याभ्यास आणि मध्ययुगीन मराठी वाङ्मय’ (२००६) ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. ‘ज्ञानेश्वरी’ अध्याय दुसरा (१९६८), सातवा (१९७२), अध्याय पहिला (१९९५) ‘सामराजकृत रुक्मिणीहरण’ (१९६९) ही त्यांची संहिता संपादने आहेत. ‘त्रिदल’ – साहित्य, समाज व शिक्षणविषयक लेखसंग्रह (१९८३), ‘वाङ्मयाचे महाविद्यालयीन अध्यापन’, ‘दु.का.संत गौरवग्रंथ’ (१९८७), ‘वीरशैव संप्रदाय’: डॉ.वा.ग.कल्याणकर गौरवग्रंथ (१९८९) ही सूत्र संपादने व ‘राजकीय तत्त्वप्रणाली- सिद्धान्त आणि व्यवहार’, अॅड. रावसाहेब शिंदे गौरवग्रंथ सहकार्याने, भोर गौरव समिती (१९८९) अशी त्यांची साहित्यसंपदा आहे.
वेगवेगळे ग्रंथ, प्रस्तावना, कोश आणि वाङ्मयीन नियतकालिकांतून त्यांचे निरनिराळ्या विषयांवरील शोधनिबंध प्रकाशित झाले. विषय व शोधनिबंध पुढीलप्रमाणे आहेत: ‘भाषा आणि भाषाविज्ञान’ (८ लेख) ‘मध्ययुगीन मराठी वाङ्मय’ (१०१ लेख); त्यांत ‘संतकवी आणि संतसाहित्य’ (३४ लेख), ‘पंडित कवी आणि पंडिती काव्य’ (२४ लेख), ‘धर्मसंप्रदाय आणि मध्ययुगीन मराठी वाङ्मय’ (९ लेख), ‘मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा तौलनिक अभ्यास’ (१३ लेख), ‘मध्ययुगीन मराठीचा साहित्यिक भूगोल’ (५ लेख), ‘मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास’ (२ लेख), ‘मध्ययुगीन मराठी वाङ्मयाच्या समीक्षकांचा परामर्श’ (१० लेख), ‘प्राचीन साहित्यविचार’ (४ लेख) तसेच ‘वाङ्मयाचे अध्यापन’ (५ लेख), ‘वाङ्मयाचे संशोधन’ (७ लेख) यावरचे लेख अभ्यासकांना, विशेषतः प्राचीन मराठी वाङ्मयाच्या अभ्यासकांना अत्यंत उपयुक्त ठरतात.
अर्वाचीन मराठी वाङ्मयातील काही विषयांवरही मंचरकरांनी प्रकाश टाकला आहे. ‘अर्वाचीन मराठी साहित्य आणि साहित्यिक’ (१९ लेख), ‘ग्रामीण-दलित-स्त्रीवादी-जनसाहित्य’ (१६ लेख), तसेच ‘अर्वाचीन मराठी साहित्यविचार आणि समीक्षा यांविषयीचे चिंतन’, ‘अर्वाचीन साहित्यविचार’ (८ लेख), ‘अर्वाचीन मराठी वाङ्मयाच्या समीक्षकांचा परामर्श’ (६ लेख) आणि ‘समीक्षा आणि समीक्षापद्धती’ (११ लेख), असे बहुविध लेख लिहून त्यांनी समीक्षकाची योगदान करण्याची भूमिका पार पाडली आहे. मराठीतील प्राचीन, अर्वाचीन साहित्याविषयी समकालीन वाङ्मयप्रवाहाच्या संदर्भात सातत्याने चिंतन-लेखन करून मंचरकरांनी मराठी वाङ्मय क्षेत्राला न्याय दिला आहे. मूलगामी संशोधन, सहृदय आकलन, चिकित्सक प्रतिपादन आणि विश्लेषक निष्कर्षण यांमुळे मंचरकरांचे संशोधनात्मक लेखनही सर्वांना आकर्षित करते आणि म्हणून वैशिष्ट्यपूर्ण ठरते.
१९४३: संत साहित्याचे गाढे अभ्यासक, साक्षेपी समीक्षक व संशोधक डॉ. रत्नाकर मंचरकर यांचा जन्म. (मृत्यू: २० फेब्रुवारी २०१२)
घटना :
१९०८: ऑस्ट्रियाने बोस्निया व हेर्झेगोविना हे प्रांत बळकावले.
१९२७: वॉर्नर ब्रदर्स चा जॅझ सिंगर हा जगातील पहिला बोलपट अमेरिकेत प्रदर्शित झाला.
१९४९: पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते खडकवासला येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (NDA) इमारतीची कोनशिला बसवण्यात आली.
१९६३: पुणे आकाशवाणी केंद्राचे सांगली हे उपकेंद्र सुरू झाले.
१९७३: इजिप्त व सीरीयाने मिळुन इस्त्राएलवर हल्ला केला.
१९८१: इजिप्तचे अध्यक्ष अन्वर सादत यांची हत्या.
१९८७: फिजी प्रजासताक बनले.
२००७: जेसन लुइस याने वल्ह्याच्या होडीतुन पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.
मृत्यू :
- १९७४: भारताचे संरक्षणमंत्री व्ही. के. कृष्ण मेनन यांचे निधन. (जन्म: ३ मे १८९६)
- १९७९: पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित इतिहासकार, लेखक, वक्ते आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू, महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांचे निधन. (जन्म: ५ ऑगस्ट १८९०)
- २००७: महाराष्ट्राचे ९ वे मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांचे निधन. (जन्म: १५ जानेवारी १९२१)
- २००७: लोकसभा सदस्य, कायदेपंडित, विद्वान, मुत्सद्दी व भारताचे इंग्लंडमधील राजदूत एल. एम. सिंघवी यांचे निधन. (जन्म: ९ नोव्हेंबर १९३१)
जन्म :
१८९३: खगोल भौतिकशास्त्रज्ञ व संसद सदस्य मेघनाद साहा यांचा जन्म. खगोलभौतिकशास्त्रज्ञ व संसदसदस्य. तार्यांच्या वातावरणाचे तापमान आणि आयनीभवन यांचा संबंध स्पष्ट करणारा सिद्धांत त्यांनी मांडला. भारताचे स्वत:चे राष्ट्रीय पंचांग त्यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आले. (मृत्यू: १६ फेब्रुवारी १९५६)
१९१२: अणूरसायन शास्त्रज्ञ, प्राध्यापक डॉ. हरी जीवन तथा एच. जे. अर्णीकर यांचा जन्म. (मृत्यू: २२ नोव्हेंबर२०००)
१९४६: अभिनेते, चित्रपट निर्माते व खासदार विनोद खन्ना यांचा जन्म. (मृत्यू: २७ एप्रिल २०१७)
१९७२: संगीतकार सलील कुलकर्णी यांचा जन्म.