बदलत्या परिस्थितीत वापरा ‘अतुल्य’ बियाणे : राहुरी कृषी विद्यापीठ

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : हवामान, पाऊसमान असे अनेक घटक बदलत आहेत, या परिस्थितीत कमी वेळेत पक्व होणारे उसाचे नवे वाण ‘अतुल्य’ची लागवड शेतकरी, साखर कारखाने यांना फायदेशीर ठरणारी आहे. त्यामुळे या वाणाची लागवड करावी, असे आवाहन राहुरीच्या म. फुले कृषी विद्यापीठाने केले आहे.

सध्या सर्वच साखर कारखान्याना उसाची टंचाई जाणवणार आहे. यासाठी येथून पुढे मध्यम पक्व होणाऱ्या आणि लवकर पक्व होणाऱ्या ऊस जातींची लागवड करून कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त ऊस गाळप करणे गरजेचे आहे.

यासाठी लवकर पक्व होणाऱ्या जातींची लागवड आणि त्यामध्येही जास्त साखर उतारा असणाऱ्या जातींची लागवड करणे जरुरीचे आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने यासाठी लवकर पक्व होणाऱ्या ऊस जातीचे बियाणे को. ११०१५ ( अतुल्य ) ची राहुरी येथे विद्यापीठ प्रक्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे.

हे बियाणे सध्या उपलब्ध आहे तरी गरजू शेतकऱ्यांनी, विशेषतः मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी या ऊस जातीची लागवड करावी, असे आव्हान विद्यापीठाकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क फोन – श्री. डी. डी. गायकवाड -82755472982 .

‘अतुल्य’ ( को ११०१५) ची गुणवैशिष्ट्ये खालीलप्रमाणे….

co 11015 Atulya info
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »