साखर विक्री प्रक़रण : बनकरांसह संचालक मंडळाची निर्दोष मुक्तता

आवडल्यास ही बातमी शेअर करा

नाशिक : निफाड साखर कारखान्याच्या साखर विक्री प्रक़रणात तानाजीराव बनकर व त्यांच्या तत्कालीन संचालक मंडळावर अनियमितता केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यावर न्यायालयाने २१ वर्षांनी निकाल दिला असून, तानाजीराव बनकर, संचालक मंडळ व साखर निर्यातदार यांना निफाड न्यायालयाने क्लीन चिट दिली आहे. निर्दोष मुक्तता केल्याने तत्कालीन संचालक मंडळाला दिलासा मिळाला आहे.

सन २००१ ते २००२ च्या दरम्यान निसाकाच्या संचालक मंडळावर ९२ हजार क्विंटल साखर विक्रीत गैरव्यवहार केल्याचे आरोप होते. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी निफाड न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. त्यामुळे सहकार व राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती. वीस वषपिक्षा अधिक काळापासून हा खटला निफाड न्यायालयात सुरू होता. प्रदीर्घ काळ सुरू असलेल्या खटल्याचा निकाल ९ जून रोजी सह मुख्य न्यायाधीश नरेंद्र जोशी यांनी दिला. अंतिम सुनावणीच्या १५ पानी निकालपत्रात त्यांनी म्हटले आहे की, साखर विक्रीत कोणतीही अनियमितता झाल्याचे दिसत नाही.

दाखल केलेल्या पत्रातील आरोपांचे कोणतेही ठोस पुरावे नाहीत. त्यामुळे तानाजीराव बनकर, तत्कालीन संचालक मंडळ व साखर निर्यातदार दीपक ठक्कर यांना निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे.

या निकालाने तानाजीराव बनकर, प्रमिला गायखे, लताबाई मोगल, नामदेव गडाख, रामदास पानगव्हाणे, संतु डुंबरे, माधव सांगळे, दौलत खालकर, सुरेश जंजाळे, शिवनाथ कडभाणे, रामकृष्ण हिरे, रमेश राजोळे, संपतराव कापडी, रमेश कराड, बबनराव जगताप, साहेबराव शिवले, लक्ष्मण सावंत यांना दिलासा मिळाला आहे. संचालक मंडळाच्या वतीने अॅड. आय. आर. रायते, अॅड. श्रीकांत रायते यांनी बाजू मांडली.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »