एफआरपी थकबाकी वसुलीसाठी कारखान्यांना नोटिसा

पुणे : गळीत हंगाम 2022-23 मध्ये पुरवठा करण्यात आलेल्या ऊसाची तोडणी आणि वाहतूक शुल्क वजा करून राज्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना 27,500 कोटी रुपये दिले आहेत.
गेल्या हंगामात एकूण 211 साखर कारखाने सुरू होते. साखर आयुक्त कार्यालयाने गेल्या हंगामातील देय रकमेसह, एकूण दिलेली रास्त व मोबदला किंमत (FRP) ची आकडेवारी नुकतीच जाहीर केली. त्यात म्हटले आहे की, तब्बल 26 कारखान्यांकडे एकूण 182 कोटी रुपयांची थकबाकी आहे. जिल्हाधिकाऱ्यांना आता ही रक्कम वसूल करण्यास सांगितले आहे.
साखर आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले, “आम्ही 17 साखर कारखान्यांना महसूल वसुली प्रमाणपत्र जारी केले असून त्यापैकी काहींनी कारवाई टाळण्यासाठी पैसे देण्याचे मान्य केले आहे.’
गेल्या हंगामात शेतकऱ्यांकडून 105 लाख टन ऊस कारखान्यांना पाठवण्यात आला होता.