पी. व्ही. नरसिंह राव

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज शनिवार, जून २८, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर आषाढ दिनांक ७, शके १९४७
सूर्योदय : ०६:०४ सूर्यास्त : १९:२०
चंद्रोदय : ०८:४५ चंद्रास्त : २२:०७
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
दक्षिणायन
ऋतु : ग्रीष्म
चंद्र माह : आषाढ़
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : तृतीया – ०९:५३ पर्यंत
नक्षत्र : पुष्य – ०६:३५ पर्यंत
योग : हर्षण – १९:१५ पर्यंत
करण : गर – ०९:५३ पर्यंत
द्वितीय करण : वणिज – २१:२८ पर्यंत
सूर्य राशि : मिथुन
चंद्र राशि : कर्क
राहुकाल : ०९:२३ ते ११:०२
गुलिक काल : ०६:०४ ते ०७:४३
यमगण्ड१४:२१ ते १६:०१
अभिजित मुहूर्त : १२:१५ ते १३:०८
दुर्मुहूर्त : ०६:०४ ते ०६:५७
दुर्मुहूर्त : ०६:५७ ते ०७:५०
अमृत काल : ०४:५८, जून २९ ते ०६:३४, जून २९
वर्ज्य : १९:२३ ते २०:५८

पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांची १९९१ मध्ये काँग्रेस पक्षाने पंतप्रधान म्हणून निवड केली, त्याच दिवशी राव यांची मुलाखत घेण्यासाठी स्पेनची महिला पत्रकार त्यांच्याकडे गेली. मुलाखत सुरू झाली. परंतु तिचे इंग्रजी ऐकून रावांना तिची अडचण समजली. त्यांनी तिला तिची मूळ भाषा कोणती, असे विचारले. त्यावर स्पॅनिश असे तिने सांगताच रावांनी तिला स्पॅनिश भाषेत उत्तरे द्यायला सुरुवात केली.

पामुलपर्ती वेंकट नरसिंहराव यांनी १९६२ पासून केंद्रात गृह, परराष्ट्र आणि संरक्षणमंत्री अशी विविध खाती सांभाळली तसेच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री पदाची धुरा सुद्धा सांभाळली.

राजकारणातून निवृत्त होण्याच्या उद्देशाने त्यांनी इ.स. १९९१ची लोकसभा निवडणुक लढवली नाही. मात्र निवडणुक प्रचारादरम्यान काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि पंतप्रधानपदाचे उमेदवार राजीव गांधी यांची हत्या झाली. त्यानंतर राव यांची काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड झाली. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यावर काँग्रेस पक्ष केंद्रात सरकार बनविण्याच्या स्थितीत होता. पक्षाचे नेते म्हणून राव यांची निवड झाली आणि त्यांनी जून २१, इ.स. १९९१ रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.
नरसिंह रावांच्या सरकारपुढे देशाची आर्थिक स्थिती सांभाळण्याचे मोठे आव्हान होते. त्यांनी मनमोहन सिंग या निष्णात अर्थतज्ञाची अर्थमंत्री म्हणून नेमणूक केली. देशाची आर्थिक स्थिती सांभाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे कर्ज मिळवणे गरजेचे होते. आणि त्यासाठी रुपयाचे अवमूल्यन आणि खतांवरील सरकारी अनुदान कमी करणे असे जनतेत लोकप्रिय नसलेले निर्णय सरकारला घ्यावे लागले.

बाबरी मशिद पाडल्यानंतरच्या प्रतिक्रियेत देशभर जातीय दंगली उसळल्या. त्यात शेकडो लोक मारले गेले. अयोध्येतील घटनांना जबाबदार ठरवून राव सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या संघटनांवर बंदी आणली. तसेच भारतीय जनता पक्ष सत्तेत असलेली राजस्थान, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेश ही राज्य सरकारे बरखास्त केली. अयोध्येतील घटना, त्यानंतर देशात झालेल्या दंगली, हिंदुत्ववादी संघटनांवर आणलेली बंदी आणि राज्य सरकार बरखास्ती या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी राव सरकारविरूद्ध दुसरा अविश्वास प्रस्ताव आणला. पण तो फेटाळला गेला.

जुलै, इ.स. १९९३मध्ये राव सरकारविरूद्ध सर्व विरोधकांनी तिसरा अविश्वास प्रस्ताव आणला. पण तो २५१ विरूद्ध २६५ मतांनी फेटाळला गेला आणि सरकार थोडक्यात बचावले.

सत्तेवरून पायउतार झाल्यावर रावांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तीन खटल्यांना सामोरे जावे लागले. त्यात अनिवासी भारतीय लखुभाई पाठक यांना फसविल्याबद्दल एक खटला होता. त्याचप्रमाणे जुलै, इ.स. १९९३मधील अविश्वास प्रस्तावाविरोधात मत देण्यासाठी झारखंड मुक्ती मोर्चाच्या खासदारांना लाच देणे आणि सेंट किट्स प्रकरण या खटल्यांना त्यांना सामोरे जावे लागले.

लखुभाई पाठक फसवणुक प्रकरणी न्यायालयाने आरोप निश्चित केल्यानंतर रावांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या जागी सीताराम केसरी यांची अध्यक्षपदी निवडणुक झाली. तसेच जानेवारी, इ.स. १९९७ मध्ये रावांना काँग्रेस संसदीय पक्ष्याच्या नेतेपदाचाही राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर ते काँग्रेस पक्षाच्या नेतृत्त्वापासून अलग पडले.

इ.स. १९९८च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पक्षाने उमेदवारी नाकारली. त्यानंतर ते सक्रीय राजकारणातून निवृत्त झाले.

१९२१: भारताचे ९वे पंतप्रधानत्री नरसिंह राव यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर, २००४)

भारतीय महिला शास्त्रज्ञ कमला सोहोनी – १९११ – तो काळच होता मुळी स्त्रियांसाठी “चूल आणि मूल” हेच फक्त कार्यक्षेत्र समजण्याचा.तेव्हा शिक्षणालाही प्राधान्य यथातथाच त्यात महिलांनी शिक्षण घेणं म्हणजे तर खरचं कर्मकठीण. पण म्हणतात नं ज्यांना आतून ओढ असते,त्यांना त्यांची आंतरीक उर्मी स्वस्थच बसू देत नाही.

       १४ सप्टेंबर १९१२,  रोजी खरचं महाराष्ट्रातील पंढरपूर ला साक्षात सरस्वतीनेच जणू जन्म घेतला.ह्या दिवशी सुप्रसिद्ध आहारतज्ञ आणि पहिल्या भारतीय महिला जीवरसायननास्त्रज्ञ मा.कमला सोहोनी ह्यांचा जन्म झाला.सुरुवातीचे शिक्षण इंदूर येथे घेतल्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठाची रसायनशास्त्र विषयातील बी.एस्सी. पदवी प्रथम वर्गात प्रथम क्रमांकात मिळविली .ही पदवी घेणाऱ्या त्या पहिल्या महिला होत. त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षणासाठी बंगळुरू येथील ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ या संस्थेकडे अर्ज केला. मात्र त्यांना ‘महिला असल्याने प्रवेश देता येत नाही’, असे कळविण्यात आले. शिक्षणाची जिद्द असल्याने त्यांनी संस्थेविरोधात प्रखर सत्याग्रह करण्याचा निर्धार बोलून दाखविला असता काही अटींवर वर्षभरासाठी त्यांना संस्थेत प्रवेश देण्यात आला. 

त्यानंतर त्यांना जीवरसायनशास्त्रात संशोधन करण्यासाठी नोबेल पारितोषिक विजेते मा.सर चंद्रशेखर व्यंकट रामन यांचा पाठिंबा मिळाला. त्यांनी तज्ञ शिक्षक श्री. श्रीनिवासय्या यांच्या सर्वांगीण मार्गदर्शनाखाली निरनिराळ्या प्राण्यांचे दूध व कडधान्ये यांतील प्रथिनांवर केलेले संशोधन मुंबई विद्यापीठाला सादर केले आणि १९३६ मध्ये एम्.एस्सी. पदवी मिळविली.सोहोनी यांना १९३७ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या ‘स्प्रिंगर रिसर्च स्कॉलरशिप’ व ‘सर मंगळदास नथूभाई फॉरिन एज्युकेशन स्कॉलरशिप’ अशा दोन शिष्यवृत्त्या उच्च शिक्षणाकरिता मिळाल्या व त्या इंग्लंडला गेल्या. केंब्रिज येथील ‘सर विल्यम ड्वान इन्स्टिट्यूट ऑफ बायो-केमिस्ट्री’ या संस्थेत त्यांना प्रसिद्ध नोबेल शास्त्रज्ञ सर फ्रेडरिक गाउलंड हॉपकिन्स यांचे मार्गदर्शन लाभले. तेथे त्यांनी वनस्पती कोशिकांच्या श्वसनक्रियेवर अभ्यास केला.

बटाट्यावर संशोधन करताना त्यांना प्रत्येक वनस्पती कोशिकांत ‘सायटोक्रोम-सी’चा शोध लागला. हे प्रथिन श्वसन रंजक असते असे आढळून आले आहे. हे मूलभूत संशोधन सोहोनी यांनी केंब्रिज विद्यापीठाला सादर करून पीएच्.डी. पदवी संपादन केली .
तोपर्यंत ‘सायटोक्रोम-सी’चे अस्तित्व प्राणिजगतातच असल्याचे ज्ञात होते, मात्र सोहोनी यांच्या संशोधनामुळे सर्व वनस्पती कोशिकांमध्येसुद्धा ते असल्याचे सिद्ध झाले. सोहोनी ह्या केंब्रिज विद्यापीठातून पीएच्.डी. पदवी मिळविणाऱ्या पहिल्या भारतीय विदुषी ठरल्या.

भारतात परत आल्यानंतर त्यांची नेमणूक दिल्लीच्या ‘लेडी हार्डिंग्ज मेडिकल कॉलेज’मध्ये प्राध्यापक पदावर झाली. त्यानंतर त्यांची दक्षिण भारतातील कुन्नूर येथे भारत सरकारच्या ‘न्यूट्रिशन रिसर्च लॅबोरेटरी’ या आहारशास्त्रात संशोधन करणाऱ्या संस्थेत सहायक संचालिका म्हणून नेमणूक झाली. तेथे त्यांनी पोषणशास्त्राचा अभ्यास करून हरभऱ्यातील जीवनसत्त्वे शोधून काढली. आहारात हरभऱ्यातील व लिंबूरसातील जीवनसत्त्वे एकत्र दिली तर रक्तवाहिन्यांचे आवरण मजबूत होते, रक्तस्राव होत नाही, हिरड्यांतून व कातडीखालून होणारे चिवट आजार थोड्याच अवधीत बरे होऊ शकतात हे त्यांनी सिद्ध केले.

       सोहोनी १९४७ मध्ये विवाहबद्ध झाल्यानंतर मुंबईत स्थायिक झाल्या. तेथे त्यांची ‘इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ या संस्थेत जीवरसायनशास्त्र विभागाच्या प्रमुखपदी नेमणूक झाली . याच संस्थेत त्या संचालक पदावर १९६९ मध्ये सेवानिवृत्त झाल्या. तेथे त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांबरोबर निरनिराळ्या कडधान्यांतील प्रथिनांवर काम करून त्यातील अ-पाचक घटक वेगळा करून दाखविला. भाताच्या तूसावर काम करून त्यापासून खाण्यायोग्य धान-आटा बनविला. तसेच नीरा या भारतभर सर्वत्र मिळणाऱ्या नैसर्गिक पेयासंबंधी अभ्यास करून त्याचे कुपोषणासाठी होणारे फायदे दाखविले.

नीरेमध्ये क, ब व फॉलिक अम्ल ही जीवनसत्त्वे, लोह आणि फॉस्फरसासारखे क्षार असल्यामुळे ते रोजच्या आहारात उपयुक्त ठरते. नीरेचा मुलांच्या प्रकृतीवर कसा परिणाम होतो हे अभ्यासण्यासाठी सोहोनी यांनी डहाणूजवळच्या आदिवासी शाळकरी मुलांची तसेच गर्भवती स्त्रियांची निवड केली. त्यांना या मुलांमध्ये हिरड्यातून रक्त येणे व त्या मऊ होणे तसेच पांडुरोग (ॲनिमिया) व खरूज मोठ्या प्रमाणात असल्याचे आढळून आले. त्या मुलांना प्रत्येक दिवशी जेवणाव्यतिरिक्त एक ग्लास नीरा पाच महिने देण्यात आली.

नीरेमधील क जीवनसत्त्वामुळे हिरड्यातून येणारे रक्त बंद झाले, तर लोहामुळे पांडुरोग बरा झाला. इतर जीवनसत्त्वांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून खरूज बरी झाली. या कार्याबद्दल त्यांना ‘सर्वोत्तम शास्त्रीय संशोधना ‘चे राष्ट्रपती पदक देऊन गौरविण्यात आले . त्यांच्या या संशोधनात सहभागी झालेल्या २५ विद्यार्थ्यांना एम्.एस्सी. व १७ विद्यार्थ्यांना पीएच्.डी. पदवी मुंबई विद्यापीठाकडून मिळाली.

 सोहोनी यांनी निवृत्तीनंतर ‘कन्झ्युमर गायडन्स सोसायटी ऑफ इंडिया’ या संस्थेमध्ये काम सुरू केले. अन्नातील भेसळीबाबत ग्राहकांना शिक्षित करण्यासाठी त्यांनी भेसळ कशी ओळखावी याची प्रात्यक्षिके दाखविली व अनेक लेख लिहिले. 

त्यांनी केलेल्या प्रदीर्घ सेवेबद्दल त्यांना मुंबईतील ‘इंडियन विमेन सायंटिस्ट ॲसोसिएशन’ या संस्थेच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात ‘पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ’ म्हणून गौरविण्यात आले, तर नवी दिल्लीच्या ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ या संस्थेने त्यांचा जीवनगौरव प्रशस्तिपत्र देऊन सन्मान केला. त्यांनी स्वयंपाकघरात तयार होणाऱ्या खाद्यपदार्थांवर संशोधन करून अनेक लेख लिहिले. या विषयावर त्यांनी आहार-गाथा (आहार व आरोग्य विचार) हे पुस्तक लिहिले.
दिनांक २८ जून १९९८ रोजी त्यांचा सन्मान होत असलेल्या कार्यक्रमात मा. सोहोनी यांचे नवी दिल्ली येथे निधन झाले.खरोखरच अशी व्यक्तीमत्व वाचली,बघितलीतं की भारल्यासारखे अचंबीत व्हायला होतं.मा.सोहोनी ह्यांना भावपूर्ण आदरांजली.

• १९९८: पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ कमला सोहोनी यांचे निधन. (जन्म: १४ सप्टेंबर १९१२)

  • घटना :
    १८४६: अॅडॉल्फ सॅक्स यांनी सॅक्सोफोन या वाद्याचे पेटंट घेतले.
    १९२६: गोटलिब डेमलर आणि कार्ल बेन्झ यांनी त्यांच्या दोन कंपन्यांचे एकत्रीकरण करून मर्सिडीज-बेंझची स्थापना केली.
    १९७२: दुसऱ्या भारत-पाक युद्धानंतर सिमला परिषदेस प्रारंभ झाला.
    १९७८: अमेरिकेतील सर्वोच्व न्यायालयाने महाविद्यालयातील प्रवेशात आरक्षण बेकायदा ठरवले.
    १९९४: विश्वकरंडक फूटबॉल स्पर्धेत रशियाच्या ओलेम सेलेन्को याने कॅमेरुनविरुद्ध पाच गोल करुन ऐतिहासिक कामगिरी केली.
    १९९७: मुष्टियुद्धात इव्हांडर होलिफील्डच्या कानाचा चावून तुकडा तोडल्यामुळे माइक टायसनला निलंबित करून होलिफील्डला विजेता घोषित करण्यात आले.
    १९९८: संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्काविषयक सार्वत्रिक जाहीरनाम्याला पन्नास वर्षे पूर्ण झाली.

मृत्यू :
• १९७२: प्रसिध्द भारतीय संख्याशास्रज्ञ तसेच इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट चे संस्थापक प्रशांतचंद्र महालनोबीस यांचे निधन. (जन्म: २९ जून १८९३)
• १९८७: व्हायोलियनवादक, गायक, संगीतज्ञ पं. गजाननबुवा जोशी यांचे निधन. (जन्म: ३० जानेवारी , १९११)
• १९९०: कवी प्रा. भालचंद खांडेकर यांचे निधन.
• १९९९: स्वातंत्र्य सैनिकांचे नेते झुंजार पत्रकार रामभाऊ निसळ यांचे निधन.
• २०००: उद्योजक विष्णू महेश्वर ऊर्फ व्ही. एम. तथा दादासाहेब जोग यांचे निधन. (जन्म: ६ एप्रिल १९२७)
• २००६: संत साहित्यकार, समीक्षक, वक्ते डॉ. निर्मलकुमार फडकुले यांचे निधन. ( जन्म : १६ नोव्हेंबर, १९२८ )
• २००९: भारतीय दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथालेखक ए. के. लोहितदास यांचे निधन. (जन्म: १० मे ,१९५५)

  • जन्म :
    १९२८: चित्रकार, महाराष्ट्राचे कला संचालक बाबूराव सडवेलकर यांचा जन्म. (मृत्यू: २३ नोव्हेंबर, २०००)
    १९३७: पद्मश्री पुरस्कार सन्मानित साहित्यिक समीक्षक, दलित साहित्य, दलित चळवळीला वाहिलेल्या अस्मितादर्श या त्रैमासिकाचे ते संस्थापक संपादक डॉ.गंगाधर पानतावणे यांचा जन्म. ( मृत्यू : २७ मार्च, २०१८ )
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »