प्रदीप भिडे

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज शनिवार, जून 7, 2025 युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर ज्येष्ठ दिनांक १७ , शके १९४७
सूर्योदय : 06:00
सूर्यास्त : 19:15
चंद्रोदय : 15:59
चंद्रास्त : 03:31, जून 08
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
उत्तरायण
ऋतु : ग्रीष्म
चंद्र माह : ज्येष्ठ
पक्षशुक्ल पक्ष
तिथिद्वादशी – पूर्ण रात्रि पर्यंत
नक्षत्रचित्रा – 09:40 पर्यंत
योगवरीयान् – 11:18 पर्यंत
करणबव – 18:03 पर्यंत
द्वितीय करणबालव – पूर्ण रात्रि पर्यंत
सूर्य राशिवृषभ
चंद्र राशितूळ
राहुकाल09:19 ते 10:58
गुलिक काल06:00 ते 07:39
यमगण्ड14:17 ते 15:56
अभिजितमुहूर्त12:11 ते 13:04
दुर्मुहूर्त06:00 ते 06:53
दुर्मुहूर्त06:53 ते 07:46
अमृत काल02:47, जून 08 ते 04:35, जून 08
वर्ज्य15:58 ते 17:46

• २००२: भारताचे उपराष्ट्रपती बसप्पा दानप्पा तथा बी. डी. जत्ती यांचे निधन. (जन्म: १० सप्टेंबर, १९१२)

१० डिसेंर १९९३- पुणे येथे स्कूलबसला सह्याद्री एक्सप्रेसची धडक लागून ३८ विद्यार्थी व शिक्षक ठार.,

३ फेब्रुवारी २००५ रोजी नागपूरपासून २० कि.मी. अंतरावर असेलल्या कन्हान येथे एका मानवरहित रेल्वे क्रॉसिंगवर वऱ्हाड्यांच्या ट्रॅक्टरला पॅसेंजरने धडक देऊन ५५ जणांचा बळी घेतला होता.

अशाच प्रकारचे अपघात जगात आणि देशातही अनेक ठिकाणी घडले. त्यामुळे या विषयावर जनजागृतीची गरज लक्षात घेऊन दरवर्षी ७ जुन हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर लेव्हल क्रॉसिंग जनजागृती दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी रेल्वे व्यवस्थापनातर्फे रेल्वे क्रॉसिंग परिसरात क्रॉसिंग ओलांडताना घ्यावयाच्या सुरक्षेविषयी जनजागृती केली जाते. यासाठी पथनाट्ये, पत्रके वाटणे, लोकांशी थेट संवाद साधणे आदी उपक्रम राबविण्यात येतात.

आज आंतरराष्ट्रीय लेव्हल क्रॉसिंग दिवस आहे.

डॉ. स.गं. मालशे – एम.ए. झाल्यावर श्री मालशे मराठीचे प्राध्यापक झाले. ‘फादर स्टीफन्सकृत ख्रिस्त पुराण’ भाषिक अभ्यास या विषयावर त्यांनी पीएच,डी केली. मराठी संशोधन पत्रिका, महाराष्ट्र साहित्य पत्रिका आदी नियतकालिकांचे ते संपादक होते.
आपल्या लेखन कारकिर्दीच्या सुरुवातीला स.गं. मालशे यांनी ‘व्यंकटेश माडगूळकर यांच्या कथा ‘, हसा आणि लठ्ठ व्हा’ ही संपादने केली. त्यांच्या ललित लेखांचा संग्रहही ‘ ‘आवडनिवड’ या नावाने प्रसिद्ध झाला.

‘नीरक्षीर’ हा त्यांच्या नाट्यविषयक लेखांचा संग्रह. या संग्रहातून पाश्चात्त्य नाट्यकृतींसंबंधी व दिग्दर्शकांसंबंधीचे लेख आहेत. कालांतराने मालशे ऐतिहासिक दृष्टीने विचार करणारे संहिताभ्यासक, संपादक व समीक्षक म्हणून ओळखले जाऊ लागले. ‘केशवसुतांच्या कवितांचे हस्तलिखित’, ‘सावरकरांच्या अप्रसिद्ध कविता’, ‘लोकहितवादीकृत जातिभेद’, ‘दोन पुनर्विवाह प्रकरणे’, स्त्री – पुरुष तुलना अशा अनेक संहितात्मक पुस्तिका त्यांनी प्रसिद्ध केल्या.

मालशे यांनी धनंजय कीर यांच्या सहकार्याने जोतिबा फुलेकृत ‘शेतकऱ्यांचा आसूड’, ‘महात्मा फुले समग्र वाङमय’, ‘झेंडूची फुले’ हे सर्व ग्रंथ संपादन करून पुनःप्रकाशात आणले. मालश्यांचे आणखी एक मोलाचे कार्य म्हणजे ऑस्टिन वाॅरेन आणी रेने’ वॆलेक यांनी लिहिलेल्या ‘थिअरी ऑफ लिटरेचर’ या पुस्तकाचा ‘साहित्य सिद्धान्त’ असा अनुवाद केला. या ग्रंथातून साहित्यसमीक्षा, साहित्य संशोधन, साहित्योतिहास, साहित्यभासाच्या पद्धती यासंबंधी चर्चा केली आहे.

याशिवाय मालशे यांनी युजीन ओ’नीलच्या ‘स्ट्रेंज इंटरल्यूड’ या नाटकाचा अनुवाद ‘सुख पाहता’ असा केला.
अध्यापक अत्रे, आगळं वेगळं, ऋणानुबंधाच्या गाठी , केशवसुतांच्या कवितांचे हस्तलिखित, चतुराईच्या गोष्टी वगैरे त्यांची साहित्य संपदा आहे.

• १९९२: मराठी वाङ्मयाचे अभ्यासक आणि संशोधक डॉ. स. ग. मालशे यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर , १९२१)

ज्येष्ठ वृत्तनिवेदक-सूत्रसंचालक प्रदीप भिडे – खणखणीत आणि बुलंद आवाज अशी त्यांची ओळख होती. . ज्या काळात डिजिटल साधन सोडा साधी २४ तास बातम्या सांगणारी वाहिनी उपलब्ध नव्हती तेव्हा प्रदीप भिडे यांनी दूरदर्शनवर बातम्या व्यवस्थित पद्धतीने पोहोचवण्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली

.मुंबई दूरदर्शन केंद्रावरून म्हणजेच आत्ताच्या ‘सह्याद्री’ वाहिनीवरून गेली चाळीसहून अधिक वर्षे ‘नमस्कार, आजच्या ठळक बातम्या’ असे सांगणारा भारदस्त आवाजाचे ज्येष्ठ वृत्तनिवेदक. १९७४ ते अगदी २०१६ पर्यंत त्यांनी दूरदर्शनसाठी वृत्तनिवेदक म्हणून काम केलं.

भाषेचे संस्कार लहानपणापासूनच घरातून झाले होते. आई व वडील दोघेही संस्कृत, मराठी व हिंदी भाषेचे शिक्षक असल्याने अभ्यास, क्रमिक पाठय़ पुस्तकांबरोबरच अन्य अभ्यासेतर पुस्तकांचे वाचन होतेच.
पण भगवद्गीतेचा पंधरावा अध्याय दररोज मोठय़ा आवाजात म्हटलाच पाहिजे, असा घरातील दंडक होता. ‘विष्णुसहस्रनाम’ही म्हटले जायचे. त्यामुळे शुद्ध व स्पष्ट शब्दोच्चार व्हायला आणि ‘आवाज’ घडायला त्याची त्यांना मोलाची मदत झाली.

विज्ञान शाखेमधून शिक्षण घेतल्यानंतर प्रदिप भिडे यांनी रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेची पदवी घेतली. प्रदिप भिडे यांनी ई मर्क आणि हिंदुस्थान लिवर या बहुराष्ट्रीय कंपन्यात काही काळ जनसपर्क अधिकारी म्हणून काम केलं. मुंबई दूरदर्शनच्या स्थापनेनंतर दोन वर्षांनी म्हणजेच १९७४ साली ते दूरदर्शनमध्ये आले.[२] भिडे यांना नाटकाचीही पार्श्वभूमी होती. त्यांनी रंगमंचावर काही नाटकांमधूनही भूमिका केल्या होत्या. अनेक व्यावसायिक जाहिरातींमध्ये त्यांनी आपल्या दमदार आवाजानं अमीट छाप उमटवली होती.

प्रदीप भिडे यांनी आतापर्यंत पाच हजारांहून अधिक जाहिराती , माहितीपट, आणि लघुपटांना त्यांनी आवाज दिला असून अनेक कार्यक्रमांचं त्यांनी सूत्रसंचालन केलं. ‘पुणे फेस्टिव्हल’च्या पहिल्या वर्षांपासून सलग सात-आठ वर्षे त्यांनीच सूत्रसंचालन केले. ‘पुणे फेस्टिव्हल’चा ‘उत्कृष्ट निवेदक’ हा पुरस्कारही त्यांना मिळाला.

त्यांच्या कामाबद्दलची निष्ठा आणि चोख काम करण्याची पद्धत सांगणारा एक किस्सा समोर येत आहे. तो दिवस होता २१ मे १९९१, जेव्हा भारतात श्रीपेरूंबदूर इथे ‘राजीव’जींची हत्त्या झाली. वृत्त संपादिका विजया जोशी यांनी भिडे यांना ‘असशील तसा त्वरीत निघून ये’, असा निरोप पाठवला. त्यावेळी राजीव यांच्या हत्येची ही बातमी मुंबईत वा-यासारखी पसरली होती. सगळी मुंबई बंद, सगळीकडे चिडीचूप वातावरण आणि स्मशान शांतता. तेव्हा भिडे स्वतः पोलिसांच्या जीपने दूरदर्शन केंद्रावर आले. सकाळी ६.३० वाजता त्यांनी बातमी वाचली. असा किस्सा सांगितलं जात आहे.

जेव्हा १९९४ चा बॉम्बस्फोट झाला त्यादिवशी साडेसात वाजता बातम्या देण्याची जबाबदारी भिडे यांची होती. झालेल्या प्रसंगाचं गांभीर्य ओळखून ते दुपारी दीड वाजताच घरातून केंद्रावर जायला निघाले. मिळेल त्या साधनाने, रेल्वेने, पायी चालत असा प्रवास (अंधेरी ते वरळी) करत ते अखेर संध्याकाळी ५ वाजता पोहोचले.

दूरदर्शनच्या ‘बातम्या’ आणि आजच्या ‘वृत्तवाहिन्या’ या विषयीही त्यांनी भाष्य केलं होतं. दूरदर्शनच्या बातम्यांची आणि वृत्तनिवेदकांची स्वत:ची अशी शैली आहे. तिथे आकांडतांडव नसते. शब्दोच्चारांवर अधिक भर असतो. प्रमाण मराठी भाषा तिथे जपली जाते. शांत, संयमित अशा त्या ‘बातम्या’ असतात. त्या उलट आजच्या वृत्तवाहिन्या ‘कर्कश’ झाल्या आहेत. वृत्तवाहिन्यांवर बातम्या पाहायच्या व ऐकायच्या पण बातमीच्या मुळाशी जायचे असेल, साधक-बाधक विश्लेषण हवे असेल तर वृत्तपत्र वाचनाला आजही पर्याय नाही.

चांगले वृत्तनिवेदक तयार होण्यासाठी आणि घडवण्यासाठी ‘वृत्तनिवेदक’ गुणवत्ता शोध स्पर्धा घेण्यात यावी. वृत्तनिवेदक किंवा सूत्रसंचालक यांच्या कामाला ‘मान्यता’ नाही. हे काम तुलनेत कमी दर्जाचे मानले जाते. अपवाद वगळता वृत्तनिवेदक/सूत्रसंचालकांना पुरस्कार दिले जात नाही, योग्य तो सन्मान मिळत नाही, याची खंत वाटते असे त्यांनी सांगितले होते.

२०२२ : दूरदर्शनचा चेहरा अशी ओळख असलेले जेष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं प्रदीर्घ आजाराने निधन .

  • घटना :
    १८९३: महात्मा गांधीं यांनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली.
    १९३८: डी. सी. ४ प्रकारच्या विमानाचे प्रथम उड्डाण.
    १९६५: अमेरिकेच्या सर्वोच्‍च न्यायालयाने परिणित दांपत्याने गर्भनिरोधक साधने वापरणे कायदेशीर ठरवले.
    १९७५: क्रिकेटच्या पहिल्या विश्वकरंडक स्पर्धेस इंग्लंडमध्येे सुरुवात झाली.
    १९७९: रशियातील कापुस्तिनयार येथून भास्कर-१ उपग्रहाचे प्रक्षेपण.
    १९८१: इस्रायलने इराकची ओसिराक परमाणू भट्टी नष्ट केली.
    १९८५: विम्बल्डन पुरुष एकेरीचे विजेतेपद १७ व्या वर्षी मिळवणारा बोरिस बेकर हा सर्वात तरुण खेळाडू बनला.
    १९९१: फिलिपाइन्स मधल्या माउंट पिनाटुबो ज्वालामुखीचा उद्रेक.
    १९९४:आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या (IMF) उपव्यवस्थापकीय संचालकपदी अर्थतज्ज्ञ प्रभाकर नार्वेकर या प्रथमच एका भारतीयाची नियुक्ती झाली.
    २००६: अल कायदाचा इराकमधील म्होरक्या अबू मुसाब अल झरकावी हा अमेरिकन हवाईदलाने केलेल्या बॉम्बहल्ल्यात ठार झाला.

• मृत्यू :

• २०००: बालसाहित्यिक गोपीनाथ तळवलकर यांचे निधन. (जन्म: २९ नोव्हेंबर, १९०७)

  • जन्म :
    १९१३: लेखक टीकाकार मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: १९ एप्रिल२०१०)
    १९१४: दिग्दर्शक, पटकथाकार, लेखक व पत्रकार ख्वाजा अहमद तथा के. ए. अब्बास यांचा जन्म. (मृत्यू: १ जुन १९८७)
    १९७४: भारतीय लॉन टेनिस खेळाडू महेश भूपती यांचा जन्म.
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »