साखर तारण कर्ज चार टक्क्यांनी द्या

आवडल्यास ही बातमी शेअर करा

राजू शेट्टी यांची केंद्र सरकारकडे मागणी

नवी दिल्ली : देशातील साखर कारखाने उत्पादित झालेल्या साखरेवर १० ते १४ टक्के व्याजदराने माल तारण कर्ज काढून उस उत्पादक शेतक-यांची एफ. आर. पी. ची रक्कम अदा करतात. यामुळे कारखान्यांवर पडणा-या व्याजाचा भुर्दंड पडतो, तो कमी करण्यासाठी केंद्र सरकारने नाबार्ड अथवा एनसीडीसी मार्फत ४ टक्के व्याजदराने कर्जपुरवठा करावा, अशी आग्रही मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचेकडे केली.

साखर कारखान्यांच्या उत्पादन खर्चामध्ये व्याजाचा मोठा भुर्दंड पडू लागल्याने कारखान्यांच्या उत्पादन खर्च आवाक्याच्या बाहेर जात आहे. साखर कारखाने आर्थिक आरिष्टातून बाहेर काढून कारखानदारी स्थिर राहण्यासाठी केंद्र सरकारने साखर कारखान्यांना एनसीडीसी अथवा नाबार्ड यांचेमार्फत कमीत कमी ४ टक्के व्याजाने मालतारण कर्जपुरवठा करण्याची गरज आहे, अशी मागणी करत, ‘वास्तविक केंद्र सरकारला साखर कारखानदारीच्या माध्यमातून साखर व उपपदार्थाद्वारे मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर जीएसटी मिळतो, याकडे शेट्टी यांनी लक्ष वेधले.

नाबार्डच्या माध्यमातून कशा पध्दतीने साखर कारखानदारांना मदत करता येईल याबाबत अहवाल सादर करण्याच्या सूचना नाबार्डला राज्यमंत्री मोहोळ यांनी दिल्या. त्याबरोबरच साखर कारखान्यांना दिल्या जाणा-या मालतारण कर्जाची परतफेडीची १०० टक्के हमी असल्याने हा निर्णय झाल्यास साखर कारखानदार व उस उत्पादक शेतक-यांना याचा लाभ होणार असल्याचे सांगितले. यावेळी उत्तर प्रदेशचे माजी आमदार व एम. एस. पी. गॅरंटी किसान मोर्चाचे समन्वयक सरदार व्ही एम. सिंगदेखील उपस्थित होते.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »