‘सह्याद्री’ निवडणुकीत सत्ताधारी पॅनलची विजयाकडे वाटचाल

कराड : काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या आणि अत्यंत चुरशीच्या वातावरणात लढल्या गेलेल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी पॅनेलने मोठी आघाडी घेत विजयाकडे वाटचाल केली आहे.
सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत पहिल्या फेरीमध्ये सत्ताधारी माजी सहकार व पणन मंत्री तथा कारखान्याचे विद्यमान चेअरमन बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील पी. डी. पाटील पॅनलने तब्बल चार हजारांची आघाडी घेतली. यामध्ये विरोधी आमदार मनोज घोरपडे व उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचे पॅनल दुसऱ्या, तर निवासराव थोरात, धैर्यशील कदम आणि रामकृष्ण वेताळ यांचे पॅनल तिसऱ्या क्रमांकावर असल्याने पी. डी. पाटील पॅनलची विजयाकडे वाटचाल सुरू असल्याचे दिसून आले.
सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणी ११.४५ वाजण्याच्या सुमारास प्रत्यक्ष सुरुवात झाली. मतपत्रिकांची विभागणी केल्यानंतर निवडणुक निर्णय अधिकारी संजयकुमार सुद्रीक आणि सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी अपर्णा यादव यांच्या आदेशाने मतमोजणी सुरुवात करण्यात आली.
गट क्रमांक 1 : कराड – पहिल्या फेरीमध्ये टेबल क्रमांक 1 ते 50 मतदान केंद्र क्रमांक 1 ते 50 यामध्ये उमेदवार निहाय पडलेली मते पुढीलप्रमाणे, अण्णासो पाटील 8114, शामराव पाटील 7854, संजय चव्हाण 3848, राजेंद्र माने 3786, संदीप पाटील 910 एवढी मोठी मिळाली. वैध मते 24512 ठरली.
गट क्रमांक 2 : तळबीड – पहिल्या फेरीमध्ये टेबल क्रमांक 1 ते 50 मतदान केंद्र क्रमांक 1 ते 50 यामध्ये उमेदवार निहाय पडलेली मते पुढीलप्रमाणे, राजेंद्र जाधव 856, बाळासाहेब माने 3933, सुरेश माने 7910, बाबुराव पवार 893, भास्कर पवार 3733, संभाजी साळवे 7529, वैध मतांची बेरीज 24854 होती.
गट क्रमांक 3 : उंब्रज – पहिल्या फेरीमध्ये टेबल क्रमांक 1 ते 50 मतदान केंद्र क्रमांक 1 ते 50 यामध्ये उमेदवार निहाय पडलेली मते पुढीलप्रमाणे, सिद्धार्थ भोसले 3904, जयसिंग चव्हाण 893, संजय गोरे 7934, अजित जाधव 834, जयंत जाधव 7673, संपतराव जाधव 3788, युवराज खांबे 862, विजय निकम 7651, सुरेश पाटील 3737,
वैध मतांची बेरीज 37276 होती.
गट क्रमांक 4 : कोपर्डे हवेली – पहिल्या फेरीमध्ये टेबल क्रमांक 1 ते 50 मतदान केंद्र क्रमांक 1 ते 50 यामध्ये उमेदवार निहाय पडलेली मते पुढीलप्रमाणे,v आबासो चव्हाण 12, भरत चव्हाण 923, नेताजी चव्हाण 8063, सुभाष चव्हाण 3788, श्रीकांत जाधव 18, सुनील जगदाळे 7734, राजन पाटील 3663, राजेंद्र पाटील 7786, सुरेंद्र पवार 15, भिकू पिसाळ 3676, दिनकर पिसाळ 800, वैध मतांची बेरीज 36478 होती.
गट क्रमांक 5 : मसूर – राजेंद्र चव्हाण 7919, उमाजी चव्हाण 36, प्रमोद गायकवाड 903, संतोष घाडगे 7694, अरविंद जाधव 7456, उदय जगदाळे 838, वसंतराव जगदाळे 3913, श्रीकांत कदम 3707, सुहास कदम 800, विश्वासराव माने 11, अशोकराव साळुंखे 3521 अशी मते मिळाली. तर 4.30 नंतर वाठार किरोली गटाच्या मतमोजणी सुरू होती.
सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच तिरंगी लढत झाल्याने या निवडणुकीसाठी सुमारे 81 टक्के इतके विक्रमी मतदान झाले. त्यामुळे मतदानाच्या या वाढलेल्या टक्क्याचा कोणाला फायदा होणार? याबाबतची उत्सुकता ताणली गेली होती. त्यामुळे या मतमोजणीच्या पहिल्या टप्प्याचा निकाल हाती आल्यानंतर सत्ताधारी पी. डी. पाटील पॅनलने सरासरी 4000 मतांची आघाडी घेतल्यामुळे समर्थकांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष व्यक्त केला.
5.30 वाजण्याचा सुमारास दुसऱ्या फेरीतील मतमोजणीस प्रारंभ करण्यात येणार होता. त्यामुळे अंतिम निकाल रात्री उशिरा हाती येण्याची शक्यता आहे. एकंदरीत पहिल्या फेरीमध्ये सत्ताधारी पी. डी. पाटील पॅनलच्या उमेदवारांची सरासरी 4000 हजारांची आघाडी कायम राहिल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. दरम्यान मतमोजणी व निकालावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी अत्यंत चोख बंदोबस्त ठेवला आहे.