साखर उद्योगाने सौरऊर्जा प्रकल्प उभे करावेत : साखर आयुक्त

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : साखर कारखान्यांनी उपलब्ध असलेल्या जमिनीवर, गोडाऊन व इमारतीवर सौर प्रकल्पांची उभारणी करावी, असे आवाहन राज्याचे साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात राज्यातील २३० साखर कारखान्यांवर सौरऊर्जा प्रकल्प उभारणी होण्याचा अंदाज आहे.

विजेचा वापर वाढत असताना पुरेशी व दिवसा वीज मिळणे कठीण झाले आहे. पर्याय म्हणून शासन सौर उर्जा प्रकल्पातून वीज तयार करण्यावर भर देत आहे. राज्यात जवळपास २३० साखर कारखाने आहेत.

साखर कारखाने व शेतकऱ्यांना शिल्लक जमिनीवर सोलर प्रकल्प उभारले तर होणाऱ्या फायद्याची माहिती कारखान्यांच्या अधिकार्यांच्या बैठकीत दिली आहे. एक मेगावॉटचा सोलर प्रकल्प उभारण्यासाठी तीन ते चार कोटी रुपये खर्च येतो. साखर कारखान्यांनी स्वत: सोलर प्रकल्प उभारावेत अथवा आमच्याशी संपर्क केला तर ऊर्जा विभागाला जोडून देण्यात येईल. ज्यांच्याकडे को-जन प्रकल्प नाही त्यांना वीज मिळेल व आहे त्यांना बंद काळात वीज मिळणार असल्याचेही साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी सांगितले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »