शंभरी टनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ‘श्रीनाथ’तर्फे सत्कार

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : एकरी १०० टनांहून अधिक ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याच्या वतीने सन्मान करण्यात आला. नाना केरू वडघुले “ऊस श्री” पुरस्कार देऊन गौरवण्यात आले

कारखान्याने २०२३-२४ मध्ये ‘थोडेसे बदला, एकरी १०० मे. टन ऊस उत्पादन मिळवा’ या योजनेअंतर्गत आडसाली एकरी १०० टनापेक्षा जास्त ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकरी बांधवांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. डीएस.टी.ए. मार्गदर्शनाखाली सुधारित ऊस विकास योजनांचा प्रभावीपणे वापर करून नाना केरू वडघुले (टाकळी भीमा) यांनी एकरी ११५ टन ऊस उत्पादन मिळविले या त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना मानाचा “ऊस श्री” पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तर अलका शहाजी चोंधे या भगिनीने खोडवा ऊस पिकामध्ये एकरी ७९ टन उत्पादन मिळविले त्याबद्दल त्यांना “ऊस लक्ष्मी” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले

श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याच्या १४ व्या वार्षिक स्नेह मेळावा निमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होते. यानिमित्त कारखान्याशी निगडीत सर्व शेतकरी, कर्मचारी, परिसरातील सामान्य जनाच्या मंगलमय आयुष्यासाठी कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, शेतकरी बांधव, कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी बांधव असे ५१ जोड्प्यांच्या हस्ते ‘संकल्प महायज्ञ करण्यात आला. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक पांडुरंग राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त औक्षण करून त्यांचा सत्कार करण्यात आला.

एकरी शंभर टनांचे मानकरी
नाना केरू वडघुले (टाकळी भीमा) संतोष कुलाळ (वडगाव बांडे), राजेंद्र मेमाणे (वडगांव बांडे), श्वेताली कड (केडगाव), ज्ञानेश्वर मगर (देवकरवाडी), किसन शिंदे (राहू), तानाजी मेमाणे (वडगाव बांडे), दशरथ टेळे (टेळेवाडी), राजेंद्र कदम (खुटबाव), सोमनाथ शिंदे (राहू), अनिल जांभुळकर (लडकतवाडी), आबासाहेब टेळे (टेळेवाडी), अजय शितोळे (रांजणगांव सांडस), प्रवीण जगताप (राहू), सुनील कुंभार (रांजणगांव सांडस), राहुल अवचट (यवत स्टेशन) तानाजी हंबीर (पाटेठाण),दीपक ताम्हाणे (भरतगाव), नागेश कोंडे (वढू खुर्द),. रमणलाल लुंकड (वडगाव रासाई), अशोक डुकरे (वढू खुर्द)..

खोडवा ऊस पिकामध्ये ७५ टनांहून अधिक ऊस उत्पादक शेतकरी : गणेश वायकर (पिंपरी सांडस, सुनीता थोरात (नाथाचीवाडी) यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. शेतकऱ्यांना डी.एस.टी.ए.चे शास्त्रज्ञ डॉ.सुरेश पवार, डॉ. चव्हाण व त्यांचे सहकारी शास्त्रज्ञ,एस.बी. टिळेकर, रोडे यांनी मार्गदर्शन केले आहे.

याप्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत, कार्याध्यक्ष विकास रासकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एम. रासकर, श्रीसदगुरू शांतीनाथजी महाराज, बाळासाहेब चौगुले, प्रताप महाराज चव्हाण, जयश्री बोरावके, संभाजी गवारे, कारखान्याचे संचालक माधव राऊत, महेश करपे, अनिल भुजबळ, किसन शिंदे, ज्ञानदेव कदम, लता सतीश केंद्रे, अंकुशराव ढमढेरे, रवींद्र भुजबळ, भगवान मेमाणे, हनुमंत शिवले, लक्ष्मण कदम एस. बी . टिळेकर, यांच्यासह ऊस उत्पादक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी श्रीसदगुरू शांतीनाथजी महाराज संकल्प महायज्ञ कार्यक्रमासाठी उपस्थित राहून सर्वांना शुभाशीर्वाद दिले. कार्याध्यक्ष विकास रासकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रमुख अतिथी, राष्ट्रीय किर्तनकार, ह.भ.प. चारुदत्त आफळे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्षेत्रातील ह.भ.प. महाराज व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.

कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत म्हणाले की, पुढील वर्षीच्या ऊस गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये कारखान्याची क्षमता ७५०० टन प्रति दिन इतकी करणार आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस वेळेत तुटणार आहे. येणाऱ्या हंगामात दैनंदिन ५ हजार टन चालविण्याच्या दृष्टीने ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा उभारणी केली आहे.

ऊस शास्त्रज्ञ डॉ. सुरेश पवार, डॉ. चव्हाण व सहकारी शास्त्रज्ञ यांनी मार्गदर्शन केले आहे. गणेश टेमगिरे यांनी सूत्रसंचालन तर कारखान्याचे उपाध्यक्ष योगेश ससाणे यांनी आभार मानले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »