आजचे पंचांग

आज मंगळवार, ऑक्टोबर २२, २०२४ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अश्विन ३० शके १९४६
आजचे पंचांग
सूर्योदय : ०६:३५ सूर्यास्त : १८:११
चंद्रोदय : २२:३६ चंद्रास्त : ११:३६
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
दक्षिणायन
ऋतु : शरद
चंद्र माह : आश्विन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : षष्ठी – ०१:२८, ऑक्टोबर २३ पर्यंत
नक्षत्र : आर्द्रा – ०५:३८, ऑक्टोबर २३ पर्यंत
योग : परिघ – ०८:४६ पर्यंत
करण : गर – १३:५२ पर्यंत
द्वितीय करण : वणिज – ०१:२८, ऑक्टोबर २३ पर्यंत
सूर्य राशि : तूळ
चंद्र राशि : मिथुन
राहुकाल : १५:१७ ते १६:४४
गुलिक काल : १२:२३ ते १३:५०
यमगण्ड : ०९:२९ ते १०:५६
अभिजितमुहूर्त : १२:०० ते १२:४६
दुर्मुहूर्त : ०८:५४ ते ०९:४०
दुर्मुहूर्त : २३:०८ ते २३:५८
अमृत काल : १९:४४ ते २१:१९
वर्ज्य : १४:१० ते १५:४६
। नाम तो केवल एक ईश्वर का ही ऐसा है, जो सदा-सदा रहेगा। व्यक्तिगत नाम तो ओस की बूँद की तरह नाशवान है।” – संत तीर्थराम हिरानंद गोसावी
स्वामी रामतीर्थ हिरानंद गोसावी – तुलसीदासांचे वंशज म्हणून या घराण्याची ख्याती होती. लहानपण हलाखीत गेले. ते दहा वर्षांचे असतानाच त्यांचा विवाह झाला होता. गुजराणवाला हायस्कूलमधून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण (१८८८) लाहोरच्या फोरमन कॉलेजमधून गणित विषयात एम्. ए. (१८९५), प्रथम श्रेणीत पहिला क्रमांक आणि त्याच कॉलेजात गणिताचे प्राध्यापक म्हणून नोकरी केली (१८९६). लाहोरला ते धर्मसभेच्या शिक्षणमंडळाचे प्रथम सभासद व नंतर चिटणीसही होते.
गुजराणवाला येथे शिकत असतानाच वडिलांचे मित्र आणि रामकृष्ण परमहंसांचे शिष्य धन्नाराम भगत यांचे सान्निध्य त्यांना लाभले. पुढे तेच त्यांचे गुरू झाले. रामतीर्थ कृष्णभक्त होते. त्यांना प्रत्यक्ष श्रीकृष्णाने दर्शन दिले होते असे म्हणतात. द्वारकामठाचे शंकराचार्य श्री राजराजेश्वरतीर्थ यांच्यासह ते काश्मीरला गेले असता त्यांना सत्संग घडून ब्रह्मसूत्रे, उपनिषदे यांच्यावरील भाष्ये ऐकावयास मिळाली. याचवेळी स्वामी विवेकानंदांची भाषणे त्यांनी ऐकली व त्यांचा अभ्यास केला. सहाजिकच आंतरिक आध्यात्मिक ज्ञानार्जनाची ओढ लागून नोकरीत त्यांना स्वारस्य वाटेना. याचाच परिणाम म्हणून ते सर्वसंगपरित्याग करून हिमालयात गेले आणि वयाच्या २८ व्या वर्षी त्यांनी संन्यास घेतला. त्यानंतर त्यांनी अनेक तीर्थक्षेत्रांची यात्रा केली.
भारतधर्म महामंडळाच्या अध्यक्षपदावरून त्यांनी वैदिक धर्माचा पुरस्कार केला.
अनासक्ती, समाधानी वृत्ती आणि साधी राहणी यांचे सदैव पालन करून केवळ आत्मसाक्षात्काराचा विचार न करता त्यांनी आपल्या देशाचेही भले व्हावे, म्हणून प्रयत्न केले. त्यांचा वेदान्त केवळ शाब्दिक नसून तो त्यांनी आचरणात आणला होता. म्हणूनच श्रेष्ठ सुधारकांत त्यांची गणना होते. भौतिक शास्त्रांच्या आधारेच वेदान्ताचे सिद्धांत मांडून ते आधुनिक काळातही खरे ठरतात, हे त्यांनी सप्रमाण दाखवून दिले.
टोकिओला भरलेल्या आंतरराष्ट्रीय धर्मपरिषदेला टेहरीच्या महाराजांच्या आग्रहावरून ते हजर राहिले (ऑगस्ट १९०२). परंतु ती परिषद ही एक अफवा होती असे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी जपानमध्ये वेदान्तावर व्याख्याने दिली व ती पांडित्य आणि उत्तम कवित्व यांमुळे लोकप्रियही ठरली. नंतर अमेरिकेतही स्वामी विवेकानंदाप्रमाणेच त्यांचे स्वागत झाले. हा दौरा आटपून ते मायदेशी परतले. भारतात आल्यावर अनेकजण त्यांचे शिष्य झाले. त्यांपैकी नारायणस्वामी, टेहरीचे महाराज, मदन मोहन मालवीय, स्वामी शिवानंद, डॉ. महंमद इकबाल हे प्रमुख होत.
रामतीर्थांनी पूर्वायुष्यात अनेक ग्रंथ लिहिले होते. परंतु अचानक नैराश्याच्या भरात त्यांनी आपली ग्रंथसंपदा गंगार्पण केली. त्यामुळे परदेशांत व भारतात दिलेल्या व्याख्यानाखेरीज त्यांचे स्वतंत्र वाङ्मय फारसे उपलब्ध नाही. उर्दू, फार्सी आणि इंग्रजी भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. उत्तम कवित्वही त्यांना लाभले होते. त्यांची हजारावर पत्रे व काही टिपणे रामतीर्थ प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झाली आहेत. रामतीर्थ आध्यात्मिक आनंदात एवढे मत असत, की त्यांनी आपल्या लेखनात अनेक ठिकाणी स्वतःचा उल्लेख ‘राम बादशहा’ असा केला आहे. त्यांचे प्रकाशित इंग्रजी लेखन असे : (१) इन वुड्स ऑफ गॉड्स रीअलाइझेशन (८ खंड ), (२) रामाज नोटबुक्स (२ खंड ), (३ ) हार्ट ऑफ राम, (४ ) पॅरबल्स ऑफ राम इत्यादी. या पुस्ताकांची हिंदी, मराठी भाषांतरेही प्रसिद्ध आहेत. रामतीर्थांना हिमालयाची विलक्षण ओढ होती. तेथील भव्य निसर्गसौंदर्याच्या त्यांनी केलेल्या वर्णनांत सौंदर्यवृत्ती व आध्यात्मिकता यांचा उत्कृष्ट संगम आढळतो.
रामतीर्थ गंगास्नानाला गेले असता भोवऱ्यात सापडून अवघ्या ३३ व्या वर्षी त्यांचा अंत झाला योगायोगाने त्याच दिवशी त्यांनी लिहिलेला सुप्रसिद्ध मृत्युलेख त्यांच्या शिष्यांना त्यांच्या मेजावर मिळाला. उत्कृष्ट काव्याचा तो एक नमुनाच आहे. त्यात मृत्युला उद्देशून ‘माझे शरीर तू खुशाल घेऊन जा. चंद्रकिरणांच्या रूपाने, पहाडी नदी-निर्झरांच्या वेषाने, समुद्रलाटांच्या मिषाने मी जगात वावरू शकेन’ असे लिहिले आहे.
हृषिकेशजवळील ब्रह्मपुरी येथे रामतीर्थांच्या स्मरर्णार्थ एक उत्तम ग्रंथालय चालविण्यात येते.
१८७३: अमृतानुभवी संत तीर्थराम हिरानंद गोसावी ऊर्फ स्वामी रामतीर्थ यांचा जन्म. (मृत्यू: १७ ऑक्टोबर, १९०६)
अशोक कुमार अग्रवाल – हे भारतीय सिनेमॅटोग्राफर होते ज्यांनी प्रामुख्याने दक्षिण भारतीय चित्रपट उद्योगात काम केले . सुमारे चार दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी तामिळ , तेलगू , मल्याळम आणि हिंदी भाषांमधील १२५ हून अधिक वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांमध्ये काम केले. अग्रवाल इंडियन सोसायटी ऑफ सिनेमॅटोग्राफर्स (ISC) चे सदस्य होते.
अलाहाबादमध्ये हिंदी कवीच्या पोटी जन्मलेल्या अशोक कुमार यांनी अलाहाबाद विद्यापीठातून फोटोग्राफीमध्ये डिप्लोमा मिळवला . सिनेमाबद्दलच्या त्याच्या आवडीमुळे त्याने इन्स्टिट्यूट ऑफ फिल्म टेक्नॉलॉजी, अडयार, चेन्नई येथे मोशन पिक्चर फोटोग्राफीच्या कोर्ससाठी प्रवेश घेतला. संस्थेतून बाहेर पडल्यावर, त्यांनी 1969 च्या मल्याळम चित्रपट जन्मभूमीद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले ज्यासाठी त्यांना त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीसाठी केरळ राज्य चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
१९७० च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात पीएन मेनन यांच्यासोबतच्या त्यांच्या सहवासामुळे मल्याळम चित्रपट उद्योगात त्यांचे स्थान मजबूत झाले. बाबू नन्थानकोडे , जेडी थोटन , भरथन , एन. शंकरन नायर आणि रामू करियात यांसारख्या इतर चित्रपट निर्मात्यांसाठीही त्यांनी काम केले . महेंद्रन यांच्या ‘ उथिरिपुक्कल ’ (१९७९) मधून त्यांना तामिळ चित्रपटसृष्टीत ब्रेक मिळाला . महेंद्रन यांच्याशी ते त्यांच्या बहुतेक चित्रपटांमध्ये जोडले गेले होते.
अनेक राज्य सरकारच्या पुरस्कारांव्यतिरिक्त, अशोक कुमार यांना सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देखील मिळाला होता . त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी तमिळ, तेलुगू आणि हिंदी भाषेतील दहा वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांचे दिग्दर्शनही केले.
• २०१४: भारतीय दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर अशोक कुमार यांचे निधन. (जन्म: २५ जून, १९४१ )
- घटना :
१६३३: लियाओउलू उपसागाराची लढाई: मिंग राजघराण्याने डच ईस्ट इंडिया कंपनीला पराभूत केले.
१७९७: बलूनमधून १००० मीटर उंच जाऊन पॅराशूटच्या साहाय्याने आंद्रे जॅक्कस गार्नेरिन जमिनीवर उतरणारा पहिला मानव बनला.
१९२७: निकोला टेस्ला यांनी सिंगल-फेज इलेक्ट्रिकसह सहा नवीन शोध लावले.
१९३८: चेस्टर कार्लसनने जगातील पहिले झेरॉक्स मशिन तयार केले.
१९६३: पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते भाक्रा धरण राष्ट्राला अर्पण करण्यात आले.
१९६४: फ्रेन्च लेखक, कवी आणि तत्त्वज्ञ जेआँ-पॉल सार्त्र यांना नोबेल पुरस्कार मिळाला पण त्यांनी तो नाकारला.
१९९४: भारतीय उद्योगपती नवीनभाई सी. दवे यांना ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांचा उद्योग व शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल कोट ऑफ आर्म्स पुरस्कार जाहीर.
२००१: ग्रँड थेफ्ट ऑटो ३ हा वीडीओ गेम प्रकाशित झाला.
२००८: भारताने पहिल्या मानवविरहित चांद्रयान-१ चे प्रक्षेपण केले.
• मृत्यू :
• १९३३: थोर देशभक्त बॅ. विठ्ठलभाई पटेल यांचे निधन. (जन्म: २७ सप्टेंबर, १८७३)
• १९७८: साहित्यिक व वक्ते नारायण सीताराम तथा ना. सी. फडके यांचे निधन. (जन्म: ४ ऑगस्ट १८९४)
• १९९१: देहदान चळवळीचे पुरस्कर्ते व देहदान सहाय्यक मंडळाचे संस्थापक ग. म. सोहोनी यांचे निधन.
• १९९८: हिंदी चित्रपटांतील खलनायक अजित खान ऊर्फ अजित यांचे निधन. (जन्म: २७ जानेवारी, १९२२)
• २०००: अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख कार्यवाह, सामाजिक कार्यकर्ते व उद्योगपती अशोक मोतीलाल फिरोदिया यांचे निधन.
- जन्म :
१९००: भारतीय स्वातंत्र्यसैनिक अश्फाक़ुला खान यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर, १९२७)
१९४१: आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार रघूवीर सिंह यांचा जन्म. (मृत्यू: १८ एप्रिल १९९९ )
१९४६ : भारतीय वंशाचे अमेरिकन डॉक्टर व लेखक दीपक चोप्रा यांचा जन्म.