राम नगरकर

आज रविवार, जून 8, 2025 युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर ज्येष्ठ दिनांक १८ , शके १९४७
सूर्योदय : 06:00 सूर्यास्त : 19:15
चंद्रोदय : 16:50 चंद्रास्त : 04:09, जून 09
चंद्र माह : ज्येष्ठ
पक्षशुक्ल पक्ष
तिथि : द्वादशी – 07:17 पर्यंत
नक्षत्र : स्वाती – 12:42 पर्यंत
योग : परिघ – 12:18 पर्यंत
करण : बालव – 07:17 पर्यंत
द्वितीय करणकौलव – 20:28 पर्यंत
सूर्य राशि : वृषभ
चंद्र राशि : तूळ
राहुकाल : 17:36 ते 19:15
गुलिक काल : 15:56 ते 17:36
यमगण्ड : 12:38 ते 14:17
अभिजित मुहूर्त : 12:11 ते 13:04
दुर्मुहूर्त : 17:29 ते 18:22
अमृत काल :05:41, जून 09 ते 07:28, जून 09
वर्ज्य : 18:57 ते 20:44
समुद्र दुषित होण्याचे प्रमाण वाढल्याने त्यासंबंधी जनजागृती करणे आवश्यक बनले आहे. या संदर्भातला प्रस्ताव १९९२ मध्येच कॅनडाने ब्राझीलमध्ये झालेल्या वसुंधरा शिकार परिषदेत मांडला. त्याला संयुक्त राष्ट्रसंघाने २००८ मध्ये मान्यता दिली. तेव्हापासून ‘द ओशन प्रोजेक्ट’ या अमेरिकन संस्थेच्या सहकार्याने, हा दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा होऊ लागला आहे.
सांडपाणी, औद्योगिक प्रदूषके, मुदत संपलेली वा घातक रसायने, प्लास्टिकच्या बाटल्या नि पिशव्या… कचरा कोणताही असो- “फेका समुद्रात !” अहो केवढा मोठा आणि खोल समुद्र असतो समुद्र, एवढ्याशा कच-याने काय होतंय? ही प्रथा जगभरातील (व्यक्तीपासून राष्ट्रांपर्यंत) बहुतेक सर्वांनीच पाळल्यामुळे आता मात्र परिस्थिती गंभीर बनली आहे. मासे मिळवण्यासाठी अधिकाधिक खोल समुद्रात जावे लागत आहे, पाण्याचा दर्जा घसरला आहे. हवामानावर परिणाम होत आहे. विशिष्ट सजीव नष्ट होऊ लागले आहेत… हे सारे थांबविणे हेच या खरे उद्दिष्टे आहे.
आज जागतिक महासागर दिवस आहे.
आज जागतिक मेंदूचा ट्युमर दिवस आहे.
राम नगरकर – हे नाव आपल्यापुढे आलं ते एक नट म्हणून. तेही एक विनोदी नट म्हणून प्रख्यात अभिनेते राम नगरकर यांनी मराठी रंगभूमी आणि असंख्य चित्रपटांमधून लाखो रसिकांना खळखळून हसविले. ‘रामनगरी’ हे त्यांच्या आत्मकथनाचे धम्माल विनोदी पुस्तकही खूप गाजले. महाराष्ट्र शासनासह अनेक संस्थांनी या पुस्तकाला पुरस्कार देऊन गौरविले. ‘रामनगरी’ ला पुलंची प्रस्तावना आहे. त्यामुळेच हे पुस्तक तमाम मराठी जनतेने डोक्यावर घेतले. या पुस्तकावरून ‘रामनगरी’ या हिंदी सिनेमाचीही निर्मिती झाली होती व त्यात अमोल पालेकर हे प्रमुख भूमिकेत होते.
हे सर्व होत असताना ‘रामनगरी’ हा एकपात्री कार्यक्रम १९८० साली मा.राम नगरकर यांनी सुरु केला. याचे देशविदेशात एक हजाराहून जास्त प्रयोग केले. त्यांनाही प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेगळा ठसा नेहमीच पाहायला मिळाला. स्वतःची थट्टा-मस्करी करणाऱ्या या कलावंताने आपल्या अदाकारीने श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
‘‘ दादा कोंडके, निळू फुले हे नगरकरांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होते. १९९५ साली मा.राम नगरकर यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव वंदन नगरकर यांच्यातील कलागुण ओळखून ख्यातनाम अभिनेते निळू फुले यांनी प्रोत्साहन दिल्यामुळे वंदन नगरकर यांनी ‘रामनगरी’ ला पुन्हा रंगभूमीवर आणले आहे. त्यांनीही रामनगरीचे असंख्य प्रयोग केले आहेत. रामनगरी हे राम नगरकर यांचे आत्मचरित्र खूपच गाजले आहे.
• १९९५: रंगभूमी कलावंत एकपात्री प्रयोगकार राम नगरकर यांचे निधन. (जन्म :, ५ एप्रिल, १९३०)
भावगीत गायक गजाननराव वाटवे– गजाननरावांनी अर्थार्जनाकरिता शाळा-महाविद्यालयांमध्ये गायनाचे वर्ग घेण्यास सुरुवात केली. त्यांचा गायनाचा पहिला जाहीर कार्यक्रम फर्ग्युसन महाविद्यालयात झाला .
यानंतर त्यांनी विविध प्रसंगांना अनुसरून काव्यगायनाचे कार्यक्रम करण्यास सुरुवात केली. त्यांना मुंबई आकाशवाणीवर गायनाचा कार्यक्रम करण्याची संधीही मिळाली त्यांची ‘वारा फोफावला’ ही ध्वनिमुद्रिका एच.एम.व्ही.ने काढली. ही पहिलीच ध्वनिमुद्रिका खूप गाजली. यानंतर त्यांच्या अनेक ध्वनिमुद्रिका निघाल्या.
गजाननरावांनी केशवसुत, गिरीश, माधव जुलियन, यशवंत, कुसुमाग्रज, सुरेश भट, गदिमा, राजा बढे, मंगेश पाडगावकर, शांता शेळके, श्रीनिवास खारकर आदी प्रतिभावंतांच्या दर्जेदार भावकविता अत्यंत सुरेल चालीत बांधल्या आणि त्या रसिकांसमोर पेश केल्या. हे त्यांनी केलेले काव्यगायनाचे कार्यक्रम खूप गाजले. या कार्यक्रमांमध्ये ते विविध प्रकारची गीते सादर करत असत. राष्ट्रप्रेमाची गीते, मातृप्रेमाची गीते, प्रेमगीते, पाऊस गीते, विडंबन गीते असे विविध प्रकार या कार्यक्रमात असल्याने सर्व प्रकारच्या रसिकांना हे कार्यक्रम आवडू लागले.
गजाननरावांनी जवळपास २००० पेक्षाही अधिक गीते स्वरबद्ध केली, त्यापैकी त्यांनी संगीतबद्ध केलेल्या व गायलेल्या गीतांमध्ये रामाला गं चंद्र हवा , हीच राघवा हीच पैजणे , मंदिरात आलो तुझ्या दर्शनाला , झुंजू मुंजू झालं, निरांजन पडले तबकात , दोन ध्रुवावर दोघे आपण , चंद्रावरती दोन गुलाब, घट तिचा रिकामा ,प्रीत तुझी माझी , नयन खेळले जुगार , परीसा हो तुलसी रामायण , ही गीते विशेष गाजली. तसेच त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांमध्ये गगनी उगवला सायंतारा, कोणता मानू चंद्रमा, कुंभारासारखा गुरू, ती पहा बापूजींची प्राणज्योती, जारे चंद्रा तुडवित जा पवना जा वेगे, चल चल चंद्रा, घर दिव्यात मंद तरी, गेला दर्यापार घरधनी, गावू त्यांना आरती, कधी कुठे न भेटणार, अंतरीची विशाल स्वप्ने, ऐकलात का हट्ट नवा, उठ राजसा घननिळा, आला स्वप्नांचा मधुमास, रघुवीर आज घरी येणार, या धुंद चांदण्यात तू, नाखवा वल्हव वल्हव, तो सलीम राजपुत्र, ते कसे गं ते कसे, परदेशी सजन घरी आले, सुरांनो जावू नका रे ही गीते रसिकप्रिय झाली. दरम्यान प्रभात फिल्म कंपनीशी त्यांचा संबंध आला आणि दहा वाजता या चित्रपटासाठी त्यांनी पार्श्वगायन केले. अनेक गीतांना त्यांनी चालीही दिल्या. वाटवे यांनी संगीतबद्ध केलेल्या कर्णमधुर कविता मालती पांडे, माणिक वर्मा, सुमन कल्याणपूर, ज्योत्स्ना भोळे, कुमुदिनी पेडणेकर या गायिकांनी गायल्या आहेत.
गजाननरावांना दीनानाथ पुरस्कार (१९९३), महाराष्ट्र शासनाचा ‘लता मंगेशकर पुरस्कार’ (१९९४), वसंतराव नाईक पुरस्कार (१९९५), गदिमा प्रतिष्ठानचा पुरस्कार, युगप्रवर्तक पुरस्कार इत्यादी पुरस्कार मिळाले. पुणे येथे १२ डिसेंबर १९६७ रोजी झालेल्या भावगीत गायक संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
गजाननरावांची शिष्य परंपराही मोठी आहे. अनुराधा मराठे, शोभा जोशी, रंजना जोगळेकर, मंजिरी आलेगावकर, रवींद्र साठे इत्यादींनी त्यांचा वारसा पुढे चालविला.
गगनी उगवला सायंतारा (१९७१) हे त्यांचे आत्मचरित्र. गजाननरावांनी संगीतबद्ध केलेल्या १०० भावगीतांचा समावेश असलेला निरांजनातील वात हा भावगीतसंग्रह बबनराव नावडीकर यांनी संकलित केला आहे.
१९१७: भावगीत गायक गजाननराव वाटवे यांचा जन्म. (मृत्यू: २ एप्रिल, २००९)
१९११ : ।। ही मी देतों भाकर । ती खाऊं घाला लवकर । टिळकांप्रती अंतर । यांत कांहीं करुं नका ॥८८॥ या भाकरीच्या बळावरी । तो मोठी करील कामगिरी । जातो जरी फार दूरी । परी न त्याला इलाज ॥
गीता रहस्य लेखनास प्रत्यक्ष श्री गजानन महाराजांचा शुभ आशीर्वाद होता.
लोकमान्य टिळकांनी मंडाले तुरुंगात ह्या ग्रंथाचे लेखन केले .
आज गीता रहस्य ग्रंथ जयंती आहे . ( ०८ जून , १९१५ रोजी प्रथम आवृत्ती प्रकाशित केली. )
२०२४ : रामोजी राव यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1936 साली आंध्र प्रदेशच्या कृष्णा जिल्ह्यात मध्यवर्गीय कुटुंबात झाला. आशिया खंडातील सर्वात मोठी फिल्म सिटी असलेली रामोजी फिल्म सिटीची स्थापना त्यांनी केली. तब्बल 2 हजार एकरात 1996 साली ही रामोजी फिल्स सिटी सुरु करण्यात आली. बाहुबली हा भारतातील पहिला बिग बजेट सिनेमा याच रामोजी फिल्म सिटीत बनवला गेला. रामोजी राव यांनी 70 च्या दशकात ईनाडू या वृत्तपत्राची सुरुवात केली. ईनाडू वृत्तपत्राच्या माध्यमातून रामोजी राव यांनी ईटीव्हीची सुरुवात केली.
रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे निधन.
- घटना :
१६७०: पुरंदरच्या तहात गमावलेला रोहिडा किल्ला शिवाजी महाराजांनी परत जिंकून घेतला.
१६२४: पेरू येथे भूकंप.
१७०७: औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुअज्जम आणि आझमशाह या त्याच्या दोन मुलांमधे दिल्लीच्या तख्तासाठी युद्ध झाले. यात मुअज्जमने आझमशाहला ठार करुन दिल्लीची गादी बळकावली.
१७१३: मुघलांनी १६८९ मधे जिंकलेला रायगड किल्ला पंतप्रतिनिधी यांनी सिद्दीकडुन राजकारणाने जिंकुन घेतला.
१७८३: आईसलँड मधील लाकी ज्वालामुखीचा उद्रेक, हजार ठार.
१९१२: कार्ल लेम्ले यांनी यूनिव्हर्सल पिक्चर्स या कंपनीची स्थापना केली.
१९१५: लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना लिहुन पूर्ण केलेल्या गीतारहस्य या ग्रंथाचे गायकवाडवाड्यात प्रकाशन झाले.
१९१८: नोव्हा अॅक्विला या सर्वाधिक तेजस्वी तेजोमेघाचा शोध.
१९४१: दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी सीरीया व लेबानॉन पादाक्रांत केले.
१९४८: एअर इंडिया ची मुंबई – लंडन विमानसेवा सुरू झाली.
१९५३: कृष्णवर्णीयांना हॉटेलमधे सेवा नाकारण्यास अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली.
१९९२: पहिल्यांदा जागतिक महासागर दिन साजरा केला गेला.
२००४: आधुनिक काळातील शुक्राचे (सूर्यावरुन) पहिले अधिक्रमण झाले. याआधीचे अधिक्रमण १८८२ या वर्षी झाले होते. - जन्म :
१९१०: लेखक, तत्त्वचिंतक व समीक्षक दिनकर केशव तथा दि. के. बेडेकर यांचा जन्म. (मृत्यू: २ मे १९७३)
१९१५: भारतीय पत्रकार, लेखक, आणि कवी काययार सिंहनाथ राय यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑगस्ट २०१५)
१९५७: चित्रपट अभिनेत्री डिंपल कपाडिया यांचा जन्म.
१९७५: भारतीय अभिनेत्री आणि निर्माता शिल्पा शेट्टी यांचा जन्म.
• मृत्यू :
• १९९५: रंगभूमी कलावंत एकपात्री प्रयोगकार राम नगरकर यांचे निधन.