अंगिरस ऋषी

आज सोमवार, जून २३, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर आषाढ दिनांक २, शके १९४७
सूर्योदय : ०६:०२ सूर्यास्त : १९:१९
चंद्रोदय : ०४:२९, जून २४ चंद्रास्त : १७:२०
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
दक्षिणायन
ऋतु : ग्रीष्म
चंद्र माह : ज्येष्ठ
पक्षकृष्ण पक्ष
तिथि : त्रयोदशी – २२:०९ पर्यंत
नक्षत्र : कृत्तिका – १५:१६ पर्यंत
योग : धृति – १३:१७ पर्यंत
करण : गर – ११:४६ पर्यंत
द्वितीय करण : वणिज – २२:०९ पर्यंत
सूर्य राशि : मिथुन
चंद्र राशि : वृषभ
राहुकाल : ०७:४२ ते ०९:२२
गुलिक काल : १४:२० ते १६:००
यमगण्ड : ११:०१ ते १२:४१
अभिजित मुहूर्त : १२:१४ ते १३:०७
दुर्मुहूर्त : १३:०७ ते १४:००
दुर्मुहूर्त : १५:४७ ते १६:४०
अमृत काल : १३:०७ ते १४:३३
वर्ज्य : ०५:४१, जून २४ ते ०७:०८, जून २४
अंगिरस अथवा अंगिरा वज्रकुलोत्पन्न एक प्रसिद्ध वैदिक ऋषी होते. वैदिक साहित्यात त्यांचा उल्लेख मनु, ययाति, दध्यच्, प्रियमेघ, कण्व, अत्रि, भृगु इत्यादी ऋषींसोबत आढळतो. ते सप्तर्षी व दहा प्रजापतींमध्ये गणले जातात.
अंगिरस ऋषी यांनी आपल्या मंत्रशक्तीने सूर्याचा व स्वर्लोकाचा शोध लावला असे सांगितले जाते.
अंगिरस हे नांव वेदांमध्ये अंगिरा किंवा अंगिरस् अशा दोन स्वरूपात येते. बृहस्पतीला उद्देशून अंगिरस् हे पूर्वज नाम (गोत्रनाम) म्हणून येते. नंतरच्या काळात अंगिरस् हे प्राचीन ऋषींमध्ये गणले जाऊ लागले. अंगिरस् हे ऋषिसमूहाचे नाव झाले.
मुळातले सात अंगिरस ऋषी हे मानवसमाजाचे पूर्वज – ‘पितरो मनुष्याः ।” असे मानले जातात. त्यांनी प्रकाशाचा शोध लावला. त्यांनी सूर्याला प्रकाशमान केले आणि सत्यधामाच्या दिशेने म्हणजे ऊर्ध्वदिशेने ते गतिमान् झाले. काही सूक्तांमध्ये त्यांना पितृदेवता किंवा यमाचे स्त्रीअश्व असे म्हटले आहे.
ते मनुष्यजातीचे पूर्वज होते. वैदिक धर्माचे संस्थापक होते.
अंगिरस ऋषी हे अग्नीच्या ज्वालाशक्तीचे आणि भृगूंच्या सौरशक्तीचे प्रतीक असण्याची शक्यता आहे, असे दिसते.
ते केवळ ऋषी नाहीत तर ते योद्धे म्हणूनही काम करतात. आनंदलोकातील मधुरतेमध्ये त्यांचा निवास असतो. ते अग्निशक्तीप्रमाणेच बृहस्पती-शक्तीचेही प्रतीक आहेत. (वेदरहस्य: पा. १५०)
ते ज्वालापुत्र आहेत. ते सोमरस देणारे व स्वीकारणारे आहेत. ते ऋचांचे गायक आहेत. ते चिरतरुण आहेत.
आज अंगिरस ऋषी जयंती आहे.
विधवा महिलांच्या आवाजाकडे लक्ष वेधण्यासाठी, त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर प्रकाश टाकण्यासाठी आणि त्यांना आवश्यक असलेला पाठिंबा मिळवून देण्यासाठी २३ जून हा “International Widows Day 2022” म्हणून 2011 पासून साजरा केला जातो. विधवात्वाच्या मुद्द्यावर जागरुकता निर्माण करण्यासाठी द लूंबा फाउंडेशनने या दिवसाची स्थापना केली होती.
महाराष्ट्रातील कोल्हापूरमधील हेरवाड ग्रामपंचायतीने पतीनिधनानंतर विधवांच्या बाबतीत ज्या अवमानकारक प्रथा पाळल्या जातात त्या सगळय़ांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. याची स्तुत्य दखल घेत राज्य सरकारनेही विधवांच्या संदर्भातील अशा निष्ठुर प्रथांवर बंदी घालण्याचे परिपत्रक सर्व ग्रामपंचायतींना जारी केले आहे. या अनुषंगाने आणि येत्या २३ जूनच्या ‘आंतरराष्ट्रीय विधवा दिना’निमित्ताने विधवांची सामाजिक स्थिती तसेच त्यांच्यासाठी देश, विदेश पातळीवर केल्या जाणाऱ्या प्रयत्नांचा आढावा घेणे आवश्यक आहे.
विधवा हा शब्द न वापरता पूर्णांगिनी हा शब्द राज्यात वापरला जावा, अशी शिफारस राज्य महिला आयोगाकडून राज्य सरकारला शिफारस करण्यात आली आहे.
आज आंतरराष्ट्रीय विधवा दिन आहे.
आज संयुक्त राष्ट्र लोकसेवा दिन आहे.
• १९८०: भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न व्ही. व्ही. गिरी यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १८९४)
“जहाँ हुए बलिदान मुखर्जी , वो कश्मीर हमारा है:”
श्री श्यामप्रसाद मुखर्जी – एक थोर राष्ट्रीय नेते, भारतीय जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष व शिक्षणतज्ञ. त्यांचा जन्म कलकत्त्यात प्रसिद्ध मुखर्जी घराण्यात झाला. त्यांचे वडील विख्यात न्यायाधीश आणि पुढे कलकत्ता विद्यापीठाचे उपकुलगुरू सर आशुतोष मुखर्जी. त्यांच्या आईचे नाव श्रीमती जोगमायादेवी. हुशार विद्यार्थी म्हणून त्यांनी कीर्ती मिळविली आणि प्रत्येक परीक्षेत पहिल्या वर्गात पहिला क्रमांक मिळविण्याचा त्यांनी विक्रमच केला. कलकत्ता विद्यापीठातून १९२१ मध्ये ते बी. ए. झाले तेव्हा त्यांची कलकत्ता विद्यापीठाच्या सीनेटवर निवड झाली होती. त्यानंतर त्यांनी १९२४ साली बी. एल्. ही पदवी घेऊन इंग्लंडमध्ये कायद्याचा अभ्यास केला व ते बॅरिस्टर झाले. नंतर लंडनहून परत आल्यावर त्यांनी वकिली सुरू केली.
१९२९ मध्ये ते बंगाल कायदेमंडळावर निवडून आले ; पण वर्षभराने गांधीजींच्या देशव्यापी कायदेभंग आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी त्यांनी कायदेमंडळाचा राजीनामा दिला.
यावेळी काँग्रेसच्या एकूण धोरणाविषयी ते नाराज होते. परिणामतः ते हिंदुमहासभेकडे वळले. काही काळ ते हिंदूमहासभेचे हंगामी अध्यक्षही होते. ते कलकत्ता विद्यापीठाचे उपकुलगुरू झाले (१९३४). त्याच वर्षी त्यांच्या पत्नी सुधादेवी निवर्तल्या.
हिंदुमहासभेतर्फे ते १९३७ मध्ये बंगालच्या कायदेमंडळावर पुन्हा निवडून आले.
मुस्लिम लीगच्या १९४० च्या लाहोर ठरावानंतर त्यांनी फाळणीविरुद्ध देशभर प्रचार केला. त्या आधी लीग मंत्रिमंडळाच्या पराभवानंतर ते बंगालच्या फझलुल हक मंत्रिमंडळात सामील झाले पण भारत छोडो आंदोलनाचे वेळी त्यांनी गांधीजी व इतर काँग्रेस नेत्यांची सुटका आणि संभाव्य जपानी आक्रमणाला तोंड देण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षादलाच्या स्थापनेची मागणी केली. या प्रश्नांवर तड लावण्यासाठी नंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. १९४३ च्या बंगालच्या भीषण दुष्काळात श्यामा प्रसादांनी दुष्काळनिवारण्यासाठी खूप कष्ट घेतले. १९४७ च्या सुरुवातीस देशाची फाळणी होणार असे दिसू लागल्यावर त्यांनी बंगालच्याही फाळणीचा आग्रह धरला.
भारत स्वतंत्र झाल्यावर पंडित नेहरुच्या पहिल्या केंद्रीय मंत्रिमंडळात ते उद्योग आणि पुरवठा मंत्री झाले. मंत्री म्हणून त्यांनी फार अल्प काळ काम केले.
नेहरू-लिकायत अलीखान कराराचे निषेधार्थ त्यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा १९५० मध्येच राजीनामा दिला तथापि त्यांच्या कारकीर्दीत चित्तरंजन चलनशील यंत्र कारखाना व सिंद्री खत कारखाना हे दोन भव्य प्रकल्प त्यांच्या प्रयत्नांनी सुरू होऊन भारताच्या औद्योगिक विकासात मोलाची भर पडली.
काँग्रेसला शह देण्यासाठी त्यांनी १९५१ साली भारतीय जनसंघाची स्थापना केली . पक्षात पहिल्यापासूनच सर्वांना प्रवेश खुला ठेवण्यात आला होता. १९५२ च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणूकीत ते जनसंघातर्फे लोकसभेवर निवडून आले.
संसदेत त्यांनी विरोधी पक्षांची एक राष्ट्रीय लोकशाही आघाडी स्थापन केली. त्याचे नेतृत्व त्यांच्याकडे आले. ते महाबोधी सोसायटीचे अध्यक्ष झाले आणि प्राचीन अवशेष घेऊन त्यांनी ब्रह्मदेश व कंबोडिया या देशांनी भेटी दिल्या.
त्यानंतर त्यांनी जम्मू व काश्मीरच्या संपूर्ण विलीनीकरणासाठी अभियान सुरू केले. या आंदोलनानिमित्त प्रत्यक्ष काश्मीरमध्ये जाऊन प्रचार करण्याचा त्यांनी निश्चय केला. एक देश में दो निशान, एक देश में दो प्रधान, एक देश में दो विधान नहीं चलेंगे, नहीं चलेंगे असा नारा देत काश्मीर मध्ये त्याकाळात आवश्यक असणारे परवाने ( परमिट ) न घेता प्रवेश केला. ११ मे रोजी त्यांना स्थानिक राज्य सरकारकडून अटक झाली.
त्यांनतर मात्र अटकेत असणाऱ्या डॉ. मुखर्जीचा गूढ रित्या मृत्यू झाला.जम्मू-काश्मीरचे तत्कालिन मुख्यमंत्री शेख अब्दुल्ला यांच्या शासनाने त्यांच्या राज्यप्रवेशावर बंदी घातली. बंदी मोडून जम्मू-काश्मीरमध्ये प्रवेश केल्यावर त्यांना अटक झाली. तुरुंगवासातच त्यांचा अंत झाला. या प्रश्नावर शेख अब्दुल्ला यांच्याविरुद्ध त्यावेळी बरेच काहूर माजले होते.
• १९५३: भारतीय जनसंघाचे संस्थापक श्यामप्रसाद मुखर्जी यांचे निधन. (जन्म: ६ जुलै १९०१)
भारतीय भूसेना प्रमुख जनरल प्राणनाथ थापर – लाहोर येथील सरकारी महाविद्यालयात शिक्षण. इंग्लंड मधील शाही सैनिकी महाविद्यालयात लष्करी शिक्षण झाल्यावर १९२६ मध्ये पहिल्या पंजाब रेजिमेंटमध्ये ते राजादिष्ट अधिकारी म्हणून नियुक्त झाले. १९३७ मध्ये क्वेट्टा येथील स्टाफ कॉलेजमध्ये त्यांनी उच्च सैनिकी शिक्षण घेतले.
दुसऱ्या जागतिक महायुद्धात ते ब्रह्मदेश, उत्तर आफ्रिका व इटली या ठिकाणी लष्करी कामगिरीवर होते. सेनाप्रमुख कार्यालयात साहाय्यक सैनिकी चिटणीस व सेना पुनर्घटना समितीचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले. १९४७ च्या आरंभी ते १६१ व्या ब्रिगेडचे प्रमुख होते. १५ ऑगस्ट १९४७ ते १९५४ या काळात ते सैनिक–प्रचालन संचालक होते. स्थानापन्न जनरल स्टाफ प्रमुख, सैनिकी चिटणीस व सांग्रामिक संभाराचे मास्टर–जनरल म्हणून सेनाप्रमुख कार्यालयात त्यांनी कामगिरी केली.
१९५४ मध्ये एका डिव्हिजनचे ते जनरल होते. १९५६ मध्ये त्यांनी इंग्लंडमध्ये शाही संरक्षण महाविद्यालयातून अत्युच्च संरक्षणशास्त्राचे शिक्षण पूर्ण केले. १९५७ ते १९६१ या काळात ते दक्षिण भूसेना भागाचे प्रमुख होते.
८ मे १९६१–१९ नोव्हेंबर १९६२ यांदरम्यान ते भूसेनाप्रमुख होते.
त्यांच्या कारकीर्दीतच चीनने भारतावर आक्रमण केले. परिणामतः थापर यांनी २० नोव्हेंबर १९६२ रोजी निवृत्ती स्वीकारली. १९६४ साली ते अफगाणिस्तानमध्ये भारतीय राजदूत होते. दिल्लीजवळील छत्तरपूर खेड्यात ते स्वतःच्या शेतमळ्यावर असताना त्यांचा मृत्यू झाला.
• १९७५: भारतीय भूसेना प्रमुख जनरल प्राणनाथ थापर यांचे निधन. ( जन्म: २३ मे , १९०६)
- घटना :
१७५७: प्लासी येथे रॉबर्ट क्लाइव्हच्या ३,००० सैन्याने सिराज उद्दौलाच्या ५०,००० सैन्याचा फितुरी घडवून पराभव केला.
१८६८: क्रिस्टोफर लॅथम शॉल्स यांना टाईप-राइटर च्या शोधासाठी पेटंट मिळाले.
१८९४: पॅरिस येथे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना झाली.
१९२७: भारतीय नभोवाणी मुंबई येथे सुरु.
१९६९: आय.बी.एम. ने जाहीर केले की जानेवारी १९९७ पासून सॉफ्टवेअर आणि इतर सेवांची किंमत वेगवेगळी होईल त्यामुळे आधुनिक सॉफ्टवेअर उद्योग सुरु झाला.
१९७९: इंग्लंडला ९२ धावांनी हरवून वेस्ट इंडीजने दुसरा क्रिकेट विश्वकरंडक जिंकला.
१९८५: दहशतवादी बॉम्बचा एअर इंडियाच्या कनिष्क बोइंग ७४७ विमानात स्फोट. ३२९ ठार.
१९९८: दुसर्या महायुद्धात जपानच्या शरणागतीची साक्षीदार असलेली यू. एस. एस. मिसुरी ही युद्धनौका निवृत्तीनंतर पर्ल हार्बर बंदरात दाखल झाली.
• मृत्यू :
• १७६१: बाळाजी बाजीराव तथा नानासाहेब पेशवे यांचे निधन. (जन्म: ८ डिसेंबर, १७२०)
• १९१४: भारतीय गुरु आणि तत्वज्ञ भक्तिविनाडो ठाकूर यांचे निधन. (जन्म: २ सप्टेंबर ,१८३८)
• १९३९: आधुनिक बालशिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते गिजुभाई बधेका यांचे निधन. (जन्म: १५ नोव्हेंबर, १८८५ – चितल, अमरेली, गुजराथ)
• १९८०: इंदिरा गांधी यांचा मुलगा संजय गांधी यांचे विमान अपघातात निधन. (जन्म: १४ डिसेंबर , १९४६)
• १९८२: बालगंधर्व आणि मास्टर कृष्णराव यांना ऑर्गनची साथ करणारे गंधर्व नाटकमंडळीतील नामवंत कलाकार हरिभाऊ देशपांडे यांचे निधन.
• १९९०: पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित चरित्र अभिनेते हरिन्द्रनाथ चट्टोपाध्याय यांचे निधन. (जन्म: २ एप्रिल ,१८९८ )
• १९९४: नाटककार, साहित्यिक वसंत शांताराम देसाई यांचे निधन.
२००५: साहित्यिक डॉ. हे. वि. इनामदार यांचे निधन. (जन्म: ३ नोव्हेंबर, १९२५ )
• २०१५: भारतीय नन, वकील, आणि समाजसेविका निर्मला जोशी यांचे निधन. (जन्म: २३ जुलै , १९३४)
- जन्म :
१८७७: भारतीय-इंग्लिश अभिनेते नॉर्मन प्रिचर्ड यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑक्टोबर१९२९)
१९०१: क्रांतिकारक राजेन्द्र नाथ लाहिरी यांचा जन्म. (बलिदान दिन : १७ डिसेंबर १९२७)
१९२० : संघ प्रचारक, जनसंघ व भाजपचे नेते, गोवा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, संसदपटू, वक्ते कर्नाटक सिंह खासदार श्री जगन्नाथ राव जोशी यांचा जन्म ( मृत्यू : १५ जुलै, १९९१ )
१९३५: मराठी लेखक राम कोलारकर यांचा जन्म. . (मृत्यू: १० ऑग, २०१९)
१९४२: दिग्दर्शक जब्बार पटेल यांचा जन्म.