अशी पाखरे येती

आज सोमवार, डिसेंबर ३०, २०२४ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर पौष ९, शके १९४६
आजचे पंचांग
सूर्योदय : ०७:११ सूर्यास्त : १८:११
चंद्रोदय : चंद्रोदय नहीं चंद्रास्त : १७:३६
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
दक्षिणायन
ऋतु : हेमंत
चंद्र माह : मार्गशीर्ष
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : अमावस्या – ०३:५६, डिसेंबर ३१ पर्यंत
नक्षत्र : मूळ – २३:५७ पर्यंत
योग : वृद्धि – २०:३२ पर्यंत
करण : चतुष्पाद – १६:०२ पर्यंत
द्वितीय करण : नाग – ०३:५६, डिसेंबर ३१ पर्यंत
सूर्य राशि : धनु
चंद्र राशि : धनु
राहुकाल : ०८:३४ ते ०९:५६
गुलिक काल : १४:०४ ते १५:२६
यमगण्ड : ११:१९ ते १२:४१
अभिजितमुहूर्त : १२:१९ ते १३:०३
दुर्मुहूर्त : १३:०३ ते १३:४७
दुर्मुहूर्त : १५:१५ ते १५:५९
अमृत काल : १७:२४ ते १९:०२
वर्ज्य : ०७:३४ ते ०९:१२
वर्ज्य२२:१९ ते २३:५७
अशी पाखरे येती, आणिक स्मृति ठेवुनी जाती
दोन दिसांची रंगतसंगत, दोन दिसांची नाती ॥ ध्रु ॥
चंद्र कोवळा, पहिला वहिला, झाडामागे उभा राहिला
जरा लाजुनि, जाय उजळुनी, काळोखाच्या राती ॥ १ ॥
फुलून येता फुल बोलले, मी मरणावर हृदय तोलले
नव्हते नंतर, परी निरंतर, गंधित झाली माती ॥ २ ॥
हात एक तो हळु थरथरला, पाठीवर मायेने फिरला
देवघरातिल समईमधुनी, अजून जळती वाती ॥ ३ ॥
कुठे कुणाच्या घडल्या भेटी, गीत एक मोहरले ओठी
त्या जुळल्या हृदयांची गाथा, सूर अजुनही गाती ॥ ४ ॥
• २०१५: भारतीय कवी, नाटककार, आणि अनुवादक पद्मभूषण पुरस्कार सन्मानित मंगेश पाडगावकर यांचे निधन. (जन्म: १० मार्च १९२९)
“हिन्दु जागरणाचा सरसेनानी” : मोरेश्वर नीळकंठ पिंगळे उपाख्य मोरोपंत . मोरोपंत हे डॉ. हेडगेवार व श्री गुरुजी यांचे मार्गदर्शन मिळालेल्यांपैकी एक आहेत. सन १९४१ मध्ये पदवी घेतल्यानंतर ते सन १९४६ मध्ये पूर्ण वेळ संघ प्रचारक झाले. १९४६ मध्ये वयाच्या २६व्या वर्षी त्यांना महाराष्ट्राचे सहप्रांतप्रचारक म्हणुन नियुक्ती मिळाली. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येत ’सरसंघचालक गुरुजी गोळवलकर यांचा हात असल्याच्या अफवां’मुळे पडलेली संघाच्या विविध शाखांमधील दरी बुजविण्याचे कार्य केले.
सन १९८१ मध्ये मीनाक्षीपुरम् येथे शेकडो हिंदूंना बाटवले गेले. असे पुन्हा होऊ नये त्यासाठी पिंगळे यांनी १९८३ साली विश्व हिंदू परिषदेद्वारे एकात्मता यात्रेची मुहूर्तमेढ रोवली..त्यांच्या संघटना कौशल्यामुळे मोरोपंतांना या यात्रेचे नियोजन, परस्पर समन्वय व क्रियान्वयनाची जबाबदारी दिली गेली. या कामासाठी मोरोपंत भारतभर फिरले. एकात्मता यात्रेच्या रथाच्या त्यांनी निवडलेल्या परिणामकारक मार्गामुळे त्या यात्रेचा प्रभाव निश्चित वाढला.
मोरोपंत पिंगळे यांचे कडे विश्व हिंदू परिषदेच्या कामाची जबाबदारी आली…
मोरोपंत तसे विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी नव्हते. त्यांनीच आपल्या प्रतिभेने रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनला दिशा दिली. १९९० ची कारसेवा, शिलान्यासाचा कार्यक्रम, राममंदिरासाठी प्रत्येक खेडयातून एक वीट (रामशीला) घेऊन जाण्याचा कार्यक्रम, अशा विविध कार्यक्रमांमुळे रामजन्भूमी मुक्ती आंदोलन हे जनआंदोलन झाले. स्वातंत्र्यानंतर फार मोठे जनआंदोलन उभे करण्याचे काम संघ माध्यमातून तशा अर्थाने प्रथमच झाले.
सन १९८३ मध्ये झालेल्या एकात्मता यात्रेपाठोपाठच, राम-जानकी रथयात्रा काढण्यात आली.ही राम जन्मभूमी आंदोलनाची पूर्वतयारी होती.या यात्रेचा उद्देश, हिंदूंना संघटित करणे तसेच त्यांच्यामध्ये अभिमानाची भावना जागृत करणे, हा होता. बिहार व उत्तर प्रदेश या प्रांतांमधून सात रथ प्रवास करत करत अयोध्येला पोचले. या रथांमध्ये भगवान श्रीराम हे अयोध्येत तुरुंगात आहेत असे दाखविण्यात आले होत. मोरोपंतांना या यात्रेचे संयोजक व नियंत्रक म्हणून नेमण्यात आले होते. सन १९८६ मध्ये, फैजाबाद न्यायालयाने हिंदू समाजाची जागरूकता जाणून घेऊन अयोध्येतील राममंदिराचे कुलूप काढण्याचा आदेश दिला. पुढे श्री राम जन्म भूमी मुक्ती संघर्षात वेळोवेळी पार पडलेले टप्पे तसेच ६ डिसेंबर, १९९२ रोजी परकीय आक्रमक बाबराची मिटवलेली नाम निशाणी हे मा. मोरोपंतांच्या कुशल नेतृत्वाचे यश आहे. आणि आता प्रत्यक्ष मंदिर उभारण्याचे कार्य सुरु झालेले आहे.
संघ प्रचारक म्हणून झालेल्या त्यांच्या ६५ वर्षांच्या सेवेत, त्यांनी विविध पदे भूषविली. त्यातील, ‘अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख’ हे पद सर्वोच्च होते. सन १९७५ मध्ये भारतात लागू केलेल्या आणीबाणीच्या काळात ते सहा सरसंघचालकांपैकी एक होते. भारतीय प्रसारमाध्यमांनी, रामजन्मभूमी आंदोलनादरम्यान त्यांचा “फील्ड मार्शल” म्हणून गौरव केला.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक प्रकल्प सुरु करण्यात आले: गौ-संशोधन, सरस्वती नदी शोध, इतिहास पुनर्लेखन ही त्यातील काही उदाहरणे. त्यामुळे त्यांना संघाचा प्रकल्प पुरुष ही पदवी मिळाली. ते प्रसिद्धिपराङ्मुख होते. त्यांचे वर्णन ‘सर्वच ठिकाणी पण कशातच नाही’ असे करता येऊ शकेल. ते आपले जीवन संघाचा खरा स्वयंसेवक म्हणून जगले.
१९१९ : हिंदुत्व जागरणाचे सरसेनापती मोरेश्वर नीळकंठ पिंगळे उपाख्य मोरोपंत यांचा जन्म ( मृत्यू : २१ सप्टेंबर, २००३ )
- घटना :
१९०६: ऑल इंडिया मुस्लिम लीगची ढाका येथे स्थापना. या घटनेतच भारताच्या फाळणीची बीजे रोवली गेली.
१९२४: एडविन हबलने आकाशगंगे खेरीज इतर दीर्घिकाही अस्तित्त्वात असल्याचे जाहीर केले.
१९४३: सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअर येथे भारतीय स्वातंत्र्याचा झेंडा फडकविला.
२००६: इराकचे माजी राष्ट्रपती सद्दाम हुसेन यांना फाशी देण्यात आली. - मृत्यू :
१९७१: भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार पद्मविभूषण डॉ. विक्रम साराभाई यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट, १९१९)
• १९७४ : निष्ठावान समर्थभक्त, समर्थ वाङ्मयाचे आणि संप्रदायाचे अभ्यासक व प्रकाशक शंकर श्रीकृष्ण देव यांचे निधन (जन्म : २८ जानेवारी , १८९५ )
• १९८२: चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक दत्ता उर्फ दादा धर्माधिकारी यांचे निधन. (जन्म: २ डिसेंबर १९१३ )
• १९८७: संगीतकार दत्ता नाईक ऊर्फ एन. दत्ता यांचे निधन. (जन्म : १२ डिसेंबर, १९२७)
• १९९०: भारतीय लेखक, कवी आणि समीक्षक रघुवीर सहाय यांचे निधन. (जन्म: ९ डिसेंबर १९२९)
• २०१८ : दिग्दर्शक मृणाल सेन यांचे निधन ( जन्म : १४ मे, १९२३ )
- जन्म :
१८७९: भारतीय तत्त्ववेत्ते वेंकटरमण अय्यर तथा योगी रमण महर्षी यांचा जन्म. (मृत्यू: १४ एप्रिल १९५०)
१८८७: मुंबईचे पहिले गृहमंत्री डॉ. कन्हैय्यालाल मुन्शी यांचा जन्म. (मृत्यू: ८ फेब्रुवारी १९७१)
१९०२: भाषाशास्त्रज्ञ डॉ. रघू वीरा यांचा जन्म. (मृत्यू: १४ मे १९६३)
१९२३: भारतीय शैक्षणिक व राजकारणी प्रकाश केर शास्त्री यांचा जन्म. (मृत्यू: २३ नोव्हेंबर १९७७)