स्वामी स्वरूपानंद

आज शुक्रवार, डिसेंबर २७, २०२४ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर पौष ६, शके १९४६
आजचे पंचांग
सूर्योदय : ०७:१० सूर्यास्त : १८:१०
चंद्रोदय : ०४:४२, डिसेंबर २८ चंद्रास्त : १५:०५
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
दक्षिणायन
ऋतु : हेमंत
चंद्र माह : मार्गशीर्ष
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : द्वादशी – ०२:२६, डिसेंबर २८ पर्यंत
नक्षत्र : विशाखा – २०:२८ पर्यंत
योग : धृति – २२:३७ पर्यंत
करण : कौलव – १३:३९ पर्यंत
द्वितीय करण : तैतिल – ०२:२६, डिसेंबर २८ पर्यंत
सूर्य राशि : धनु
चंद्र राशि : तूळ – १३:५७ पर्यंत
राहुकाल : ११:१७ ते १२:४०
गुलिक काल : ०८:३२ ते ०९:५५
यमगण्ड : १५:२५ ते १६:४७
अभिजितमुहूर्त : १२:१८ ते १३:०२
दुर्मुहूर्त : ०९:२२ ते १०:०६
दुर्मुहूर्त : १३:०२ ते १३:४६
अमृत काल : १०:४९ ते १२:३५
वर्ज्य : ००:४६, डिसेंबर २८ ते ०२:२९, डिसेंबर २८
।। संजीवन समाधीत, बैसले ज्ञानदेव,।
। पावसी तेचि परि, स्वरूपानंद स्वामीराव ।।
।। स्वरूपस्थितीचाही, पुसलासे तेथ ठाव, ।
। मी जाणीव नेणीव लोपुनि, विश्वाकार झाला भाव ।।
।। प्राण ठेला सहस्त्रारी, पिंड मिळाला ब्रम्हांडी, ।
। परि विश्वकल्याणाची, अंतरी असे हाव ।।
।। कृष्णदास म्हणे घेई, जो जो दर्शनासी धाव, ।
। फळतसे तेथे त्वरित, मनीचा त्याचा भाव ।।
स्वामी स्वरूपानंद – ( पावस ) यांची जयंती आहे. (जन्म : मार्गशीर्ष वद्य द्वादशी शके १८२५ (१२ डिसेंबर १९०३) – समाधी दिन – समाधी: श्रावण वद्य द्वादशी शके १८९६ (१५ ऑगस्ट १९७४ )
‘इश्क़ ने ग़ालिब निकम्मा कर दिया।
वर्ना हम भी आदमी थे काम के ।।’
किंवा मग,
‘यह इश्क़ नहीं आसाँ बस इतना समझ लिजे।
इक आग का दरिया है और डुब के जाना है।।‘
मिर्झा असदुल्लाखान गालिब एक प्रसिद्ध फारसी आणि उर्दू कवी होते. ते सुधारक वृत्तीचे, सर्व धर्मांना समान मानणारे, कर्मठ नसलेले, नमाज पढणारे, रोजा ठेवणारे, कलेचे आसक्त, रसिक व्यक्ती होते. गालिब केवळ चार वर्षांचे असतांना त्यांचे वडील वारले म्हणून आजोबा आणि काकांनी पालनपोषण केले.
लहानपणी त्यांनी इस्लामचे धडे घेतले, फारसी भाषा शिकले.
मिर्झा गालिब हे थोरल्या बाजीरावांची पत्नी मस्तानी हिच्या वंशात जन्माला आले होते.
गालिब यांनी फारसी भाषेत लिखाण काम सुरू केले. त्यांच्या साहित्यात जीवनाचे गंभीर तत्त्वज्ञान त्यांनी मांडले. वयाच्या ११व्या वर्षापासून गालिब शेर लिहीत होते. जीवनाच्या झळा सोसून मिर्झा गालिबने त्या सुंदर करून काव्यातून मांडल्या. त्यांनी एकूण १८,००० च्या वर शेर फारसी भाषेत रचले. पुढे मित्रांच्या आग्रहाखातर त्यातीलच १०००-१२०० शेर त्यांनी उर्दू भाषेत लिहिले.
गालिब यांनी कधी कोणताही उद्योग-धंदा केला नाही. मित्रांच्या आणि नातेवाईकांच्या सहकार्याने ते राहत. त्यांना स्वतःला प्रसिद्धी मिळविण्याची गरज वाटली नाही. उत्तर मोगल काळातील राजांच्या, उमरावांच्या दरबारी जाणेही त्यांना आवडत नसे. ते म्हणत माझ्या कविता माझ्या मृत्यूनंतरही अजरामर राहणार असल्याने माझे नाव आपोआपच सर्वत्र पसरणार.
गालिबच्या काव्यावर मीर आणि आमीर खुसरो यांच्या रचनांचा प्रभाव होता. साहित्य निर्मिती करताना केवळ चौकट मोडून चालत नाही. त्यात तितकी ताकदही असावी लागते. गालिबने परंपरेला नावीन्याची झालर लावली. अभिजात सौंदर्याची बूज राखायला शिकवले. घराण्यातच सैनिकी पार्श्वभूमी असल्याने गालिबमध्ये बंडखोरीचे बीज होते.
मिर्झा गालिब यांच्यावर हिंदीत १९५४ साली एक चित्रपट निघाला असून दुसरा १९८८ साली दूरचित्रवाणीसाठी बनवला होता. पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शक सोहराब मोदी तर दुसऱ्या चित्रपटाचे गुलझार होते.
१७९७: उर्दू कवी मिर्झा गालिब यांचा आग्रा येथे जन्म. (मृत्यू: १५ फेब्रुवारी १८६९)
- घटना :
१९११: कॉंग्रेस अधिवेशनात जन गण मन राष्ट्रगीत पहिल्यांदा गायले गेले.
१९१८: बृहद पोलंडमध्ये पोलिश लोकांचे जर्मन सत्तेविरूद्ध बंड पुकारले गेले.
१९४५: २८ देशांनी एकत्रित जागतिक बँक (World Bank) आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund) स्थापन केले.
१९४५: कोरिया देशाची फाळणी झाली.
१९४९: इंडोनेशिया देशाला नेदरलँड्स पासून स्वातंत्र्य मिळाले.
१९७५: बिहारमधील (हल्लीचे झारखंड) चासनाला येथे कोळशाच्या खाणीत अचानक पाणी शिरून झालेल्या दुर्घटनेत ३७२ कामगार ठार झाले.
१९७८: ४० वर्षाच्या हुकुमशाहीनंतर स्पेन प्रजासत्ताक बनले.
२००४: मॅग्नेटर एसजीआर १८०६-२० ला स्फोट झाल्यामुळे उत्सर्जित किरण पृथ्वीला पोहोचते.
२००७: पाकिस्तानातील माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांची गोळी मारून हत्या करण्यात आली. - मृत्यू :
१९४९: भालकर भोपटकर यांचे निधन.
१९६५: मराठी साहित्यिक, ज्ञानोदयचे संपादक देवदत्त नारायण टिळक यांचे निधन.
१९९७: मराठी भावगीत गायिका मालती पांडे-बर्वे यांचे निधन. (जन्म: १९ एप्रिल, १९३०)
२००२: आसामी लोकगीत गायिका पद्मश्री प्रतिमा बरुआ-पांडे यांचे निधन. (जन्म: ३ ऑक्टोबर, १९३४)
२०१३: अभिनेता फारुख शेख यांचे निधन. ( जन्म:२५ मार्च , १९४८ )
- जन्म :
१८९८: विदर्भातील सामाजिक नेते, शिक्षण प्रसारक आणि केंद्रीय कृषिमंत्री पंजाबराव देशमुख यांचा जन्म. (मृत्यू: १० एप्रिल , १९६५)
१९२७: उत्तराखंडचे पहिले मुख्यमंत्री नित्यानंद स्वामी यांचा जन्म. (मृत्यू: १२ डिसेंबर , २०१२)
१९४४: हिन्दी चित्रपट आणि टीव्ही अभिनेता विजय अरोरा यांचा जन्म. (मृत्यू: २ फेब्रुवारी, २००७)