औषध शास्त्रज्ञ अमृत मोदी

सुप्रभात
आज रविवार,
जानेवारी २९, २०२३ रोजीचे
पंचांग आणि दिनविशेष
युगाब्द : ५१२४
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक आज सौर माघ ०९, शके १९४४
सूर्योदय : ०७:१४ सूर्यास्त : १८:३०
चंद्रोदय : १२:३७ चंद्रास्त : ०१:५६, जानेवारी ३०
शक सम्वत : १९४४
संवत्सर : शुभकृत्
उत्तरायण
ऋतू : शिशिर
चंद्र माह : माघ
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : अष्टमी – ०९:०५ पर्यंत
नक्षत्र : भरणी – २०:२१ पर्यंत
योग : शुभ – ११:०५ पर्यंत
करण : बव – ०९:०५ पर्यंत
द्वितीय करण : बालव – २१:३३ पर्यंत
सूर्य राशि : मकर
चंद्र राशि : मेष – ०२:४६, जानेवारी ३० पर्यंत
राहुकाल : १७:०५ ते १८:३०
गुलिक काल : १५:४१ ते १७:०५
यमगण्ड : १२:५२ ते १४:१६
अभिजित मुहूर्त : १२:२९ ते १३:१४
दुर्मुहूर्त : १७:०० ते १७:४५
अमृत काल : १५:१८ ते १६:५९
।निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूलें ।
स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूलें ।। – मा. राजेंद्रसिंहजी.
१९५२ मध्ये संघ स्पर्श झाल्यांनंतर तरुण वयात रज्जूभैय्यांनी संघात विविध जबाबदाऱ्या पार पडल्या. गणमान्य अणुसंशोधक असलेल्या मा. रज्जूभैय्यांनी १९६६ मध्ये अलाहाबाद विश्वविद्यालयात प्राध्यापक पदाचाराजीनामा देऊन संघ कार्याला पूर्णवेळ प्रचारक स्वरूपात वाहून घेतले. उत्तर प्रदेशात विविध जबाबदाऱ्या सांभाळत संघाचे सरकार्यवाह ते सरसंघचालक पदाचे दायित्व निभावले. आणिबाणिच्या काळ्या कालखंडात भूमिगत राहुन संघ नेतृत्व केले. म्हणुनच पु सरसंघचालक बाळासाहेब देवरस नेहमी म्हणायचे एक सरसंघचालक कारावासात असला तरी संघाचे पाच सरसंघचालक तुरुंगाबाहेर बाहेर सक्षमतेने संघ कार्याची धुरा वाहत आहेत.
१९२२: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ४ थे सरसंघचालक प्रो. राजेंद्र सिंग ऊर्फ रज्जू भैय्या यांचा जन्म. (मृत्यू: १४ जुलै २००३)
अमृत विठ्ठलदास मोदी-
यांचा जन्म गुजरातेतील नडियाद येथे झाला. युनिकेम’ या औषध उद्योगातल्या ख्यातनाम कंपनीचे ते संस्थापक आणि अध्यक्ष होते. त्यांचे वडील प्राथमिक शाळेत शिक्षक होते. मुंबईतल्या विल्सन महाविद्यालयातून बी.एस्सी.ची पदवी प्रथम वर्गात मिळवल्यावर मोदी आय.सी.एस. होण्यासाठी लंडनला गेले. परंतु त्या परीक्षेत त्यांना यश मिळाले नाही. तरीही त्या अपयशाने खचून न जाता तेथूनच एम.एस्सी.ची गणितातली पदवी प्राप्त करून ते भारतात परत आले.
मोदी यांनी मुंबईत महालक्ष्मी मंदिराच्या पायथ्याशी एका गॅरेजमध्ये १९४४ साली शंभर टक्के भारतीय मालकीच्या आणि व्यवस्थापनाच्या औषधनिर्माण उद्योगाची सुरुवात केली. हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या भारतीय मालकीच्या कंपन्या औषध उद्योगात होत्या. त्या वेळी आधुनिक तंत्राने अॅलोपथिक औषधांची निर्मिती करून त्यांनी परदेशी कंपन्यांशी टक्कर दिली.
त्याच प्रयत्नांमधून १९५४ साली त्यांनी मधुमेहाचे औषध ‘इन्शुलीन’चा उत्पादन खर्च लक्षणीयरीत्या कमी केला. साहजिकच त्याच्या विक्रीची किंमतही चांगलीच उतरली. आपल्या देशातील रुग्णांना परवडणाऱ्या किंमतीत हे औषध उपलब्ध व्हावे अशी त्यांची धडपड होती. त्यांच्या स्वदेशी भावनेचा तो आविष्कार होता.
याच प्रकारे खुली स्पर्धा निर्माण झाल्यावर मूलभूत रसायन उद्योगातल्या किमती सरकारने (बी.आय.सी.पी.ने) बांधून दिलेल्या दराच्या खाली घसरल्या त्या स्पर्धेमुळे, सरकारी औषधनियंत्रणामुळे नव्हे। आपल्या देशातला औषधनियंत्रण कायदा १९४० सालचा आहे.
जगभरची केमोथेरपीची प्रगतीही १९४० सालानंतरची आहे. १९४४ साली ‘फार्मास्युटिकल्स’ हा तसा जगभरच नवीन धंदा होता. ज्या वेळी औषधे ही भारतात फक्त आयात करण्याचा जमाना होता, तेव्हा त्यांनी कुठल्याही ‘सवलतीं’ची वाट न पाहता, औषधे तयार करून थायलंडसारख्या खऱ्याखुऱ्या खुल्या बाजारात १९५४ सालापासून निर्यात केली. १९५९ साली दूरदृष्टीने मूलभूत रसायननिर्मितीच्या कारखान्याची मुहूर्तमेढ परदेशी सहकार्याच्या (यु-सी-बी, बेल्जियम) मदतीने केली.
स्वदेशी म्हणजे नवीन तंत्रज्ञानाकडे पाठ फिरवणे किंवा जागतिक बाजारपेठेकडे दुर्लक्ष करणे नव्हे, हे त्यांनी कृतीने दाखवले. ही नवीन तंत्रज्ञानाची आयात फक्त रसायननिर्मितीबद्दल ठेवून यंत्रसामग्री मात्र भारतीय अभियांत्रिकी उद्योगावर पूर्ण विश्वास ठेवून भारतीय बनावटीची ठेवली.
औषध उद्योगासंबंधी लागणारी यंत्रे बनवणाऱ्या आजच्या अनेक कारखान्यांची सुरुवात मोदींच्या कारखान्यासाठीची यंत्रे पुरवून झालेली आहे. ते यशस्वी तंत्रज्ञ-उद्योजक तर होतेच, पण त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते अनेक व्यवस्थापकांचे गुरु होते. त्यांच्या हाताखालून गेलेले अनेक उद्योजक, व्यवस्थापक त्यांच्या-त्यांच्या व्यवसायांत नाव मिळवून आहेत. प्रयोग करून पाहण्याची त्यांनी त्या लोकांना दिलेली संधी मोलाची होती.
त्यांचा कारखाना हे एक प्रकारचे विद्यालयच होते. त्या वेळी मुंबईमध्येच काय, पण महाराष्ट्रातही औषधनिर्मितीचे शिक्षण घेण्याची सोय नव्हती. तेव्हा देशातील तरुणांनी हे शिक्षण घेऊन औषधनिर्मिती उद्योगात मोलाची भर घालावी या उद्देशाने त्यांनी श्री. रेप्टाकोस यांच्याबरोबर ‘बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी’ या शिक्षणसंस्थेची स्थापना केली. ‘मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह्ज’, व्हॅल्यू इंजिनिअरिंगचा औषध उद्योगातला पहिला वापर त्यांच्या कंपनीत झाला.
जागतिक पातळीवर स्पर्धा करायची असेल, तर भारतीय कंपन्यांचे व्यवस्थापन व्यावसायिक व तोडीस तोड असे असायला हवे. खुल्या बाजारात टिकून राहायला हवे तर उत्पादने आंतरराष्ट्रीय दर्जाची हवीत, म्हणजे तिथे खपवता आली पाहिजेत, हे त्यांनी ओळखले होते. त्यांच्या विचारातला हा युयुत्सू स्वदेशीचा गाभा मोलाचा होता. पन्नासच्या दशकात भारतात राष्ट्रीय उत्पादकता परिषदेची स्थापना झाली.
भारतातल्या औषधउद्योगात कामगारांसाठी ‘इन्सेन्टिव्ह बोनस’ची सुरुवात सर्वप्रथम झाली ती मोदींच्या जोगेश्वरीच्या कारखान्यात, १९६१ साली. अमृत मोदींचे गुरुत्व विविध क्षेत्रातल्या अग्रक्रमाबद्दल आहे. विषय स्वदेशी उद्योग स्थापन करण्याचा असो, बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी सुरू करण्याचा असो, एकस्व कायद्यात स्वदेशहिताचा बदल करून घेण्याचा असो, व्यवस्थापनकलेतल्या नवनव्या कल्पना वापरण्याचा असो, अमृत मोदींनी त्यात भाग घेतलेला आहे. ‘आचार्य प्रफुल्लचंद्र रे पुरस्कार’, ‘पद्मभूषण’ हा भारत सरकारचा मानाचा पुरस्कार त्यांना १९७२ साली मिळाला. त्यांनी अनेक सरकारी समित्यांवर वेगवेगळ्या पदे भूषविली.
१९९९ : औषध शास्त्रज्ञ अमृत विठ्ठलदास मोदी यांचे निधन (जन्मः २२ मे १९१४)
घटना:
१७८०: जेम्स ऑगस्टस हिकी यांनी कलकत्ता जनरल अॅडव्हर्टायझर या नावाने एक साप्ताहिक सुरू केले. पुढे याचे वर्तमानपत्रात रुपांतर झाले.
१८६१: कॅन्सास हे अमेरिकेचे ३४ वे राज्य बनले.
१८८६: कार्ल बेंझ यांना जगातील पहिल्या इंजिनवर चालणार्या मोटरगाडीचे पेटंट मिळाले.
१९७५: इंडियन नॅशनल थिएटर निर्मित ती फुलराणी या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईतील रविंद्र नाट्यमंदिर येथे झाला.
१९८९: हंगेरीने दक्षिण कोरियाबरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित केले.
• मृत्यू :
• १९६३: लेखक व संपादक सदाशिव आत्माराम जोगळेकर यांचे निधन. (जन्म १९ नोव्हेंबर , १८९७ )
•१९९३: गणितज्ञ रँग्लर गोपाळकृष्ण लक्ष्मण चंद्रात्रेय यांचे निधन.
•१९९५: रुपेरी पडद्यावरील खलनायक, निर्माते व दिग्दर्शक रुपेश कुमार यांचे निधन. (जन्म : १६ जानेवारी, १९४६)
•२०००: बासरीवादक देवेन्द्र मुर्डेश्वर यांचे निधन. (जन्म : १९ सप्टेंबर , १९२३ )
•२०००: शिवसेना नेते पांडुरंग सावळाराम तथा काका वडके यांचे निधन.
जन्म :
१८५३: ओडिया साहित्यिक मधुसूदन राव यांचा जन्म. (मृत्यू : २८ दिसंबर १९१२ )
१९७०: ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता भारतीय नेमबाज राज्यवर्धनसिंग राठोड यांचा जन्म.
आपला दिवस मंगलमय जावो