जे. आर. डी. टाटा

आज सोमवार, जुलै २९, २०२४ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर श्रावण दिनांक ७, शके १९४६
आजचे पंचांग
सूर्योदय : ०६:१४ सूर्यास्त : १९:१५
चंद्रोदय : ०१:१५, जुलै ३० चंद्रास्त : १३:५७
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
दक्षिणायन
ऋतु : ग्रीष्म
चंद्र माह : आषाढ़
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : नवमी – १७:५५ पर्यंत
नक्षत्र : भरणी – १०:५५ पर्यंत
योग : गण्ड – १७:५५ पर्यंत
करण : तैतिल – ०६:३८ पर्यंत
द्वितीय करण : गर – १७:५५ पर्यंत
क्षय करण : वणिज – ०५:१७, जुलै ३० पर्यंत
सूर्य राशि : कर्क
चंद्र राशि : मेष – १६:४५ पर्यंत
राहुकाल : ०७:५२ ते ०९:३०
गुलिक काल : १४:२२ ते १६:००
यमगण्ड : ११:०७ ते १२:४५
अभिजितमुहूर्त : १२:१९ ते १३:११
दुर्मुहूर्त : १३:११ ते १४:०३
दुर्मुहूर्त : १५:४७ ते १६:३९
अमृत काल : ०६:१७ ते ०७:५०
वर्ज्य : २२:३९ ते ००:१३, जुलै ३०
आज आतंरराष्ट्रीय ‘व्याघ्र’ दिन आहे.
आज विषमता विरोध दिन आहे.
उद्योजक जे. आर. डी. टाटा यांनी १९२९ साली त्यांनी वैमानिकाचा परवाना मिळवला. वैमानिकाचा परवाना मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले. इ.स. १९३२ साली त्यांनी टाटा एरलाईन्स या पहिल्या भारतीय प्रवासी विमानवाहतूक कंपनीची स्थापना केली. पुढे इ.स. १९४६ साली तिचे नाव बदलून एर इंडिया ठेवले गेले.
वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी म्हणजे इ.स. १९३८ साली ते टाटा सन्स उद्योगसमूहाचे चेअरमन बनले. ते प्रदीर्घ काळ त्या पदावर होते. त्यांनी पदभार सांभाळला तेव्हा टाटा सन्स उद्योगसमूहाच्या १४ कंपन्या होत्या.
टाटांच्या काळात ९१ कंपन्यांची भर पडली. रसायन, वाहन, चहा, माहिती, हॉटेले आणि तंत्रज्ञान अश्या नवीन क्षेत्रांत त्यांनी टाटा उद्योगसमूहाचा विस्तार केला. टाटांच्या पुढाकाराने इ.स. १९५६ साली कंपनीतील कामगारांच्या कल्याणासाठी खास योजना राबविण्यात आली. त्यामध्ये ‘दिवसातून आठ तास काम’, ‘मोफत आरोग्यसेवा’, ‘भविष्य निर्वाह निधी’ आणि ‘अपघात विमा योजना’ अश्या पायाभूत गोष्टींचा समावेश करण्यात आला होता. पुढे या योजना भारतीय केंद्र शासनाने सर्व उद्योग-व्यवसायांसाठी कायदेशीर रित्या बंधनकारक केल्या.
टाटांच्या कारकिर्दीत उद्योगसमूहाच्या विस्ताराबरोबरच इतर अनेक संस्था स्थापन झाल्या. भारतात मूलभूत संशोधन व्हावे म्हणून त्यांनी इ.स. १९३६ साली टाटा समाजविज्ञान संस्था आणि इ.स. १९४५ साली टाटा मूलभूत संशोधन संस्था या संशोधनसंस्था स्थापण्यात पुढाकार घेतला.
आशियातील पहिले कर्करोग रुग्णालय इ.स. १९४१ साली मुंबईत सुरू केले.
टाटांना त्यांच्या हयातीत अनेक पुरस्कार मिळाली. भारतीय केंद्रशासनातर्फे त्यांना इ.स. १९५७ साली पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले, तर इ.स. १९९२ साली त्यांना भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानाने भूषवण्यात आले.
१९० ४ : ज्येष्ठ भारतीय उद्योजक, भारतातील पहिले वैमानिक तसेच भारतीय हवाई वाहतुकीचे जनक जे. आर. डी. टाटा उर्फ जहांगीर रतनजी दादाभॊय यांचा जन्म ( मृत्यू : २९ नोव्हेंबर, १९९३ )
व्यंगचित्रकार शि.द. फडणीस – जे.जे.मधील शिक्षण पूर्ण झाल्यावर आणि व्यंगचित्रकलेची अतिशय आवड असल्याने शि.द. फडणीस हे अनंत अंतरकर यांच्या मदतीने पुण्याला गेले. तेंव्हापासून त्यांची चित्रे ’हंस’, ’मोहिनी’, ’नवल’, या मासिकांतून आणि अनेक पुस्तके व नियतकालिकांतून प्रसिद्ध होत राहिली. पुढे १९५२ सालापासून सलग साठ वर्षं अंतरकरांच्या ‘मोहिनी’च्या दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ रेखाटण्याचा विक्रमही शिदं नी केला.
त्यांची अनेक चित्रे इंटरनॅशन सलून ऑफ कार्टून्स, माँत्रियाल, कॅनडा येथेही प्रदर्शित करण्यात आली आहेत. त्यांचे हसरी गॅलरी , ‘चित्रहास’, ‘चिमुकली गॅलरी’ ही चित्रांची प्रदर्शनेही ४० वर्षांत जवळजवळ २० वेगवेगळ्या शहरात मांडण्यात आली आहेत..
आपल्या ठसठशीत आणि लयबद्ध शैलीने फडणीस यांनी पाच दशकांहून अधिक वर्षे वाचकांना हसवले आहे. व्यंग्यचित्रे ही नेहमी वेडीवाकडी असतात, त्यांत नेहमी बोचरी टीका असते, असे समज फडणिसांच्या चित्रांनी खोटे ठरवले. विसंगती टिपणारे अनेक प्रसंग त्यांनी आपल्या व्यंग्यचित्रांतून रेखाटले, आणि विसंगतीतून किती निर्विष, सुखावणारा विनोद निर्माण करता येतो, याचा वस्तुपाठ घालून दिला. त्यांच्या शब्दविरहित चित्रांनी अनेक नियतकालिकांची, पुस्तकांची मुखपृष्ठे सजली. पु. ल. देशपांडे, चिं. वि. जोशी यांच्यासारख्या दिग्गज लेखकांच्या पुस्तकांची लज्जतही त्यांच्या चित्रांनी वाढवली.
चित्रकारांची चित्रे त्यांच्या परवानगीशिवाय वापरली जाऊ नयेत यासाठी, शि.द. फडणीस यांनी कायद्याच्या मदतीने प्रताधिकाराचे, म्हणजे कॉपीराइटचे हक्क चित्रकारांना मिळवून दिले.
१९२५ : विसंगती टिपणारे अनेक प्रसंग त्यांनी आपल्या व्यंग्यचित्रांतून रेखाटणारे ज्येष्ठ व्यंग चित्रकार शी. द. फडणीस ( यांचा जन्म) त्यांना जन्मदिनाच्या” हार्दिक शुभेच्छा ”
- घटना :
१८५२ : पुणे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर कॅंडी यांच्या हस्ते स्त्री शिक्षणाचे उद्गाते म्हणून महात्मा ज्योतिराव फुले यांचा सन्मान करण्यात आला
१८७६ : फादर आयगेन, डॉ . महेंद्र सरकार यांनी इंडियन असोसिएशन फॉर कल्टिव्हेशन ऑफ सायन्स ची स्थापना केली.
१९२० : जगातील पहिली टपाल सेवा अमेरिकेतील न्यूयॉर्क ते सॅन फ्रन्सिस्को या शहरा दरम्यान सुरु झाली.
१९४६ : टाटा एअर लाईन्स चे एअर इंडिया असे नामकरण झाले
१९५७ : इंटरनॅशनल ऑटोमिक एनर्जी ची एजन्सी ची स्थापना झाले.
१९८७ : भारत श्रीलंका ह्या देशांमध्ये शांतता करारावर सह्या करण्यात आल्या
२०१९ : तत्काळ तिहेरी तलाक’ किंवा ‘तलाक-उल-बिद्दत’ची इस्लामिक प्रथा नवऱ्याला तीन वेळा तलाक म्हणून लग्न संपवण्याची सवलत देते.
हा तलाक कोणत्याही प्रकारे कळवला जाऊ शकतो; तोंडी, टेक्स्ट मेसेजवर किंवा अगदी ई-मेल करूनही.
या प्रथेवर बंदी घालण्यासाठी अनेक महिलांनी सुप्रीम कोर्टाला अर्ज, विनंत्या पाठवल्यानंतर, ऑगस्ट महिन्यात कोर्टाने ही प्रथा घटनाबाह्य ठरवली.
प्रदीर्घ चर्चेनंतर लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही ऐतिहासिक तीन तलाक विधेयक अखेर मंजूर करण्यात आलं आहे. ९९ विरुद्ध ८४ मताने हे विधेयक मंजूर करण्यात आलं आहे.
• मृत्यू :
•१८९१ : पं. ईश्वरचन्द्र विद्या सागर यांचे निधन ( जन्म : २६ सप्टेंबर, १८२० )
•१९८७ : लेखक, कवी, नाटककार बिभूतिभूषण मुखोपाध्याय यांचे निधन ( जन्म : २४ ऑक्टोबर, १८९४ )
•१९९६ : भारतरत्न पुरस्कार सन्मानित (मरणोत्तर)स्वातंत्र्य सेनानी, अरुणा असिफ अली यांचे निधन ( जन्म : १६ जुलै, १९०९ )
•२००२ : गायक, संगीतकार सुधीर फडके उर्फ बाबूजी यांचे निधन ( जन्म : २५ जुलै, १९१९ )
२००३ : दारूच्या थेंबालाही स्पर्श न करता अनेक चित्रपटात दारुड्याची भूमिका जिंवंत करणारे, हिंदी चित्रपट विनोदी अभिनेते बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी उर्फ जॉनी वॉकर यांचे निधन ( जन्म : ११ नोव्हेंबर, १९२६ )
•२००६ : मराठी संत साहित्यातील विद्वान डॉ . निर्मल कुमार फडकुले यांचे निधन ( जन्म : १६ नोव्हेंबर, १९२८ )
•२००९ : जयपूरच्या राजमाता महाराणी गायत्री माता यांचे निधन ( जन्म : २७ मे, १९१९ )
- जन्म :
• १९२२ : लेखक , शिवचित्राचे अभ्यासक शिवशाहीर ब. मो. उर्फ बाबासाहेब पुरंदरे यांचा जन्म . ( मृत्यू : १५ नोव्हेंबर, २०२१ )
१९५३ : भजन गायक अनुप जलोटा यांचा जन्म