आजचे पंचांग

आज मंगळवार, सप्टेंबर २४, २०२४ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अश्विन २ शके १९४५
आजचे पंचांग
सूर्योदय : ०६:२८ सूर्यास्त : १८:३३
चंद्रोदय : २३:४७ चंद्रास्त : १२:४८
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
दक्षिणायन
ऋतु : वर्षा
चंद्र माह : भाद्रपद
पक्ष : शुक्ल पक्ष
चंद्र माह : भाद्रपद
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : सप्तमी – १२:३८ पर्यंत
नक्षत्र : मृगशीर्ष – २१:५४ पर्यंत
योग : व्यतीपात – ०१:२७, सप्टेंबर २५ पर्यंत
करण : बव – १२:३८ पर्यंत
द्वितीय करण : बालव – ००:१९, सप्टेंबर २५ पर्यंत
सूर्य राशि : कन्या
चंद्र राशि : वृषभ – ०९:५५ पर्यंत
राहुकाल : १५:३१ ते १७:०२
गुलिक काल : १२:३० ते १४:०१
यमगण्ड : ०९:२९ ते ११:००
अभिजितमुहूर्त : १२:०६ ते १२:५४
दुर्मुहूर्त : ०८:५३ ते ०९:४१
दुर्मुहूर्त : २३:१९ ते ००:०६, सप्टेंबर २५
अमृत काल : १३:११ ते १४:४६
‘आजि मेरो मन आनंद भयो
कानन कुंडल मुगुट सिरमो
ध्यान मो देखो षडभुज धारी
ताल मृदुंग धिमि धिमि धिमिता,
धिमि धिमि धिमिता
तधिन्न थै, तधिन्न थै कहत पुकारे सुत दिगंबर
दासो दिगंबरपंत देशपांडे ऊर्फ दासोपंत (इ.स. १५५१ – इ.स. १६१६) हे मराठी भाषेच्या इतिहासातील सर्वाधिक लेखन करणारे संत-कवी होते. यांचा जन्म शके १४७३मध्ये अधिक भाद्रपद कृष्ण अष्टमी रोजी सोमवारी झाला होता. ते संत एकनाथांचे समकालीन होते. दासोपंत दत्तात्रेयांचे परम भक्त होते. यांच्या एकूण रचनांची संख्या सुमारे ५ लाख ओव्यांपर्यंत समजली जाते. त्यांनी काही लिखाण दिगंबरानुचर या टोपणनावाखाली केले आहे.त्यांना संत सर्वज्ञ दासोपंत असेही म्हणतात.
संत सर्वज्ञ दासोपंत १६-१७ व्या शतकातले!
मध्ययुगातील नाथपंचक म्हणजे संत एकनाथ, जनीजनार्दन, रामा जनार्दन, विठा रेणुकानंदन आणि संत सर्वज्ञ दासोपंत हे होय. या पंचकातीलच नव्हे तर एकूणच आजवरच्या संत काव्यात सर्वाधिक, प्रचंड काव्यनिर्मिती करणारे संत म्हणजे दासोपंत होत. त्यांनी केवळ अफाट साहित्य निर्माण केले, असे नाही तर त्यातील वैविध्य, वैचित्र्य, विलक्षणता यामुळे त्यांचे साहित्य संत काव्यात आपली विशिष्टता सिद्ध करते. त्यांनी अंबाजोगाईत मंदिर परंपरेत धर्मसंप्रदायी उपासनेला कलात्मक अधिष्ठान दिले.
दासोपंतांनी शके १५३७मध्ये, माघ वद्य षष्ठी या दिवशी समाधी घेतली. त्यावेळी ते ६५ वर्षांचे होते. अंबेजोगाई(जिल्हा बीड) येथे नृसिंहतीर्थावर दासोपंतांची प्रशस्त समाधी आहे.
१५५१: प्रचंड कवी दासो दिगंबर देशपांडे ऊर्फ दासोपंत यांचा जन्म. (मृत्यू: २८ जानेवारी १६१६)
भारतीय क्रांतिकारक मॅडम भिकाजी रुस्तुम कामा – ” माझ्या स्वतंत्र भारताचा हा तिरंगा झेंडा मी हातात धरून फडकवीत आहे.
स्वातंत्र्यप्रेमी म्हणविणार्या या परिषदेतील सदस्यांना स्वतंत्र हिंदुस्थानचे मानचिन्ह असणारा हा तिरंगा आव्हान देत येथे फडकत आहे. या ध्वजाला प्रणाम करा.” –
दिनांक २२ ऑगस्ट, इ.स. १९०७ रोजी श्टुटगार्टड येथील आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत भारताचा झेंडा सर्वप्रथम फडकावतेवेळी मादाम कामा म्हणाल्या होत्या.
दादाभाई नौरोजी यांच्या सचिव म्हणून मादाम कामा यांनी काम केले. त्यांनी युरोपात युवकांना एकत्र करून भारताला स्वांतत्र्य मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यास प्रवृत्त केले. त्या युवकांना ब्रिटिश सरकारच्या बातम्या वेळोवेळी देत असत. कामांनी लंडनमध्ये पुस्तक प्रकाशन सुरू केले त्या विशेषेकरून देशभक्तिपर लिखाण असलेल्या पुस्तकांचे प्रकाशन करीत.
सावरकरांचे ‘१८५७ चा स्वांतत्र्य लढा’ हे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी कामांनी त्यांनी मदत केली. स्वांतत्र्य मिळविण्यासाठी झटणार्या क्रांतिकारकांना आर्थिक मदतीसह अन्य प्रकारची मदत त्या करत. इ.स. १९०७ साली जर्मनीतल्या श्टुटगार्ट येथे आंतरराष्ट्रीय साम्यवादी परिषद भरली होती. या परिषदेसाठी विविध देशांचे हजारावर प्रतिनिधी आले होते. त्या परिषदेत मादाम कामांनी साडी नेसून व भारतीय झेंडा घेऊन लोकांना भारताबद्दल माहिती दिली.
मादाम कामांनी श्टुटगार्ट येथे झेंडा फडकवल्यानंतर दरम्यानच्या काळात पहिल्या महायुद्धाची ठिणगी पडली आणि मादाम कामा यांना फ्रान्समध्ये स्थानबद्ध करण्यात आले. साधारण इ.स. १९३५ सालापर्यंत त्या तिथेच होत्या. त्यानंतर त्यांना भारतात परतण्याची परवानगी मिळाली आणि वयाच्या ७४ व्या वर्षी त्या परत मायदेशी आल्या. १९ ऑगस्ट, इ.स. १९३६ या दिवशी एका पारशी धर्मादाय रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.
१८६१: भारतीय क्रांतिकारक मॅडम भिकाजी रुस्तुम कामा यांचा जन्म. (मृत्यू: १९ ऑगस्ट, १९३६)
- घटना :
१६६४: नेदरलँड्सने न्यू ऍम्स्टरडॅम इंग्लंडच्या हवाली केले.
१८७३: महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
१९३२: पुणे करारावर महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पं. मदनमोहन मालवीय, बॅ. मुकुंदराव जयकर आदींच्या सह्या.
१९४६: हाँगकाँग येथे कॅथे पॅसिफिक एअरवेज ची स्थापना झाली.
१९४८: होंडा मोटार कंपनीची स्थापना.
१९६०: अणुशक्तीवर चालणाऱ्या यू. एस. एस. एंटरप्राइझ या जगातील पहिल्या विमानवाहू नौकेचे जलावतरण झाले.
१९७३: गिनी-बिसाऊला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य.
१९९४: सॅटॅनिक व्हर्सेस या कादंबरीचे वादग्रस्त लेखक डॉ. सलमान रश्दी यांच्यावरील मृत्युदंडाचा फतवा मागे.
१९९५: मृत्यूंजय कादंबरीसाठी शिवाजी सावंत यांना भारतीय ज्ञानपीठ या संस्थेतर्फे मूर्तिदेवी पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच मराठी लेखक आहेत.
१९९९: कैगा अणूशक्ती प्रकल्पाचे दुसरे युनिट कार्यान्वित झाले.
२००७: कर्णधार धोनीच्या नेतृवाखाली भारताने टी-२० विश्वकप जिंकला.
२०१४: मार्स ऑर्बिटरी मिशन (एमओएम) – भारतीय अंतराळ संशोधन संस्थेद्वारे (इसरो) प्रक्षेपण केलेल्या मार्स ऑर्बिटर ने मार्स ची कक्षा ओलांडली.
२०१५: मक्का शहरात हज चालू असताना चेंगराचेंगरीत ७१७ लोक ठार.
२०१९ : जगातील सर्वांत जुनी म्हणजे १७८ वर्षांपासून पर्यटन व्यवसायात कार्यरत असणारी ब्रिटनची थॉमस कूक ही कंपनी निधीअभावी अखेर बंद पडली आहे. पर्यटनासोबत हॉटेल, रीसॉर्ट, विमानसेवा आदी अनेक क्षेत्रांत विस्तारलेली ही कंपनी काही वर्षांपासून तोट्यात असून विशेष सरकारी पॅकेज अथवा अंतर्गत आपत्कालीन निधी उभारण्यात अपयशी ठरल्याने कंपनीचे कामकाज पूर्णत: बंद करण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगत या कंपनीला टाळे ठोकण्याचा निर्णय घोषित करण्यात आला.
• मृत्यू :
• १९९२: १३वे सरन्यायाधीश सर्वमित्र सिकरी यांचे निधन. (जन्म: २६ एप्रिल १९०८)
• १९९८: बालरंगभूमीचे खंदे पुरस्कर्ते, दिग्दर्शक वासुदेव पाळंदे यांचे निधन.
• २००२: लेखक, शब्दकोशकार व अनुवादक श्रीपाद जोशी यांचे निधन.
जन्म :
१५३४: शिखांचे ४ थे गुरू गुरू राम दास यांचा जन्म. (मृत्यू: १ सप्टेंबर, १५८१)
१८६१: भारतीय क्रांतिकारक मॅडम भिकाजी रुस्तुम कामा यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट १९३६)
१८८९: चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते, नाट्यशिक्षक केशवराव त्र्यंबक दाते यांचा जन्म. ( मृत्यू: १३ सप्टेंबर, १९७१ )
१८९८: प्राच्यविद्यापंडित अनंत सदाशिव अळतेकर यांचा जन्म. (मृत्यू: २५ नोव्हेंबर ,१९६०)
१९१५: चित्रपट व रंगभूमीवरील कलावंत प्रभाकर शंकर मुजूमदार यांचा जन्म.
१९२१: लेखक, समीक्षक व संपादक डॉ. सखाराम गंगाधर मालशे यांचा जन्म. (मृत्यू: ७ जून, १९९२)
१९२४: अकाली दलाचे नेते आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष गुरू चरणसिंग तोहरा यांचा जन्म. (मृत्यू: १ एप्रिल , २००४)
१९२५: भारतीय विज्ञान आणि शैक्षणिक लेखक ऑटो सिंग पेंटल यांचा जन्म. (मृत्यू: २१ डिसेंबर २००४)
१९३६: भारतीय उद्योजिक शिवती आदितन यांचा जन्म. (मृत्यू: १९ एप्रिल २०१३)
१९४०: इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला जलतणपटू आरती साहा यांचा जन्म. (मृत्यू: २३ ऑगस्ट, १९९४)
१९५०: क्रिकेटपटू आणि समालोचक मोहिंदर अमरनाथ यांचा जन्म.