साखर क्षेत्रातील दोन अधिकाऱ्यांचा अपघाती मृत्यू

धाराशिव : जिल्ह्यातील केशेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर साखर कारखान्याचे ई. डी. पी. मॅनेजर संतोष पाटील व सॉफ्टवेअर प्रोग्रॅमर श्रीकांत जाधव यांचे २० जुलै रोजी अपघाती निधन झाले आहे. ऐन उमेदीच्या वयात दोघांवर काळाने घाला घातला. या दुर्घटनेबद्दल तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
कारखान्याचे हे दोघे अधिकारी कामानिमित्त पुण्याला गेले होते. परतीच्या प्रवासात सोलापूर – धाराशिव महामार्गावर गुरूवारी पहाटेच्या सुमारास त्यांची कार रस्त्यालगतच्या झाडाला धडकली. त्यात दोघांचा मृत्यू झाला. सुरक्षेसाठी कारला असलेल्या एअरबॅग उघडल्या होत्या. परंतु आघात एवढ मोठा होता की त्याचा काही उपयोग झाला नाही.