‘उदगिरी शुगर’कडून प्रतिटन ३१०० प्रमाणे एकरकमी बिल जमा

आवडल्यास ही बातमी शेअर करा

सांगली : यंदाच्या गळीत हंगामासाठी आलेल्या उसास उदगिरी शुगर अँड पॉवर लि. ने प्रति टन ३१०० रुपये एकरकमी बिल शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले आहेत, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. राहुलदादा कदम यांनी दिली.

हंगाम २०२४-२५ मधील १५ डिसेंबर २०२४ पर्यंत १ लाख ६१ हजार ६५८ टन गाळप केलेल्या उसाचे ५० कोटी ११ लाख रुपये ऊस बिल शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले आहेत, अशी माहितीही डॉ. राहुलदादा यांनी दिली.

“मागील वर्षीच्या हंगामापर्यंत कारखान्याने उत्तम गाळप केले आहे. गाळपास आलेल्या उसाची सर्व रकम वेळच्या वेळी शेतकऱ्यांना एकरकमी दिली. तोडणी वाहतूक यंत्रणेचीही रकम देण्यात आली. शेतकरी, तोडणी-वाहतूक यंत्रणा व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळत आहे. तांत्रिक, आर्थिक व्यवस्थापन, पर्यावरणाबाबत विविध पुरस्कार प्राप्त झालेत’’, असे कारखान्याचे संस्थापक डॉ. शिवाजीराव कदम यांनी सांगितले.

सध्या ५ हजार टन गाळप क्षमता, १४ मेगावॉट को जनरेशन व दीड लाख लिटर्स क्षमतेची डिस्टिलरी कार्यान्वित आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून ‘सीएसआर’ निधीतून विविध सामाजिक उपक्रम राबविले, गरजवंतांना मदत केली आहे. आवश्यक तोडणी-वाहतूक यंत्रणा असून नियोजनही चांगले आहे. प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मोठा रोजगार उपलब्ध झाला आहे. आर्थिक उलाढाल वाढून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे, असे उद्‌गारही डॉ. कदम यांनी काढले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »