वारसा डळमळला …

आवडल्यास ही बातमी शेअर करा

कलीयुगी काळवेळ  बदलला|
मानवाच्या बुद्धीला पडली छिद्र||
त्याने मानवी  विचार बदलला|
पण नाही बदलले  सुर्य चंद्र||१||


खिसा रिकामा पण  ऐट जोमानं|
पाहुण्यांनी  भरेघरआनंदानं||
काका,मामा, दादा,नाना यांना मान|
मावशीसह,सगळ्यांचा  सन्मान||२||


होती पोरं लाडाची एक समान|
भाऊ भाऊ दिसती रामलक्ष्मण||
सगळेआजोबांचे वारसदार|
घरीदारी होते एकच चुल्हाण||३||


चटणी भाकरी न कांदा लसूण|
खायचे, तयांना हेच  पकवान||
येत नसे थकवा काम करून|
गावी लेकीबाळींनाही होता मान||४||


देवा या कलियुगात दशा झाली|
जेव्हा माणसाची मती  भ्रष्ट झाली||
शेतात,मळ्यांत भावकी मोडली|
मानवी लालसेने घरं फोडली||५||


बारने ,टीव्हीने समाज तोडला|
मोबाईलने परिवार तुटला||
तेव्हा सभ्यतेचा बुरखा फाटला|
संस्कृतीचा वारसा डळमळला||६||


आहेर वाळू रघुनाथ (नाशिक )
बीई एमआयई बीओई

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »