मच्छिंद्र कांबळी

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज शुक्रवार, एप्रिल ४, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर चैत्र १४, शके १९४७
सूर्योदय : ०६:३० सूर्यास्त : १८:५३
चंद्रोदय : ११:२२ चंद्रास्त : ०१:२१, एप्रिल ०५
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
उत्तरायण
ऋतु : वसंत
चंद्र माह : चैत्र
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : सप्तमी – २०:१२ पर्यंत
नक्षत्र : आर्द्रा – ०५:२०, एप्रिल ०५ पर्यंत
योग : शोभन – २१:४५ पर्यंत
करण : गर – ०८:५१ पर्यंत
द्वितीय करण : वणिज – २०:१२ पर्यंत
सूर्य राशि : मीन
चंद्र राशि : मिथुन
राहुकाल : ११:०९ ते १२:४१
गुलिक काल : ०८:०३ ते ०९:३६
यमगण्ड : १५:४७ ते १७:२०
अभिजितमुहूर्त : १२:१७ ते १३:०६
दुर्मुहूर्त : ०८:५९ ते ०९:४८
दुर्मुहूर्त : १३:०६ ते १३:५६
अमृत काल : १९:३३ ते २१:०७
वर्ज्य : १४:०४ ते १५:३८

आज जागतिक कला दिन / जागतिक सांस्कृतिक दिन आहे.

सच्चिदानंद हिरानंद वात्स्यायन उर्फ अज्ञेय यांनी १९२९ मध्ये बी. एससी झाल्यांनतर एम.ए. इंग्लिश हा विषय घेऊन करणात स्वातंत्र्य युद्धात शिक्षण सोडून स्वतःला झोकून दिले. बॉम्ब बनविण्याचे प्रक्षिक्षण घेत असताना पकडले जाऊन १९३० ते १९३६ तुरुंगवास भोगला. १९४३ ते १९४६ कालावधीत ब्रिटिश सैन्यात काम केले. त्यांनतर अलाहाबादहून ‘प्रतीक ” नावाची पत्रिका सुरु केली. तसेच ऑल इंडिया रेडिओ मध्ये नोकरी करत असताना देश – विदेशात अनेक ठिकाणी यात्रा केली. तसेच कैलिफोर्निया विश्वविद्यालय ते जोधपुर विश्वविद्यालय येथे अध्यापनाचे काम स्वीकारले. दिल्ली येथे आल्यानन्तर दिनमान साप्ताहिक, नवभारत टाइम्स, चे संपादन केले. १९८० मध्ये साहित्य व संस्कृतीसाठी वत्सल निधी न्यासाची स्थापना केली.

• १९८७: ज्ञानपीठ पारितोषिक विजेते हिंदी लेखक आणि वृत्तपत्रकार सच्चिदानंद हिरानंद वात्स्यायन उर्फ अज्ञेय यांचे निधन. (जन्म: ७ मार्च १९११- खुशीनगर, देवरिया, उत्तर प्रदेश)

मच्छिंद्र कांबळी – वस्त्रहरण या पहिल्याच नाटकाद्वारे व्यावसायिक मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला. अस्सल मालवणी बोलीतले लोकनाट्याच्या धर्तीचे हे नाटक मैलाचा दगड ठरले.

कांबळी यांचा अभिनयाचा ठसा खऱ्या अर्थाने उमटला तो, “वस्त्रहरण’मधील तात्या सरपंच या भूमिकेने. “वस्त्रहरण’ या नाटकाचे ४८९९ प्रयोग झाले. त्यानंतर पांडगो इलो रे, घास रे रामा, वय वर्ष पंचावन्न, भैय्या हातपाय पसरी, येवा कोकण आपलाच असा, माझा पती छत्रीपती अशी अनेक नाटके त्यांनी आपल्या भद्रकाली प्रॉडक्शन या नाटयसंस्थेमार्फत अनेक वर्ष चालवली.
मच्छिंद्र कांबळी यांना वस्त्रहरण हे नाटक लंडनला न्यायचे होते. पण पुरेसे पैसे नव्हते. त्यावेळी त्यांनी डॉ. काशिनाथ घाणेकर, नाना पाटेकर, अशोक सराफ, सचिन अशा बडया कलाकारांना घेऊन षण्मुखानंद मध्ये वस्त्रहरणचा विशेष प्रयोग केला. त्यानंतर वस्त्रहरणचा लंडनला प्रयोग केला. मच्छीँद्र कांबळी यांचे आणि मालवणी भाषेचा झेँडा सातासमुद्रापार पोहोचविणारे वस्त्रहरण हे पहिले मालवणी नाटक.

भद्रकाली प्रॉडक्शन ही मच्छिंद्र कांबळी यांची संस्था. मच्छिंद्र कांबळे यांनी, मोहन गोखले यांच्या सल्ल्यानुसार स्वतःची नाटक कंपनी २९ मे १९८२ मध्ये काढली. आता भद्रकाली संस्थेची धुरा त्यांचे पुत्र प्रसाद कांबळी सांभाळत आहेत. या संस्थेने ‘वस्त्रहरण’, ‘घास रे रामा’सारखी नाटके रंगभूमीवर आणून मालवणी मुलुखातल्या झणझणीत कोंबडी अन् कोंबडीवड्यांच्या परंपरेची नाटके दिली.

‘वस्त्रहरण’ तर माइलस्टोन ठरले. ‘मालवणी नटसम्राट’ असा लौकिकही मच्छिंद्र कांबळी यांनी मिळविला. पु.ल. देशपांडे यांनी ‘वस्त्रहरण’ला दिलखुलास दाद दिली. अन् नंतर पुलंची प्रतिक्रिया जाहिरातीत टाकून मच्छिंद्र कांबळी यांनी ‘वस्त्रहरण’चे एक हजारावर प्रयोग केले. भद्रकाली प्रॉडक्शनने एकूण ५० हून अधिक नाटके मराठी रंगभूमीला दिली. मच्छिंद्र कांबळी यांच्यानंतर भद्रकालीची सूत्रे कविता कांबळी आणि प्रसाद कांबळी यांनी हाती घेतली अन् भद्रकालीच्या रूढ परंपरेला छेद देत, या संस्थेने अतिशय वेगळे, चाकोरीबाहेरचे नाटक रंगभूमीवर आणले.

मच्छिंद्र कांबळी यांची काही गाजलेली नाटके – वस्त्रहरण, सावळो गोंधळ, पांडगो इलो रे इलो, तुमच ते आमच, चालगती, केला तुका झाला माका, चाकरमानी, घास रे रामा, येवा कोकण आपलोच आसा, राम तुझी सिता माउली, वाजले किती?, भैया हातपाय पसरी.

१९४७ : वस्त्रहरण या पहिल्याच नाटकाद्वारे व्यावसायिक मराठी रंगभूमीवर इतिहास घडवणारे मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळी ययांचा जन्म ( मृत्यू : ३० सप्टेंबर २००७)

  • घटना :
    १८८२: ब्रिटन च्या पहिल्या इलेक्ट्रिक ट्राम ईस्ट लंडन मध्ये चालू झाल्या .
    १९४४: दुसरे महायुद्ध – ब्रिटिश व अमेरिकन फौजांनी रुमानियातील बुखारेस्टवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात ३००० नागरिक ठार झाले.
    १९४९: पश्चिम युरोपातील अकरा देश आणि अमेरिका अशा १२ देशांनी नाटो (NATO) या संस्थेची स्थापना केली.
    १९६८: जेम्स अर्ल रे यांनी मार्टिन ल्यूथर किंग (ज्यु.) यांची हत्या केली.
    १९६८: नासाने अपोलो-६ चे प्रक्षेपण केले.
    १९९०: लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला.

• मृत्यू :

• १९९६: संस्कृत आणि मराठी साहित्यिक आनंद साधले यांचे निधन. (जन्म: ५ जुलै १९२०)
• २०००: कलादिग्दर्शक वसंतराव कृष्णाजी गोंधळेकर यांचे निधन.
• २०१६: भारतीय वकील आणि राजकारणी पी. ए. संगमा यांचे निधन. (जन्म: १ सप्टेंबर १९४७)

  • जन्म :
    १९०२ : ख्याल, भजन व ठुमरी गायनासाठी विशेष प्रसिद्ध असणारे गायक नारायणराव व्यास यांचा जन्म ( मृत्यू : १ एप्रिल १९८४ )
    १९२९ : आकर्षक सजावटीच्या माध्यमातून सहा दशकांहून अधिक काळ पुण्याच्या गणेशोत्सवाला वैभव प्राप्त करून देणारे कलाकार, गणेश मंडळांची सजावट करणाऱ्यांपासून ते नामवंत चित्रकार मूर्तिकार शिल्पकार, दत्तात्रेय श्रीधर खटावकर यांचा जन्म ( मृत्यू : २३ जानेवारी २०१६ )
    १९३३: डावखुरे मंदगती गोलंदाज बापू नाडकर्णी यांचा जन्म.
    १९४६ : दीपस्तंभ, रातराणी, पांडगो इलो रे, आसू आणि हसू, रमले मी, अशी विविध विषयांवरील उत्कृष्ट नाटके देणारे नाटककार प्रभाकर लक्ष्मण मयेकर यांचा जन्म. ( मृत्यू : १८ ऑगस्ट २०१५ )
    १९७३: भारतीय संचालक आणि पटकथालेखक चंद्र शेखर येलेती यांचा जन्म.
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »