जागतिक कासव दिन

आज शुक्रवार, मे २३, २०२५युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर ज्येष्ठ २, शके १९४७
सूर्योदय : ०६:०२ सूर्यास्त : १९:०९
चंद्रोदय : ०३:२२, मे २४ चंद्रास्त : १५:१७
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
उत्तरायण
ऋतु : वसंत
चंद्र माह : वैशाख
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : अपरा एकादशी – २२:२९ पर्यंत
नक्षत्र : उत्तराभाद्रपदा – १६:०२ पर्यंत
योग : प्रीति – १८:३७ पर्यंत
करण : बव – ११:५४ पर्यंत
द्वितीय करण : बालव – २२:२९ पर्यंत
सूर्य राशि : वृषभ
चंद्र राशि : मीन
राहुकाल : १०:५७ ते १२:३५
गुलिक काल : ०७:४० ते ०९:१८
यमगण्ड : १५:५२ ते १७:३१
अभिजित मुहूर्त : १२:०९ ते १३:०२
दुर्मुहूर्त : ०८:३९ ते ०९:३२
दुर्मुहूर्त: १३:०२ ते १३:५४
अमृत काल :११:३५ ते १३:०४
वर्ज्य : ०२:५५, मे २४ ते ०४:२२, मे २४
कासव हा एक उभयचर प्राणी आहे. कासवांचे आयुष्य १५० वर्षांपेक्षा जास्त असते. कासव हा जैवसाखळीतील महत्त्वाचा घटक आहे. कासव साधारण सात प्रकारच्या जातीत आढळते.
भारतात मंदिरामध्ये देवतेपुढे असलेले कासव हेही असेच महत्वाचे मानले जाते. त्याचा संकेत आहे की कासव जसे बाह्य गोष्टींपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी आपले पाय, शेपूट .मान कवच्यामध्ये ओढून घेते, तसे देवतेचे दर्शन घेताना काम,क्रोध,मद,मोह,मत्सर,लोभ या मानवी दुर्गुणांना आत खेचून घेऊन मगच देवतेचे दर्शन घ्यावे.
जहाजातील तेल गळतीसारखे अपघात, यांत्रिक मासेमारीच्या जाळ्यात अडकून मृत्यू, मानवाकडून किनारी भागांचा विध्वंस, कासवांच्या पाठींचा दागिन्यांसाठी वापर, अशा अनेक कारणामुळे समुद्री कासवांची संख्या कमी होते आहे. कासवांच्या सातही प्रमुख प्रजाती सध्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. म्हणूनच त्या प्राणिसंवर्धन अणि संरक्षण कायद्याच्या परिघात येतात. समुद्री कासवांना पकडणे बेकायदेशीर आहे.
आज जागतिक कासव दिन आहे.
आनंद मोडक हे मराठी चित्रपट आणि मराठी नाटकांचे संगीतकार आणि संगीत दिग्दर्शक होते. त्यांचे शालेय शिक्षण अकोल्यात तर पुढील शिक्षण पुण्यात झाले. त्यांच्या कलाजीवनाची सुरुवात ७२ च्या सुमारास झाली असली, तरी त्यांनी संगीत दिलेले पहिले नाटक ठरले ते १९७४ मधले ‘महानिर्वाण’.
त्यापाठोपाठ ‘तीन पैशाचा तमाशा’, ‘पडघम’, ‘विठ्ठला’, ‘तुमचे आमचे गाणे’, ‘अफलातून’, ‘संगीत म्युनिसिपाल्टी’, ‘अलिबाबाची हीच गुहा’, ‘जळ्ळी तुझी प्रीत’, ‘लीलावती’, ‘प्रीतगौरीगिरीशम’, ‘मेघदूत’, ‘मदनभूल’, ‘संगीत प्रारंभायन’, असा एक वेगळा प्रवास सुरू झाला. यातील वैविध्य लक्षणीय होते. पौराणिक, ऐतिहासिक, संस्कृत साहित्यातील कलाकृती, अनुवादित नाटके, कॉमेडी…असे अनेक प्रकार त्यांनी सांगीतिकदृष्ठ्या अर्थपूर्ण केले.
या साजाला नंतर पार्श्वसंगीताचाही सूर येऊन मिळाला.
‘महापूर’, ‘खेळिया’, ‘मृगया’, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘चाफा बोलेना’, ‘वाडा चिरेबंदी त्रिनाट्यधारा’, ‘उत्तररात्र’, ‘प्रेमाची गोष्ट..’ या सार्या नाट्यकृती त्यांच्या संगीत मार्गदर्शनाने मूळ आशय गहिरा करणार्या ठरल्या.
नाटक, चित्रपट, मालिकांच्या विश्वात गुंतले असतानाही त्यांनी आपली आकाशवाणी आणि दूरदर्शन या माध्यमांशी प्रारंभापासून जुळलेली नाळ तुटू दिली नाही. १९७६ मध्ये त्यांनी आकाशवाणीसाठी ‘बदकाचं गुपित’ ही संगीतिका केली. ती इतकी गाजली, की त्याचे स्वतंत्र ७५ प्रयोग राज्यभरात झाले.
‘कळत नकळत’, ‘सूर्योदय’, ‘दिशा’, ‘चौकट राजा’, ‘एक होता विदूषक’, ‘लपंडाव’, ‘दोघी’, ‘मुक्ता’, ‘तू तिथे मी’, ‘राजू’, ‘उरूस’, ‘फकिरा’, ‘बाईमाणूस’ अशा वीस वर्षांच्या अवधीत त्यांनी तब्बल ५३ मराठी व हिंदी चित्रपटांना संगीताचा साज चढवला. चित्रपटांसाठी संगीत देतानाही त्यांनी कायम दर्जा जपला. अशा या श्रेष्ठ संगीतकाराचे २३ मे २०१४ रोजी निधन झाले.
• २०१४: भारतीय संगीतकार आणि दिग्दर्शक आनंद मोडक यांचे निधन. (जन्म: १३ मे ,१९५१)
- घटना :
१७३७: पोर्तुगीजांकडुन जिंकल्यानंतर पेशव्यांनी अर्नाळा किल्ला परत बांधून घेतला.
१८२९: सिरील डेमियनला अॅकॉर्डियन या वाद्याचे पेटंट मिळाले.
१९४९: पश्चिम जर्मनी हे राष्ट्र अस्तित्त्वात आले.
१९५१: तिबेट देशाने चीनबरोबर तिबेटच्या शांततेत मुक्तीसाठी सतरा बिंदू करार केला.
१९५६: आयुर्विमा व्यवसायाचे राष्ट्रीयीकरण करण्यासंबंधीचे विधेयक मंजूर झाले.
१९८४: बचेन्द्री पालने दुपारी १:०९ वाजता (भारतीय प्रमाण वेळ) माऊंट एव्हरेस्ट शिखर सर केले. हे शिखर सर करणारी ती पहिली भारतीय महिला आहे.
१९९५: जावा प्रोग्रामिंग लँग्वेज ची पहिली आवृत्ती प्रकाशीत केली गेली.
१९९७: माऊंट एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर सर्वप्रथम सर करणार्या तेनसिंग नोर्गे यांचे नातू ताशी तेनसिंग यांनी माऊंट एव्हरेस्ट सर केले.
• मृत्यू :
• २०१४: भारतीय क्रिकेटर माधव मंत्री यांचे निधन. (जन्म: १ सप्टेंबर, १९२१)
२०१४: भारतीय संगीतकार आणि दिग्दर्शक आनंद मोडक यांचे निधन. (जन्म: १३ मे ,१९५१)
- जन्म :
१८९६: गायक, अभिनेते, संगीत समीक्षक, संगीत रचनाकार, संगीत दिग्दर्शक व लेखक केशवराव भोळे यांचा जन्म. (मृत्यू: ९ नोव्हेंबर, १९७७)
१९१९: जयपूरच्या राजमाता महाराणी गायत्रीदेवी यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै,२००९)
१९२६: मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते पी. गोविंद पिल्लई यांचा जन्म. (मृत्यू: २२ नोव्हेंबर, २०१२)
१९२६: भारतीय बिशप बॅसिल साळदादोर डिसोझा यांचा जन्म. (मृत्यू: ५ सप्टेंबर, १९९६)
१९३३: मुद्रितशोधन तज्ञ मोहन वेल्हाळ यांचा जन्म.
१९४३: पटकथालेखक आणि दिग्दर्शक कोवेलमूडी राघवेंद्र राव यांचा जन्म.
१९४५: भारतीय दिग्दर्शक, पटकथालेखक आणि लेखक पद्मराजन यांचा जन्म.(मृत्यू: २४ जानेवारी, १९९१)
१९६५: क्रिकेटपटू वूर्केरी रमण यांचा जन्म.