‘येडेश्वरी’कडून रू. २७५० शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

आवडल्यास ही बातमी शेअर करा

बीड : केज तालुक्यातील आनंदगाव सारणी येथील येडेश्वरी साखर कारखान्याने गळित हंगाम २०२३- २४ मध्ये गाळपास आलेल्या ऊसाचा पहिला हप्ता प्रती टन २७५० रूपयांप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला. या कारखान्याने नेहमीच ईतर कारखान्यांच्या तुलनेत ऊसाला अधिक भाव दिला आहे.

१ नोव्हेंबर ते १५ नाव्हेंबर २०२३ या कालावधीचा पहिला हप्ता २७५० रूपयांप्रमाणे शेतकरी बांधवांच्या खात्यावर वर्ग केला. यामुळे येडेश्वरी कारखाना बीड जिल्हयात सर्वाधीक भाव देणारा कारखाना ठरला आहे. श्री. बजरंग (बप्पा) सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याची यशस्वी घोडदौड सुरू आहे.

यावर्षी कारखान्याचा १० वा गळीत हंगाम सुरू असून ३३ दिवसात १ लाख ७७ हजार ७१३ मे.टन उसाचे गाळप केले आहे. डिस्टीलरी विभागातून इथेनॉल ३० लाख ७६ हजार ८१३, लि. आर. उत्पादीत झाले आहे. को-जन विभागातुन एकुण विज निमिर्ती ६३ लाख ३८ हजार ३०० केली. यातून २४ लाख ८४ हजार युनिट वीज महावितरण कंपनीला देण्यात आली. कारखान्याने ३८ लाख ५४ हजार ३०० युनिट वीज वापरली. यावर्षी कारखाना उच्चांकी भाव देत असून शेतकरी सभासदांनी जास्तीत जास्त ऊस कारखान्यास देवून सहकार्य करावे असे आवाहन चेअरमन बजरंग सोनवणे यांनी केले आहे.
येडेश्वरी साखर कारखाना नेहमीच शेतकर्यांचे हित जोपासणारा व मराठवाड्यात सर्वाधिक उसाला भाव देणारा कारखाना म्हणुन एक वेगळी ओळख निर्माण करत आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »