जीवन गाणे

जीवन प्रवासात केलेले काही|
मुक्काम पुन्हा परत येत नाही ||
पानगळीत फुले कोमजतात|
ती बहार आल्यास फुलत नाही ||१||
प्रवासात काही लोक भेटतात|
तेथे पुन्हा परत भेटत नाही ||
आयुष्यात त्यांचा जयघोष केला|
तरी ते जीवनात भेटत नाही ||२||
मैत्रीत संशय हा धोक्याचा आहे|
संशयाला घरं करू देणे नाही ||
ज्यांना आठवून तळमळ होते |
रूसा,पण त्याला जाऊ देणे नाही ||३||
त्याला प्रेमाने कितीही गोंजारले|
तरी जीवनी ते परतत नाही ||
सकाळ सायंकाळ अशीच जाते|
वेळ कुणासाठीही थांबत नाही ||४||
एकदा उगवलेला दिवसरात्र|
पुन्हा आपल्या जीवनी येत नाही ||
क्षणातसंधी दूर निघून जाते |
डोळ्यांवर कायम भरोसा नाही ||५||
लोक भेटतात, प्रेम करतात|
तयाने दुरावा कमी होत नाही||
पडद्यावरचे चित्र बदलते|
त्यांवर वैचारिक मंथन नाही||६||
आहेर वाळू रघुनाथ (नाशिक)