बलबीर सिंग दोसांझ

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज रविवार, मे २५, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर ज्येष्ठ ४, शके १९४७
सूर्योदय : ०६:०१ सूर्यास्त : १९:१०
चंद्रोदय : ०४:५२, मे २६ चंद्रास्त : १७:२३
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
उत्तरायण
ऋतु : वसंत
चंद्र माह : वैशाख
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : त्रयोदशी – १५:५१ पर्यंत
नक्षत्र :अश्विनी – ११:१२ पर्यंत
योग : सौभाग्य – ११:०७ पर्यंत
करण : वणिज – १५:५१ पर्यंत
द्वितीय करण :विष्टि – ०२:०१, मे २६ पर्यंत
सूर्य राशि: वृषभ
चंद्र राशि : मेष
राहुकाल : १७:३१ ते १९:१०
गुलिक काल : १५:५३ ते १७:३१
यमगण्ड: १२:३६ ते १४:१४
अभिजित मुहूर्त : १२:०९ ते १३:०२
दुर्मुहूर्त : १७:२५ ते १८:१७
अमृत काल : ०४:०९, मे २६ ते ०५:३४, मे २६
वर्ज्य : ०७:३८ ते ०९:०४
वर्ज्य : १९:४१ ते २१:०५

आज आफ्रिकन मुक्ती दिन आहे.

‘स्वातंत्र्यापूर्वी ध्यानचंद हे भारतीय हॉकीचे आधारस्तंभ होते तर स्वातंत्र्यानंतरच्या काळात बलबीर सिंग दोसांझ (थोरले) यांनी ती जबाबदारी नेटाने पार पाडली,’-

  • ही भारतीय हॉकीचे माजी कर्णधार अजित पाल सिंग यांनी बलबीर सिंग यांना वाहिलेली आदरांजली, ‘सीनिअर’ (थोरले) म्हणून ओळखले जाणाऱ्या बलबीर दोसांझ यांच्या कर्तृत्वाची ओळख करून देणारी आहे.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदा तिरंगा फडकावण्याचे कार्य बलबीर सिंग यांच्या भारतीय संघाने केले. ब्रिटिश राजवटीला विरोध करतानाच त्यांनी हॉकीतील आपले कौशल्य अधिक विकसित केले. फाळणीनंतर बलबीर सिंग व अन्य खेळाडूंच्या पहिल्या तुकडीने भारतीय हॉकीचा सुवर्णकाळ गाजवला! पूर्व पंजाबच्या मोगा तालुक्यातून बलबीर सिंग यांनी हॉकी खेळायला सुरुवात केली. मोगा येथेच शिकत असताना हॉकीवेडामुळे ते नापास झाले. मात्र लाहोरच्या सिख नॅशनल महाविद्यालयात पुढील शिक्षण सुरू ठेवून, उत्तम हॉकीपटू म्हणून नावलौकिक मिळवत ते अमृतसरच्या खालसा महाविद्यालयात दाखल झाले. हॉकीप्रावीण्यामुळे त्यांना पंजाब पोलीसमध्ये नोकरी मिळाली.

खालसा महाविद्यालयाचे प्रशिक्षक हरबेल सिंग आणि १९३२च्या लॉस एंजलिस ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेते डिकी कार यांच्या आग्रहापायी ते १९४८च्या ऑलिम्पिकसाठी मुंबईला (तेव्हाचे बॉम्बे) सराव चाचणीसाठी दाखल झाले. १९४८च्या लंडन ऑलिम्पिकसाठी निवडलेल्या भारतीय संघात बॉम्बेच्या खेळाडूंचा अधिक भरणा होता.

निवडलेल्या ३९ खेळाडूंत बलबीर यांचे नाव नव्हते. पण त्यांना वगळल्याने टीका झाल्यावर, राष्ट्रीय सराव शिबिरात दाखल होण्यासाठी त्यांना तार धाडण्यात आली . दोन दिवसांच्या सरावातच हाड मोडले, पण दुखापतीतून बरे झाल्यावर त्यांचा २० जणांच्या ऑलिम्पिक संघात समावेश झाला.अव्वल खेळाडूंच्या उपस्थितीतही बलबीर सिंग यांनी १९४८च्या ऑलिम्पिकमध्ये छाप पाडली. ग्रेट ब्रिटनसारखा प्रतिस्पर्धी समोर असतानाही बलबीर यांनी अंतिम फेरीत दोन गोल झळकावले. देशाला ऑलिम्पिकमधील पहिले सुवर्णपदक देणाऱ्या या संघाचे साऱ्या देशवासीयांनी कौतुक केले.

१९५२च्या हेलसिंकी व १९५६च्या मेलबर्न ऑलिम्पिकमध्ये बलबीर सिंग यांनी भारताला सुवर्णपदके मिळवून देण्यात मोलाचा हातभार लावला. खेळाडू व प्रशिक्षक म्हणून अनेकदा त्यांना टीकेला सामोरे जावे लागले. पण सर्व काही पचवून त्यांनी कार्य सुरूच ठेवले. एकाहून एक सरस खेळाडूंसह खेळताना ‘देशातील सर्वोत्तम मध्य आघाडीवीर’ म्हणून लौकिक मिळवणारे बलबीर सिंग वयाच्या ९५व्या वर्षी आपल्यातून निघून गेले.

२०२० : पद्म श्री पुरस्कार सन्मानितभारताच नाव आपल्या अप्रतिम हॉकी खेळाने जगभर नेणारे बलबीर सिंग दोसांझ (सिनिअर) वयाच्या ९६ व्या वर्षी निधन ( जन्म : ३१ डिसेंबर, १९२३)

  • घटना :
    १६६६: शिवाजी महाराज आग्रा येथे नजरकैदेत.
    १९५३: अमेरिकेतील पहिले सार्वजनिक टेलिव्हिजन स्टेशन वरून अधिकृत पाने प्रसारण सुरू झाले.
    १९५५: कांचनगंगा हे जगातील तिसरे सर्वोच्च शिखर प्रथमच जो ब्राऊन आणि जॉर्ज बॅन्ड या ब्रिटिश गिर्यारोहकांनी सर केले.
    १९६१: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी हे दशक संपण्यापुर्वी चंद्रावर मानव उतरवण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येईल (Apollo Program) असे अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनात जाहीर केले.
    १९६३: इथिओपियातील आदिसाबाबा येथे ऑर्गनायझेशन ऑफ अफ्रिकन युनिटी (OAU) ची स्थापनाझाली.
    १९७७: चिनी सरकारने विल्यम शेक्सपिअरच्या साहित्यावरील बंदी उठवली. सुमारे १० वर्षे ही बंदी अमलात होती.
    १९८१: सौदी अरेबियातील रियाध येथे गल्फ कोऑपरेशन कौन्सिल (GCC) या संघटनेची स्थापना झाली. बहारिन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि यू. ए. ई. हे या संघटनेचे सदस्य देश आहेत.
    १९८५: बांगलादेशात झालेल्या चक्रीवादळात अंदाजे १०,००० लोक ठार झाले.
    १९९२: विख्यात बंगाली साहित्यिक सुभाष मुखोपाध्याय यांना १९९१ चा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.
    १९९९: सुमारे १०० वर्षांपासून पंढरपूरला येणार्या लाखो वारकर्यांची आणि नागरिकांची सेवा केलेल्या पंढरपूर-कुर्डुवाडी या नॅरोगेज रेल्वेला निरोप देण्यात आला.

मृत्यू :

• १९५४: आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे प्रवर्तक, कन्या आरोग्य मंदिरा चे संस्थापक गजानन यशवंत ताम्हणे तथा माणिकराव यांचे निधन. (जन्म: ३१ डिसेंबर ,१८७८)
• १९९८: लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील संगीतकार लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर यांचे निधन. (जन्म: ३ नोव्हेंबर, १९३७)
१९९९: संशोधक, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (NCL) संचालक बाळ दत्तात्रय तथा बी. डी. टिळक यांचे निधन.
२००५: अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक व केंद्रीय मंत्री पद्म श्री सुनील दत्त यांचे निधन. (जन्म: ६ जून ,१९२९)
२०१३: भारतीय राजकारणी महेंद्र कर्मा यांचे निधन. ( जन्म: ५ ऑगस्ट, १९५०)

  • जन्म :
    १८८६: क्रांतिकारक रास बिहारी घोष यांचा जन्म. (मृत्यू: २१,जानेवारी १९४५)
    १८८८ : वीराग्रणी डॉ. नारायण दामोदर सावरकर यांचा जन्मदिन ( मृत्यू : १९ ऑक्टोबर, १९४९ )
    १८९५: इतिहासकार व लेखक त्र्यंबक शंकर शेजवलकर यांचा जन्म. (मृत्यू: २८ नोव्हेंबर, १९६३)
    १८९९: स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक, बंगाली कवी काझी नझरुल इस्लाम यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑगस्ट, १९७६)
    १९३६: क्रिकेटपटू रुसी सुरती यांचा जन्म. (मृत्यू: १३ जानेवारी, २०१३)
    १९५४: भारतीय अभिनेता, निर्माता आणि राजकारणी मुरली यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑगस्ट २००९)
    १९७२: भारतीय अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथालेखक पद्मश्री करण जोहर यांचा जन्म.
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »