शीख सेनापती बंदा सिंह बहादूर

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज सोमवार, जून 9, 2025 युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर ज्येष्ठ दिनांक १९ , शके १९४७
सूर्योदय : 06:00 सूर्यास्त : 19:15
चंद्रोदय : 17:43 चंद्रास्त : 04:51, जून 10
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
उत्तरायण
ऋतु : ग्रीष्म
चंद्र माह : ज्येष्ठ
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : त्रयोदशी – 09:35 पर्यंत
नक्षत्र : विशाखा – 15:31 पर्यंत
योग : शिव – 13:09 पर्यंत
करण : तैतिल – 09:35 पर्यंत
द्वितीय करण : गर – 22:38 पर्यंत
सूर्य राशि : वृषभ
चंद्र राशि : तूळ – 08:50 पर्यंत
राहुकाल : 07:40 ते 09:19
गुलिक काल : 14:17 ते 15:57
यमगण्ड : 10:58 ते 12:38
अभिजितमुहूर्त : 12:11 ते 13:04
दुर्मुहूर्त : 13:04 ते 13:57
दुर्मुहूर्त : 15:43 ते 16:36
वर्ज्य ::56 ते 21:42

“निश्चयाचा महामेरू | बहुत जनासी आधारू
अखंडस्थितीचा निर्धारु | श्रीमंत योगी
यशवंत, नितीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत
पुण्यवंत, कीर्तिवंत, जाणता राजा”

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होणे ही साधारण घटना नव्हती, देशावर विदेशी आक्रमणे सुरु झाल्यानंतर आपली संस्कृती, आपला धर्म व समाज यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न अयशस्वी होत होता आणि शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात हे शक्य करून दाखविले होते, विजय खेचून आणला होता. ही विजयश्री पाहून इतरांचा स्वतःवरील विश्वास वाढला, कविराज भूषण औरंगजेबाची चाकरी सोडून स्वराज्यात परतले. राजस्थान मध्ये सर्व राजपूत राजे अंतर्गत कलह विसरून दुर्गादास राठोड यांच्या नेतृत्वात एकत्र आले, त्यांना एकीचे महत्व पटले, त्यांचा आत्मविश्वास वाढला व थोड्याच दिवसात विदेशी आक्रमकांनी राजस्थान सोडले. छत्रसाल बुंदेला शिवाजी राजांची चाकरी पत्करण्यास आले तर महाराजांनी त्यांचा आत्मविश्वास जागृत करून परत पाठविले. ते रायगडावरून परतले व विजयी झाले, बुंदेलखंडात स्वधर्माचे साम्राज्य उभे केले.
शिवाजी राजांचा राज्याभिषेक संपूर्ण हिंदुराष्ट्रासाठी विजयाचा संदेश होता असेही म्हणता येईल. स्वराज्याचे सिंहासन व्यक्तिगत स्वार्थ, सन्मान यासाठी नव्हते तर रयतेच्या सुखासाठी होते. राजांची दृष्टी व्यापक होती, विदेशी आक्रमणांनी हिंदू धर्माची झालेली हाणी त्यांना भरून काढायची होती. आई तुळजाभवानी, पंढरपूरच्या विठोबाचा अफझलखानाने केलेला अपमान याचा बदला त्यांनी खानाचा वध करून घेतला. काशी विश्वेश्वराचा झालेला अपमानही त्यांना बघवत नव्हता, त्यांचे कार्य संपूर्ण हिंदुस्थानाच्या उत्थानासाठी होते.

शिवाजी राजांचा अभ्यास दांडगा होता, त्यांच्या मंत्रिमंडळात अष्टप्रधान नियुक्त केले होते, ही प्रथा विजयनगर साम्राज्य लुप्त झाल्यानंतर प्रथमच शिवाजी राजांनी स्वराज्यात अमलात आणली होती. प्राचीन भारतीय संस्कृतीचा सखोल अभ्यास करून स्वराज्याची घडी बसविल्या गेली होती. स्वराज्य निर्माण करणे जितके अवघड तितके ते टिकविणे अवघड हे जाणून राज्यकारभाराची घडी चोख लावण्यात आली होती. अश्या दूरदृष्टी ठेवून कार्य करणाऱ्या छत्रपतींचा संपूर्ण हिंदुस्थानाला अभिमान आहे. “बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले” या वाक्याचा मतितार्थ राजांच्या संपूर्ण जीवनचरित्रात जाणवतो म्हणूनच रयतेच्या राजाला सहृदय वंदन व मानाचा मुजरा.

शिवाजी या तीन शब्दांचा अफाट पसारा समजून घेण्यास एक जन्म अपुरा पडावा. अत्यंत हुशार, विनम्र, साहसी, मुत्सद्दी असणारे शिवराय हिंदू समाजाचे नेतृत्व कसे असावे याचे मूर्तीमंत उदाहरण आहे. संपूर्ण समाजाचा आत्मविश्वास जागृत करून स्वराज्याचे सिंहासन उभे करणाऱ्या रयतेच्या राजाचे, समर्थ रामदास स्वामींसारख्या विलक्षण व्यक्तीने अत्यंत समर्पक शब्दात कौतुक केले आहे.
“शिवरायाचे आठवावे रूप, शिवरायाचा आठवावा प्रताप,
शिवरायाचा आठवावा साक्षेप भूमंडळी”

आज शिवराज्याभिषेक दिन – तिथीप्रमाणे.

शीख सेनापती बंदा सिंह बहादूर – हिंदुस्थानावर फार प्राचीन काळापासून परकीय आक्रमणांच्या संकट-साखळीचा विळखाच जणू बसला आहे. पण त्याबरोबरच आपल्या देशाला अनेक शूर, पराक्रमी वीरांची परंपराही लाभलेली आहे. त्यांच्या पराक्रमामुळे आणि बलिदानामुळेच वेळोवेळी आपण स्वातंत्र्याचा श्वास घेऊ शकलो. अशाच शूरवीरांमध्ये १८ व्या शतकातील शीख सेनापती बंदा सिंह बहादूर ह्यांचा उल्लेख महत्त्वाचा ठरतो.

मुसलमानांच्या तावडीतून आपले राज्य मोठ्या पराक्रमाने मिळवून, त्याची सीमा लाहोर आणि अमृतसरपर्यंत विस्तारण्यात बंदा बहादुरांना यश मिळाले होते. परंतु दुर्दैवाचा घालाच जणू बंदा बहादुरांवर कोसळला. मुघली सैन्याने बंदा बहादुरांना धारिवाल गावात, सन १७१५ च्या प्रारंभापासून जवळ जवळ १० महिने वेढून ठेवले होते. अन्नधान्य, पाणी इ. चा साठा जसा संपत आला तसे बंदा बहादूर आणि बरोबरीच्या ७९४ शीख सैनिकाना जगणे असह्य झाले. अखेर सर्वांनी ७ डिसेंबर १७१५ ला आत्मसमर्पण केले. त्या ७९४ शीख सैनिकांसह बंदा सिंह बहादुरांना फेब्रुवारी १७१६ च्या दरम्यान दिल्लीला आणण्यात आले. आणि तेथेच ५ मार्च ते १३ मार्च ह्या ८ दिवसात रोज १०० च्या संख्येने, त्या ७९४ शीख योद्ध्यांना फाशी देण्यात आले. आणि त्यानंतर २ महिने बंदा सिंह बहादुरांचा अनन्वित छळ करून, त्यांच्या शरीराचे असंख्य तुकडे करून त्यांना मारण्यात आले.

आयुष्यभर शीख समाज आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आपला क्षणन क्षण वेचणाऱ्या बंदा सिंह बहादुरांचा अंत असा दुर्दैवी रित्या झाला.
वीर बंदा सिंह बहादुरांना मानाचा मुजरा !!!

• १७१६: शिख सेनापती बंदा सिंग बहादूर यांचे निधन. (जन्म: २७ ऑक्टोबर, १६७०)

जननायक – बिरसा मुंडा – आदिवासी समाजक्रांतीचे जनक व एक स्वातंत्र्यसेनानी. त्यांचा जन्म झारखंडमधील उलिहातु या छोट्याशा खेड्यात वडील सुगना व आई करमी या दांपत्यापोटी झाला. जन्म गुरुवारी म्हणजे बिस्युतवार किंवा बृहस्पतिवार या दिवशी झाला, म्हणून त्यांचे नाव ‘बिरसाʼ ठेवण्यात आले. बिरसा यांच्या कुटुंबाची परिस्थिती हलाखीची होती. त्यामुळे बिरसांच्या जन्मानंतर सर्व कुटुंब उदरनिर्वाहासाठी बिरसांची आत्या दासकीर हिच्या आयुभातु या गावी गेले. बासरी व टुईला वाजविणे, नृत्य, नकला, चित्र रेखाटणे, आखाड्यात जाणे इत्यादी छंदही त्यांच्या अंगी होते.
बिरसा मुंडा एक भारतीय आदिवासी क्रांतीकारक होते. ते आदिवासी समाजाचे वीर नायक होते. १९ व्या शतकातील शेवटच्या वर्षात मुंडा जमातीच्या आदिवासींव्दारा इंग्रज सरकार विरूध्द जनआंदोलने केली त्याचे नेतृत्व बिरसा मुंडा यांनी केले होते.

भारतीय स्वातंत्र्य लढयात हया आदिवासींच्या संग्रामास इतिहासात मोठे स्थान प्राप्त करून देण्याचे श्रेय बिरसामुंडा यांनाच जाते.

धर्नुविद्येत रुची असणाऱ्या मुंडा यांना शाळेत टाकण्याचा सल्ला दिला.परंतू त्यासाठी ख्रिश्चन धर्म स्विकारावा लागणार होता त्यांच्या वडीलांनी त्यांचे धर्मांतरण करून त्याचे नाव डेविड केले त्याचा दाखला जर्मन मिशन स्कुल येथे झाला परंतू तेथे धार्मीक सक्तीमुळे त्यांनी शाळा सोडली व ते प्रसिध्द वैष्णव भक्त आनंदानंद पांडे यांच्या संपर्कात आले.वाचन व लेखन येत असल्याने त्यांनी महाभारत रामायण व गिता असे अनेक हिन्दू धार्मिक ग्रंथांचे वाचन केले. त्यांच्या सोबत राहून इंग्रजांच्या काळया धोरणाचा त्यांना फार तिरस्कार यायचा..

बिरसा मुंडा १९०० मध्ये इंग्रजांविरूध्द विद्रोह करण्याची घोषणा केली व म्हंटले ‘‘ आम्ही ब्रिटिश शासनाच्या तत्वांविरूध्द विद्रोहाची घोषणा करतो. आम्ही कधीच ब्रिटिशांच्या कायदयांना मानणार नाही. आम्ही इंग्रजांचे अधिपत्य स्विकारत नाही. जो ही इंग्रज आमच्या विरूध्द उभा राहील त्यास आम्ही यमसदनी पाठवू. यामुळे संतप्त ब्रिटीश सरकारने आपली सेना पाठवून बिरसा मुंडा यास पकडण्यासाठी पाठविला, बिरसा मुंडास पकडून देणा-यास ५०० रूपये बक्षिस जाहीर केले.

बिरसा मुंडा यांनी विविध जमातीच्या गटांना एकत्र आणले त्यांना इंग्रजांविरूध्द लढण्यास प्रेरित केले. इंग्रज सरकारने विद्रोहीचे दमन करण्यासाठी ३ फेब्रुवारी १९०० ला हल्ला करून विद्रोहीचे ठिकाणे उध्वस्त केले व बिरसामुंडा यास अटक केली. त्यांच्या सोबत अनेक आदिवासी युवकांनाही अटक करण्यात आली.

९ जुन १९०० रोजी रहस्यमयरित्या त्यांचा मृत्यु झाला होता. काहींच्या मते इंग्रजांनी त्यांना फासावर चढवले तसेच इंग्रजांनी त्यांच्या मृत्युचे कारण प्लेग सांगीतले.

• १९००: आदिवासी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांचा ब्रिटिशांच्या कैदेत संशयास्पदरित्या मृत्यू. (जन्म: १५ नोव्हेंबर, १८७५)

  • घटना :

१६६५: मिर्झाराजे जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात पुरंदरचा तह झाला.
१६९६: छत्रपती राजाराम आणि महाराणी ताराबाई यांना तामिळनाडुतील जिंजी किल्ल्यावर पुत्ररत्न झाले. मुलाचे नाव शिवाजी असे ठेवले.
१७००: दख्खन स्वारीवर असलेल्या औरंगजेबाने सज्जनगड जिंकला.
१८६६: अलाहाबाद उच्च न्यायालयाची स्थापना.
१९०६: स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे लंडनला प्रयाण.
१९३१: रॉबर्ट गोडार्ड या शास्त्रज्ञाला अंतराळ प्रक्षेपणासाठी वापरल्या जाणार्या रॉकेटचे पेटंट मिळाले.
१९३४: डोनाल्ड डक पहिल्यांदा द व्हाइज लिटिल मर्न मध्ये दिसले.
१९३५: एडविन आर्मस्ट्राँगने पहिल्यांदा एफ.एम. लहरींचे प्रसारण केले.
१९४० : ” मी हिंदू राष्ट्राचे छोटे स्वरूप बघत आहे ” संघ संस्थापक डॉ . हेडगेवार यांनी नागपूर येथे सुरु असलेल्या तृतीय वर्षात स्वयंसेवकांना संबोधित केले. हे त्यांचे मृत्यूपूर्वीचे अखेरचे भाषण / कार्यक्रम ठरला.
१९४६: राजे भूमिबोल अतुल्यतेज थायलंडच्या राजसिंहासनावर विराजमान झाले. कोणत्याही देशावर सर्वात दीर्घकाळ राज्य करणारे हे राजे आहेत.
१९६४: भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून लाल बहादुर शास्त्री यांनी सूत्रे हाती घेतली.
१९७०: अॅनामे हेस, एलिझाबेथ पी. हॉइसिंग्टन या अमेरिकन सैन्यातील पहिल्या स्त्री जनरल झाल्या.
१९९७: सुखोई-३० के ही रशियन बनावटीची विमाने भारतीय हवाई दलात दाखल.

• मृत्यू :

• १८३४: अर्वाचीन बंगाली व मराठी गद्यलेखनाचा पाया घालणारे धर्मप्रसारक पं. विल्यम केरी यांचे निधन. (जन्म: १७ ऑगस्ट ,१७६१)
• १९३४ : २ सप्टेंबर ला मिदनापूर जेल मध्ये पोलीस कमिशनरचा वध केल्यानंतर भूमिगत झालेल्या क्रांतिकारक दिनेश चन्द्र मुजुमदार ह्यांनी पकडायला येणाऱ्या क्वीन ह्या पोलीस अधिकाऱ्याचा पण वध केला. पुढे इंग्रजांनी खटला चालवून त्यांना ९ जुन रोजी फाशी दिली.
क्रांतिकारक दिनेश चन्द्र मुजुमदार यांचे बलिदान ( जन्म : मे, १९०७ )
• १९८८: अभिनेते गणेश भास्कर अभ्यंकर ऊर्फ विवेक यांचे निधन. ( जन्म :२३ फेब्रुवारी, १९१८)
• १९९३: बंगाली व हिन्दी चित्रपट दिग्दर्शक व पटकथालेखक सत्येन बोस यांचे निधन. (जन्म: २२ जानेवारी ,१९१६)
१९९५: पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित स्वातंत्र्यसैनिक, संसदपटू, शेतकरी चळवळीतील नेते प्रा. गोगिनेनी रंगा नायकुलू ऊर्फ एन. जी. रंगा यांचे निधन.(जन्म: ७ नोव्हेंबर, १९००)
१९९७: पद्म भूषण पुरस्कार सन्मानित इंग्लिश खाडी पोहून जाणारे पहिले भारतीय मिहिर सेन यांचे निधन. (जन्म: ६, नोव्हेंबर, १९३० )

  • जन्म :
    १९१२: पद्मश्री पुरस्कार सन्मानित संगीतकार वसंत देसाई यांचा जन्म. (मृत्यू: २२ डिसेंबर , १९७५)
    १९३१: भारतीय लेखक व राजकारणी नंदिनी सत्पथी यांचा जन्म. (मृत्यू: ४ ऑगस्ट, २००६)
    १९४९: सामाजिक कार्यकर्त्या व भारतातील पहिल्या महिला आय. पी. एस. अधिकारी मॅगसेसे पुरस्कार मानकरी किरण बेदी यांचा जन्म.
    १९७७: अभिनेत्री अमिशा पटेल यांचा जन्म.
    १९८१: इंग्लिश-भारतीय सतार वादक आणि संगीतकार अनुष्का शंकर यांचा जन्म.
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »