हक्काच्या पैशासाठी पैनगंगा कारखान्यावर जनआक्रोश…!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

बुलढाणा : कारखान्याने मोठमोठे आमिष दाखवून शेतकऱ्यांचा ऊस आणला. उसाची साखर केली, साखरेचे करोडो रुपये वसूल केले; परंतु शेतकऱ्यांचे करोडो रुपये गेल्या ५ महिन्यांपासून थकीत आहेत, या पैशांसाठी कारखान्यावर हेलपाटे मारूनही कारखाना प्रशासन दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्‍या जवळपास ५०० ते ६०० पीडित ऊस उत्‍पादक शेतकऱ्यांनी नुकताच बुलढाणा तालुक्यातील धाड-वरुड येथील पैनगंगा साखर कारखान्यावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी थकित ऊसबिल दिल्याशिवाय येथून हटणार नसल्याची ठाम भूमिका घेतल्‍याने कारखाना परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

ऊस उत्‍पादक शेतकऱ्यांना मोठे मोठे आश्वासन देऊन अकोला, वाशिम, यवतमाळ, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव खान्देश, बुलढाणा, अशा अनेक जिल्ह्यांतून नोव्हेंबर, डिसेंबरपासून  ते मार्चपर्यंत ऊस आणला. एक लाख पंधरा हजार मॅट्रिक टन साखर तयार झाली. शेतकऱ्यांच्या भरवशावर करोडो रुपये साखरेचे वसूल केले. शेतकऱ्यांच्या हातावर तुरी दिल्या. शेतकरी गेल्या ५ महिन्यांपासून कारखान्यावर चकरा मारून मारून हैराण झाले. आज-रोजी शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले तरी या कारखान्याचे चेअरमन समाधान डोईफोडे यांना कुठलाच पश्चाताप झाल्याचा दिसत नव्हते.

यापार्श्वभूमीवर बुधवारी,  २१ मे रोजी तब्बल ५०० ते ६०० शेतकरी कारखान्यावर ठाण मांडून होते. कोणाच्या मुलीचे तर कोणाच्या मुलाचे लग्न मोडले, कोणाची आई तर कोणाचा मुलगा दवाखान्या.  या कारखान्याच्या भरवशावर अनेकांचे संसार उघड्यावर आले. समोर पेरणीची वेळ आली असताना शेतकरी बी-बियाण्यासाठी पैसे असून डोक्याला हात लावून बसलेला दिसत आहे. अशी दयनिय अवस्था येथील पैनगंगा साखर कारखान्याने शेतकऱ्यांची केली आहे. गेल्या ६ महिन्यापासून कारखान प्रशासन शेतकऱ्यांना फक्त उडवा उडीचे उत्तर देण्याचे काम करत असल्‍याचे आरोप संतप्त शेतकरी करत आहेत. या कारखान्यावरील कर्मचाऱ्यांचे पगार सुद्धा ६ महिन्यापासून थकीत आहे. कर्मचाऱ्यांवरही उपासमारीची वेळ आलेली आहे. या जनआक्रोश मोर्चादरम्‍यान पीडित कर्मचारीसुद्धा उपस्थित होते.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »