फील्ड मार्शल सॅम माणेकशाॅ

आज गुरुवार, एप्रिल ३, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर चैत्र १३, शके १९४७
सूर्योदय : ०६:३१ सूर्यास्त : १८:५३
चंद्रोदय : १०:२१ चंद्रास्त : ००:२२, एप्रिल ०४
शालिवाहन शक संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
उत्तरायण
ऋतु : वसंत
चंद्र माह : चैत्र
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : षष्ठी – २१:४१ पर्यंत
नक्षत्र : रोहिणी – ०७:०२ पर्यंत
क्षय नक्षत्र : मृगशीर्ष – ०५:५१, एप्रिल ०४ पर्यंत
योग : सौभाग्य – ००:०१, एप्रिल ०४ पर्यंत
करण : कौलव – १०:४० पर्यंत
द्वितीय करण : तैतिल – २१:४१ पर्यंत
सूर्य राशि : मीन
चंद्र राशि : वृषभ – १८:२२ पर्यंत
राहुकाल : १४:१५ ते १५:४७
गुलिक काल : ०९:३६ ते ११:०९
यमगण्ड : ०६:३१ ते ०८:०४
अभिजितमुहूर्त : १२:१७ ते १३:०७
दुर्मुहूर्त : १०:३८ ते ११:२८
दुर्मुहूर्त : १५:३५ ते १६:२४
अमृत काल : २१:२९ ते २३:००
वर्ज्य : १२:२१ ते १३:५३
विजेसारखी तलवार चालवुन गेला,
निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,
वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,
मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला !
स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला.
पराक्रमी योद्धा, कुशल रणनीतिकार, वीर महानायक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांस शत शत प्रणाम!
फील्ड मार्शल सॅम होर्मसजी फ्रामजी जमशेदजी माणेकशाॅ – यांचा जन्म पंजाबमधील अमृतसर येथे पारशी कुटुंबात झाला. यांचे वडील होर्मुजी माणेकशॉ तर आईचे नाव हिराबाई होते. माणेकशॉ कुटुंब मूळचे वलसाड गुजरात येथील होते. माणेकशॉ यांचे शालेय शिक्षण अमृतसर येथे झाल्यानंतर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण नैनिताल येथील शेरवूड कॉलेज मध्ये घेतले. त्याच्या वडिलांची त्यांना स्वता: प्रमाणे डॉक्टर बनवायचे होते परंतु वडिलांच्या विरोधात जाउन त्यांनी देहरादून येथे असलेल्या भारतीय मिलिटरी ऍकॅडमी मध्ये प्रवेश घेतला. सॅम माणेकशॉ हे भारतीय मिलिटरी ऍकॅडमी मधून बाहेर पडणाऱ्या पहिल्या तुकडीचे विद्यार्थी होते. १९३४ मध्ये पदवीधर झाल्यानंतर त्यांची सेकंड लेफ्टनंट पदी नियुक्ती झाली.
सॅम माणेकशॉ हे भारतीय मिलिटरी ऍकॅडमी मधून बाहेर पडणाऱ्या पहिल्या तुकडीचे विद्यार्थी होते. १९३४ मध्ये पदवीधर झाल्यानंतर त्यांची सेकंड लेफ्टनंट पदी नियुक्ती झाली. माणेकशॉनी ब्रिटीश लष्करात व भारतीय लष्करात आपली जवळजवळ चाळीस वर्षांची कारकीर्द घडवली. दुसरे महायुद्ध तसेच १९४८, १९६५ व १९७१ या तिन्ही भारत-पाक तसेच १९६२ च्या चीन युद्धात त्यांचा हिररीने सहभाग होता. माणेकशॉ हे असे सरसेनापती आहेत ज्यांना त्यांच्या युद्ध-भूमीवरील शौर्यासाठी पदक मिळाले आहे. जपान बरोबरील बर्मा युद्धात ते प्राणांकित जखमी झाले होते.
७ जून १९६९ रोजी त्यांनी जनरल कुमारमंगलम यांच्याकडून सैन्यप्रमुख पदाची सुत्रे हाती घेतली. १९७१ च्या पूर्व पाकिस्तानातील घडामोडींनंतर भारतात मोठ्या प्रमाणावर निर्वासितांचा लोंढा येऊ लागल्याने माणेकशॉ यांचे सेनापतीपद कसाला लागले. या घडामोडींची परिणीती १९७१ च्या भारत-पाक युद्धात झाली. या युद्धात भारताने माणेकशॉ यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा जबरदस्त पराभव केला व बांगलादेशाची निर्मिती केली.
या युद्धात माणेकशॉ यांचे प्रभावी नेतृत्वाने तसेच अतिशय सजग युद्धनीतीने अमेरिकेचा पाठिंबा असूनही भारतीय सेनेने पाकिस्तानला पराभवाचे खडे चारले. याच घटनेने माणेकशॉ आज स्वतंत्र भारताचे सर्वोत्तम सेनानी मानले जातात.
माणेकशॉ यांच्या प्रभावी कामगीरीने तत्कालीन भारताचे राष्ट्रपती वराहवेंकट गिरी यांनी माणेकशॉ यांना १९७२ पद्मभूषण या सन्मानाने सन्मानित केले.
जानेवारी १ १९७३ रोजी माणेकशॉ यांना अतिशय खास असे फिल्ड मार्शलचे पद मिळाले स्वतंत्र भारतात केवळ दोनच व्यक्तींना हे पद मिळाले आहे. या पदावरील व्यक्ती कार्यरत नसली तरी अधिकारीक दृष्ट्या निवृत होत नाही. जानेवारी १५ १९७३ रोजी माणेकशॉ यांनी कार्यालयीन निवृती घेतली. निवृती नंतर ते तामिळनाडूतील वेलिंग्टन या सैनिकी कॅन्टोमेंट जवळील कून्नूर या शहरात रहात होते. या नंतरच्या काळात त्यांनी डिफेन्स सर्विसेस स्टाफ कॉलेजचे प्रमुख म्हणून काम केले. तसेच काही खाजगी कंपन्यांमध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणून पद भूषवले.
१९१४: फील्ड मार्शल सॅम माणेकशा यांचा जन्म. (मृत्यू: २७ जून, २००८)
विष्णू श्रीधर उर्फ हरीभाऊ वाकणकर हे भारतातल्या महत्त्वाच्या पुरातत्ववेत्त्यांपैकी होते.
पुण्याच्या डेक्कन कॉलेजचे विख्यात पुरातत्त्वज्ञ डॉ. ह. घी. सांकलिया यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपली पीएचडी पुर्ण केली. पीएचडीचा विषय होता ‘Painted Rock Shelters of India’. या महाकाय प्रबंधात त्यांनी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा आणि कर्नाटक या राज्यांमधल्या १५३२ शैलाश्रयांचा परामर्श घेतला आहे.
भीमबेटकाचे शैलाश्रय तर त्यांनी शोधलेचपण त्याचबरोबर आणखी अनेक कामं त्यांनी केली.
भारतभर त्यांनी शोधलेल्या शैलाश्रयांची संख्या जवळपास चार हजार आहे. या शैलाश्रयांमधे असलेल्या चित्रांचीत्यांनी रेखाटने करून ठेवली आहेत. अशी साडेसात हजार रेखाटने आजमितीला उज्जैनच्या ‘वाकणकर शोध संस्थान’च्या ताब्यात आहेत. यातली काही रेखाटने तर त्या शैलचित्रांच्या असण्याचा एकमेव पुरावा आहे कारण या जागा आता धरणाच्या पाण्याखाली गेल्या आहेत. हरीभाऊंनी नर्मदेच्या आणि चंबळच्या खो-यात महेश्वर, नव्दाटोली, इंद्रगढ, मनोती, अवरा, कायथा, मंदसोर, आझादनगर, डांगवाडा, रुनिजा अशा अनेक ठिकाणी उत्खनन केले. याखेरीज फ्रान्स, इंग्लंड आणि अमेरिकेतही परदेशी पुरातत्त्ववे त्यांच्या बरोबर प्रागैतिहासिक स्थानांच्या उत्खननात भाग घेतला होता.
भारती कलाभवनमध्ये शिकवत असतानाच हरीभाऊंनी १९५७ मध्ये इतिहास याविषयात एम ए ची डिग्री घेतली. ही डिग्री घेण्यापुर्वीच त्यांनी प्रत्यक्ष फिल्डवर्कला सुरुवातही केली होती. जंगलात दडलेल्या प्रागैतिहासिक जागा, आदिमानवाच्या वस्त्या, त्यांची हत्यारेइत्यादीचा शोध घेत होते. पावसाळ्यात उज्जैनच्या क्षिप्रानदीला पूर येऊन गेला की डोंगरावरून वहात आलेल्या गाळात फॉसिल्स, नाणी इतर काहीपुरातन वस्तू सापडत असत. उज्जैनच्या विक्रम कीर्ती मंदिर म्युझियममधे असलेले विशालकाय हत्तीचे मस्तक हरीभाऊंना एका पुरानंतर सापडलं होतं.
हरीभाऊंच्या नावावर इतर अनेक शोधही जमा आहेत. त्यांनी मध्यप्रदेशात ६८ ताम्रपाषाण युगातली स्थळंशोधली. धारच्या परमार राजवंशाचे शिलालेख शोधले. ऊज्जैन जवळच्या कायथा या गावातत्यांना ताम्रपाषाण युगातल्या एका संपूर्ण वेगळ्या संस्कृतीचा शोध लागला. या विषयीत्यांनी त्यांच्या ‘कायथा संस्कृती’ या पुस्तकात लिहिले आहे. बृहद्जातक या ग्रंथात ज्योतिषाचार्य वराहमिहिराचे जन्मस्थान म्हणुन उज्जैन जवळच्या ‘कपित्थक’ नावाच्या गावाचा उल्लेख होता. या उल्लेखाच्या आधारे हरीभाऊंनी शोध घेतला आणि एक पूर्णपणे वेगळी संस्कृती उजेडात आली.
हरीभाऊंची बुद्धी ही सर्वसंचारी होती. त्यांना पुरात्त्वविद्येत रस होता. शिलालेखांचे वाचनकरता येत होते आणि पुरातन नाण्यांचेही सखोल ज्ञान होते. मुळात वैदिक वाङ्मय, पुराणे आणि संस्कृत अभिजात वाङमयाशीही चांगला परिचय होता. संशोधनआणि व्याख्यानांच्या निमित्ताने त्यांनी इजिप्त, ऑस्ट्रिया, फ्रान्स, ग्रीस, जर्मनी, इटली, ब्रिटन आणि अमेरिकेत प्रवास केला. वेगवेगळ्या महत्वाच्या जागांवर काम केले. उज्जैनच्या विक्रम युनिव्हर्सिटीने स्थापन केलेल्या विक्रम कीर्ती मंदिर म्युझियमचे ते डायरेक्टर होते. दोघेही वाकणकरबंधू राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावंत अनुयायी होते. हरीभाऊ संघाचे प्रांतीय बौद्धिक प्रमुख आणि संस्कार भारतीचे सचिव होते.
१९८८ : जागतिक ख्यातीचे शैलाश्रायाचे अध्ययन करणारे, पाषाणावर काढलेल्या चित्रांचा अभ्यास करणारे, त्यामधून भारताच्या आणि जगाच्या उत्क्रांतीचा इतिहास एकत्रित मांडणारे कलाकार, शैलाश्रायाचे अभ्यासक, चित्रकार, व्यासंगी, ज्ञानी, सतत ज्ञानाची आकांक्षा असणारे ‘हरिभाऊ वाकणकर’ यांचे निधन (जन्म : ४ मे, १९१९)
- घटना :
१९४८: ओरिसा उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
१९७३: मार्टिन कूपर या मोटोरोला कंपनीतील संशोधकाने जगातील पहिला मोबाइल कॉल केला.
२०००: आयएनएस आदित्य हे इंधन पुरवणारे संपूर्ण भारतीय बनावटीचे वेगवान जहाज नौदलाच्या ताफ्यात दाखल झाले.
२०१०: ऍपल कंपनी ने आयपॅड या टॅब्लेट संगणकाची पहिली आवृत्ती जाहीर केली.
• मृत्यू :
१९८५: महामहोपाध्याय, संस्कृत विद्वान, प्राच्यविद्यासंशोधक पद्मभूषण डॉ. वासुदेव विष्णू मिराशी यांचे निधन. (जन्म: १३ मार्च, १८९३)
• १९९८: प्रसिद्ध गुजराती कादंबरीकार हरकिसन मेहता यांचे निधन. (जन्म : २५ मे , १९२८)
• २०१२: भारतीय राजकारणी गोविंद नारायण यांचे निधन. (जन्म: ५ मे १९१६)
- जन्म :
१७८१: भारतीय धार्मिक नेते स्वामीनारायण यांचा जन्म. (मृत्यू: १ जून, १८३०)
१८८२: सामाजिक ऐतिहासिक कादंबरीकार नाथमाधव यांचा जन्म. (मृत्यू: २१ जून , १९२८)
१९०३: पद्म विभूषण पुरस्कार सन्मानित मॅगसेसे पुरस्कार विजेत्या स्वातंत्र्यसैनिक पद्म विभूषण कमलादेवी चट्टोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑक्टोबर, १९८८)
१९०४: इन्डियन एक्सप्रेस वृत्तपत्रसमुहाचे संस्थापक रामनाथ गोएंका यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑक्टोबर, १९९१)
१९५५: सुप्रसिद्ध गायक पद्मश्री हरिहरन यांचा जन्म.
१९६२: चित्रपट अभिनेत्री आणि संसद सदस्य जयाप्रदा यांचा जन्म.