गेवराई तालुक्यात उसाच्या क्षेत्रात दुप्पट वाढ

जातेगाव : गेवराई तालुक्यात मागील वर्षात पाऊसकाळ चांगल्या प्रकारे झाल्याने यावर्षी उसाचे क्षेत्र दुपटीने वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे गेवराई तालुक्यातील धोंडराई, तळणेवाडी, तलवाडा, जातेगाव, टाकरवण या पट्ट्यामध्ये ऊस लागवड जास्त प्रमाणात दया देली आहे. परिणामी क्षेत्र राहिल्याचे दिसते. हा भाग ग्रीनबेल्ट समजला जातो. गोदावरी व नाथसागरचा उजवा कॅनॉल गेला आहे.
गोदावरीलगतच्या कॅनॉलमुळे ऊस लागवड क्षेत्रात भर पडली आहे. नाथसागराच्या कृपेने या क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांचे दिवस चांगले आले आहेत. या परिसरातील जातेगाव, रोहितळ, पांगरी, वडगाव, गोळेगाव, मारफळा, चोपड्याचीवाडी, टाकरवण येथील शेतकऱ्यांना फायदा होत आहे. नगदी पीक म्हणून या वर्षात शेतकऱ्यांनी पूर्ण भर ऊस लागवडीवर दिला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी उसाचे क्षेत्र वाढल्याने कापूस लागवड कमी प्रमाणात होणार असल्याचा असा अंदाज या परिसरात बांधला जात आहे.
…अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन छेडणार : शेतकरी संघटना
पुढील काळामध्ये शेतकऱ्यांचा ऊस कारखानदारांनी वेळेत ऊस नेणे व शेतकऱ्यांना एफआरपी वेळेत देणे महत्त्वाचे आहे. गतवर्षी तोडलेल्या उसाची एफआरपी अद्याप मिळालेली नाही. शेतकऱ्यांना एकरकमी देण्याच्या घोषणा केल्या जातात. कारखान्यांकडून मात्र एफआरपी वेळेत दिली जात नाही. सध्या मे महिना निम्मा संपला आहे. एक महिन्यावर पावसाळा येऊन ठेपलाच्या उसाचे उसाचे बिल साखर कारखाने व गूळ बुनिटकडून मिळालेले नाही. पाऊसकाळ जवळ आल्यामुळे शेतीसाठी वेळेवर पैसाही मिळालेला नाही. यातच मुला-मुलींचे लग्न करायला पैसा आणायचा कोठून, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. शेतकऱ्यांना तत्काळ बिल देऊन पंधरा दिवसांच्या आत खात्यावर रक्कम वर्ग करावी नसता लोकशाही मार्गाने रस्त्या उतरून आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे.