जागतिक युएफओ (UFO) दिन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज बुधवार, जुलै २, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर आषाढ दिनांक११, शके १९४७
सूर्योदय : ०६:०५ सूर्यास्त : १९:२०
चंद्रोदय : १२:१६ चंद्रास्त : ००:२३, जुलै ०३
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
दक्षिणायन
ऋतु : ग्रीष्म
चंद्र माह : आषाढ़
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : सप्तमी – ११:५८ पर्यंत
नक्षत्र : उत्तराफाल्गुनी – ११:०७ पर्यंत
योग : वरीयान् – १७:४७ पर्यंत
करण : वणिज – ११:५८ पर्यंत
द्वितीय करण : विष्टि – ००:५९, जुलै ०३ पर्यंत
सूर्य राशि : मिथुन
चंद्र राशि : कन्या
राहुकाल : १२:४३ ते १४:२२
गुलिक काल : ११:०३ ते १२:४३
यमगण्ड : ०७:४४ ते ०९:२४
अभिजित मुहूर्त : कोई नहीं
दुर्मुहूर्त : १२:१६ ते १३:०९
वर्ज्य : २०:२८ ते २२:१५

तापी जयंती, जी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमीला साजरी केली जाते, ती तापी नदीच्या (सूर्यपुत्री तापी) जन्मोत्सवाची (जन्मदिवसाची) आठवण म्हणून साजरी केली जाते. या दिवशी, तापी नदीची पूजा केली जाते आणि तिची महती गायली जाते.

पौराणिक कथेनुसार, तापी नदी ही सूर्यदेवाची कन्या आहे आणि म्हणूनच तिला सूर्यपुत्री देखील म्हणतात.
तापी नदी महाराष्ट्रातील एक प्रमुख नदी आहे, जी मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील मुलताई येथे उगम पावते.
ती पश्चिम दिशेला वाहते आणि सुरतजवळ अरबी समुद्राला मिळते. तापी नदीचे खोरे 65,145 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचे आहे.
या नदीला महाराष्ट्रातील सर्वात मोठी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी नदी म्हणून ओळखले जाते.

आज तापी जयंती आहे.

जागतिक उदयोन्मुख दिवस लोकांनी एकत्र येऊन अनोळखी उडणाऱ्या वस्तूंचे आकाश पाहण्यासाठीचा हा जागृती दिन आहे. हा दिवस काही २४ जूनला, तर दुसरा जुलै 2 रोजी साजरा केला जातो. इतर काही ठिकाणी २४ जुलै रोजी विमान वाहतूक करणारे कॅनेथ अर्नोल्ड यांनी अमेरिकेमध्ये प्रथमच आढळलेली अज्ञात उडणारी ऑब्जेक्ट असल्याचे म्हटले जाते .तर २ जुलै १९४७ मधील राझवेल यूएफओ घटनांमध्ये उद्रेक केलेल्या उफ्रो क्रॅशचे स्मरण करते.
२ जुलैच्या उत्सवाचा उद्दीष्ट “यूएफओच्या विश्वासार्ह अस्तित्वाबद्दल” जागरूकता वाढविणे आहे. आणि सरकारांना आपल्या फाइल्सला UFO sightings वर उघडण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे.

आज जागतिक युएफओ (UFO) दिन आहे.

समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक युसूफ मेहेर अली – भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाची दिशा निश्चिती करण्यास दोन घोषणांनी सर्वाधिक योगदान दिलेलं आहे. त्या म्हणजे, ‘गो बॅक सायमन’ (१९२७) व ‘चले जाव’ (१९४२); या दोन्ही घोषणांचे जनक युसूफ मेहरअली आहेत.

मेहरअली भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील मोठे नायक होते. त्यांनी भारताला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी आपलं आयुष्य खर्ची घातलं. स्वातंत्र्य आंदोलनात ते इतके व्यग्र झाले की प्रकृतीच्या प्रश्नांकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. आपल्या अल्प आयुष्यकाळात त्यांनी एक स्वातंत्र्यसेनानी, संघटक, राजकारणी व विचारवंत म्हणून वठवलेली भूमिका वादातीत आहे.
कॉलेजमध्ये असताना त्यांनी फीवाढ आणि विद्यार्थ्यांविरोधातली सरकारच्या दडपशाहीचा विरोध केला. भारतात आलेल्या सायमन कमिशनचा विरोध केला. ७ नोव्हेंबर १९२७ला ७ सदस्यीय सायमन आयोग काही घटनात्मक दुरुस्त्यासाठी भारतात आला होता. यात ब्रिटिशांशिवाय एकही भारतीय सामील करण्यात आलेला नव्हता. इंग्रजांच्या या अयोग्य व अपमानकारक निर्णयाच्या विरोधात भारतीयांमध्ये असंतोष उफाळून आला.

बॉम्बे यूथ लीग’ संघटनेअंतर्गत यूसुफ मेहेरअलींनी ‘सायमन कमीशन’विरोधात मोहीम उघडली. त्यांची योजना लीक झाली. परंतु ते डगमगले नाहीत. ३ फेब्रुवारी १९२८ला ते वेषांतर करून आपल्या सहकारी मित्रांसह मुंबईतल्या त्या बंदरावर पोहोचले, जिथे कमिशनचं शिष्टमंडळ उतरणार होतं. सायमन कमिशन बंदरावर दाखल होताच त्यांनी आयोगाला काळे झेंडे दाखवले व ‘सायमन गो बॅक’ची घोषणा दिली.
ब्रिटिश पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला. परंतु यूसुफ आणि त्यांच्या तरुण क्रांतिकारकांनी दिलेला नारा इतका बुलंद होता की, त्यांचा आवाज भारताच्या कोनाकोपऱ्यात पोहचला. (नंतर यूसुफ यांनी लाठीचार्ज करणारा पोलीस सार्जेंटवर खटला दाखल केला. कोर्टाने निकाल यूसुफ यांच्या बाजुने देऊन पोलिसाला १०० रुपयाचा दंड ठोठावला.) या घटनेने यूसुफ मेहरअलींचे नाव देशभरात पोहोचले. महात्मा गांधींसोबत अनेकांच्या तोंडी ‘सायमन गो बॅक’ची घोषणा आली.

१९५०: समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक इंग्रजांविरोधात ‘चले जाव’ घोषणा तयार करणारे ‘चले जाव’ युसूफ मेहेर अली यांचे निधन (जन्म : २३ सप्टेंबर, १९०३)

  • घटना :
    १६९८: थॉमस सावेरी यांनी पहिले स्टीम इंजिन चे पेटंट मिळवले.
    १८५०: बेंजामिन लेन या शास्त्रज्ञाला गॅस मास्कचे पेटंट मिळाले.
    १८६५: साल्व्हेशन आर्मी या सेवाभावी संस्थेची स्थापना झाली.
    १९४०: नेताजी सुभाषचंद्र बोस यांना कलकत्ता येथे स्थानबद्ध करण्यात आले.
    १९६२: रॉजर्स, आरकॅन्सास येथे पहिले वॉल मार्ट स्टोअर उघडले.
    १९७२: पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी सिमला करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
    १९८३: कल्पक्कम,तामिळनाडू येथील अणुऊर्जा केंद्र सुरू झाले.
    २००१: बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील केसरिया गाव येथे १०४ फूट उंचीचा जगातील मोठा बौध्द स्तूप सापडला.
    २००२: स्टीव फॉसेट हा उष्ण हवेच्या फुग्याद्वारे पृथ्वी प्रदक्षिणा करणारा सर्वप्रथम व्यक्ती झाला.

• मृत्यू :

• २००७: क्रिकेटपटू दिलीप सरदेसाई यांचे निधन. (जन्म: ८ ऑगस्ट १९४०)
• २०११: कम्युनिस्ट नेते चतुरनन मिश्रा यांचे निधन. (जन्म: ७ एप्रिल १९२५)

  • जन्म :
    १८८०: श्रेष्ठ गायक, नेट गणेश गोविंद बोडस उर्फ गणपतराव बोडस यांचा शेवगाव, अहमदनगर येथे जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर, १९६५)
    १९२३: लोकमत चे संस्थापक, संपादक, माजी मंत्री व स्वातंत्र्य सेनानी जवाहरलालजी दर्डा यांचा जन्म. . ( मृत्यू:२५ नोव्हेंबर, १९९७ )
    १९२५ : चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री शांता जोग यांचा जन्म (मृत्यू : ५ एप्रिल, १९८०)
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »