पुढील हंगामपासून वजनकाटे ऑनलाइन : राजू शेट्टी

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे – राज्यातील साखर कारखान्यांचे वजन काटे ॲानलाईन करण्यासंदर्भात साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचेसोबत पुणे येथे साखर आयुक्त कार्यालयात बैठक झाली. पुढील हंगामापासून राज्यातील साखर कारखान्याचे वजनकाटे ॲानलाईन करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी दिली.

राज्यातील साखर कारखान्यामध्ये ऊस वजन काट्यात सर्रास काटामारी होत असल्याचे शेतक-यांच्या निदर्शनास येऊ लागले आहे. अनेक साखर कारखान्यांच्या वजनामध्ये घट आले असल्याचे रंगेहाथ पकडण्यात आले आहे, असे राजू शेट्टी म्हणाले.

सरासरी ६०० किलोपासून ते अडीच टनापर्यंत काटामारी होत असल्याचे आढळून येवू लागले आहे. याबाबत गेल्या वर्षभरापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सातत्याने आंदोलन करण्यात येत आहे. २९ नोव्हेंबर रोजी सह्याद्री अतिथीग्रहात झालेल्या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व साखर कारखान्याचे वजनकाटे ॲानलाईन करण्याबाबत वजनकाटे महानिरीक्षक यांना निर्देश दिले आहेत.

याबाबत मी सातत्याने पाठपुरावा करून वजनकाटे ॲानलाईन करण्यासाठी अनेक तज्ञांच्या भेटी घेतल्या. यानंतर संगणक अभियांत्रीकी तज्ञ यांनी राज्यातील वजनकाट्यावर ऊस गाडी वजनास आल्यानंतर त्या ऊसाचे वजन एकाच वेळेस शेतकरी , साखर कारखाना व साखर आयुक्त यांना कळावे व या वजनकाट्यात असलेल्या लोडसेलमध्ये कोणत्याही कारखान्याने छेडछाड केली तर त्याचे नियंत्रण साखर आयुक्त यांचेकडे असल्याने याबाबत त्यांना तातडीने तसा मेसेज पोहचविण्याची व्यवस्था या प्रणालीमध्ये असणार आहे, असे राजू शेट्टी म्हणाले.

पुढील आठवड्यापर्यंत सदर प्रणालीची प्रस्ताव साखर आयुक्त कार्यालयाकडून तयार करून वजन मापे महानियंत्रक यांच्या कार्यालयाकडे सादर करण्यात येणार असून यामुळे लवकरच शासनाला वजनकाटे ॲानलाईनची अमलबजावणी करण्याबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »