कवी अनिल

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज गुरुवार, मे ८, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर वैशाख दिनांक १८ , शके १९४७
सूर्योदय : ०६:०७
सूर्यास्त : १९:०३
चंद्रोदय : १५:३९
चंद्रास्त : ०३:५१, मे ०९
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
उत्तरायण
ऋतु : वसंत
चंद्र माह : वैशाख
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : मोहिनी एकादशी – १२:२९ पर्यंत
नक्षत्र : उत्तराफाल्गुनी – २१:०६ पर्यंत
योग : हर्षण – ०१:५७, मे ०९ पर्यंत
करण : विष्टि – १२:२९ पर्यंत
द्वितीय करण : बव – ०१:४१, मे ०९ पर्यंत
सूर्य राशि: मेष
चंद्र राशि : कन्या
राहुकाल : १४:१२ ते १५:४९
गुलिक काल : ०९:२१ ते १०:५८
यमगण्ड : ०६:०७ ते ०७:४४
अभिजित मुहूर्त : १२:०९ ते १३:०१
दुर्मुहूर्त : १०:२६ ते ११:१७
दुर्मुहूर्त : १५:३६ ते १६:२८
अमृत काल : १३:०३ ते १४:५१

८ मे १८२८, रोजी रेड क्रॉस या संस्थेचे सहसंस्थापक हेनरी डूनेंट यांचा जन्म दिवस हा आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस आणि रेड क्रेसेंट दिन मानला जातो.

१८९९: क्रांतिकारक वासुदेव चाफेकर यांचा बलिदान दिन

अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना
मिटले तसेच ओठ, की पाकळी हले ना !

समजूत मी करावी, म्हणुनीच तू रुसावे
मी हास सांगताच, रडताहि तू हसावे
ते आज का नसावे, समजावणी पटे ना
धरिला असा अबोला, की बोल बोलवेना !

का भावली मिठाची, अश्रूंत होत आहेविरणार सागरी ह्या जाणून दूर राहे ?
चाले अटीतटीने, सुटता अढी सुटेना
मिटवील अंतराला, ऐसी मिठि जुटे ना !

की गूढ काहि डाव, वरचा न हा तरंग
घेण्यास खोल ठाव, बघण्यास अंतरंग ?
रुसवा असा कसा हा, ज्या आपले कळेना ?
अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना !

कवी – अनिल
(गायक – कुमार गंधर्व)

१९८२: ४० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कवी अनिल तथा आत्माराम रावजी देशपांडे यांचे निधन. (जन्म: ११ सप्टेंबर, १९०१)

  • घटना :

१७५८ : रघुनाथराव आणि मल्हारराव होळकर यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी पेशावरचे युध्द् जिंकून पाकिस्तान प्रांतात भगवा झेंडा फडकवला होता. पेशावर जिंकून मराठा साम्राज्य अफ़गाणिस्तानच्या सीमेपर्यंत जाऊन पोहोचले होते.
१८८६: जॉन पेंबरटन यांनी कोका कोला हे पेय पहिल्यांदाच तयार करुन विकले.
१९१२: पॅरामाउंट पिक्चर्स (Paramount Pictures) या कंपनीची स्थापना झाली.
१९३२: पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे शिष्य पं. विनायकराव पटवर्धन यांनी पुणे येथे गांधर्व महाविद्यालय सुरू केले.
१९३३: महात्मा गांधी यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध आपले २१ दिवसांचे उपोषण सुरू केले.
१९४५: दुसरे महायुद्ध – युरोप विजय दिन – जर्मनीची दोस्त राष्ट्रांसमोर बिनशर्त शरणागती, युरोपमधील युद्ध समाप्त.
१९६२: पश्चिम बंगाल येथील कोलकाता येथे रवींद्र भारती विद्यापिठाची स्थापना.
१९७४: रेल्वे कामगारांचा देशव्यापी संप झाला. सरकारविरुद्धचा असंतोष वाढत जाऊन आणीबाणी पुकारली जाण्याला जी कारणे घडली, त्यात हा संप महत्त्वाचा मानला जातो.

• मृत्यू :

१९२०: पाली भाषा व बौद्ध साहित्य या विषयावरचे अभ्यासक चिंतामण वैजनाथ राजवाडे यांचे निधन.
१९८१: संस्कृतज्ञ, मराठी कवी डॉ. केशव नारायण वाटवे यांचे निधन.
१९८४: रीडर डायजेस्ट चे सहसंस्थापक लीला बेल वालेस यांचे निधन. (जन्म: २५ डिसेंबर १८८९)
१९९५: पत्रकार, संपादक, राजकीय विश्लेषक आणि मुत्सद्दीप्रेम भाटिया यांचे निधन. (जन्म: ११ ऑगस्ट१९११)
१९९५: देवदेवतांची आणि संतांची चित्रे यामुळे प्रसिद्ध असलेले चित्रकार जि. भी. दीक्षित यांचे निधन.
१९९९: कलादिग्दर्शक श्रीकृष्ण समेळ यांचे निधन.
२००३: संस्कृत व प्राकृत विद्वान डॉ. अमृत माधव घाटगे यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट, १९१३)
२०१३: धृपद गायक झिया फरिदुद्दीन डागर यांचे निधन. (जन्म: १५ जून, १९३२)

जन्म :
१९०६: भारताचे माजी भूसेनाप्रमुख प्राणनाथ थापर यांचा जन्म. (मृत्यू: २३ जून १९७५)
१९१६: स्वामी चिन्मयानंद यांचा जन्म. (मृत्यू: ३ ऑगस्ट , १९९३)
१९१६: भारतीय सिनेमॅटोग्राफर रामानंद सेनगुप्ता यांचा जन्म. (मृत्यू: २३ ऑगस्ट, २०१७)

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »