शिरपूर साखर कारखाना कार्यरत होणार

शिरपूर : तालुक्यातील शिरपूर साखर कारखाना लवकरच पुन्हा कार्यरत होणार, यासाठी माँ रेवा शुगर्स कंपनीसोबत २० वर्षांचा करार केला असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन माधवराव पाटील यांनी दिली. याबाबत सर्व सभासदांची मान्यता घेऊनच निर्णय घेण्यात आला आहे, असेही ते म्हणाले. यासोबतच कारखान्यासमोर ‘डेरगे भरो’ आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना ‘शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास मातीत मिळवू नका,’ अशी साद त्यांनी घातली आहे.
दरम्यान, शिरपूर साखर कारखान्यास पुन्हा गतवैभव प्राप्त होण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या भवितव्याला नवे वळण देण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन माधवराव पाटील आणि संचालक मंडळाने केले आहे.
‘शिसाका’ची १३२ कोटी रुपयांच्या कर्जाच्या डोंगरातून सुटका करण्यासाठी माजी मंत्री आ. अमरिशभाई पटेल यांच्या प्रयत्नाने कर्जाची रक्कम ३२ कोटींवर आणण्यात यश मिळाले. माँ रेवा शुगर्स या अनुभवी कंपनीसोबत करार करण्यात आला आहे. कंपनीने यापूर्वी ७ साखर कारखाने यशस्वीरित्या चालवले असून, ईथेनॉल आणि वीज निर्मितीमध्येही त्यांनी मोठे योगदान दिले आहे. कोटींची अनामत रक्कम माँ रेवा शुगर्सने आधीच कारखान्याकडे भरली असून, अंतिम तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होताच काम सुरू होणार असल्याचे चेअरमन पाटील यांनी स्पष्ट केले.
चेअरमन माधवराव पाटील यांनी आंदोलकांवर टीका करताना म्हटले, ‘ज्यांच्या काळात कारखाना बंद पडला, तेच आता श्रेय घेण्यासाठी आंदोलन करत आहेत. कारखाना चालू ठेवण्यासाठी जे प्रयत्न झाले, त्याचा थोडा तरी आदर ठेवावा.’ त्यांनी पुढे सांगितले की, आ. अमरिशभाई पटेल आणि आ. काशीराम पावरा यांच्या मार्गदर्शनामुळेच होण्याच्या उंबरठ्यावर आला आहे. ‘शेतकऱ्यांच्या खिशात परत पैसा यावा, त्यांची मुले शिक्षित व्हावीत, त्यांचे संसार फुलावेत यासाठीच हा लढा आहे,’ असेही त्यांनी नमूद केले.