जागतिक दहशतवाद विरोधी दिवस

आवडल्यास ही बातमी शेअर करा

गुरुवार, मे २१, २०२६ युगाब्द : ५१२८
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर वैशाख ३१, शके १९४८
सूर्योदय : ०६:०२ सूर्यास्त : १९:०८
चंद्रोदय : १०:३२ चंद्रास्त : २३:५४
शक : १९४८
संवत्सर : पराभव
उत्तरायण
ऋतु : ग्रीष्म
चंद्र माह : ज्येष्ठ (अधिक)
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : पञ्चमी – ०८:२६ पर्यंत
नक्षत्र : पुष्य – ०२:४९, मे २२ पर्यंत
योग : गण्ड – १०:५८ पर्यंत
करण : बालव – ०८:२६ पर्यंत
द्वितीय करण : कौलव – १९:२० पर्यंत
सूर्य राशि : वृषभ
चंद्र राशि : कर्क
राहुकाल : १४:१३ ते १५:५२
गुलिक काल : ०९:१९ ते १०:५७
यमगण्ड : ०६:०२ ते ०७:४०
अभिजित मुहूर्त : १२:०९ ते १३:०१
दुर्मुहूर्त : १०:२४ ते ११:१७
दुर्मुहूर्त१५:३९ ते १६:३१
अमृत काल : २०:४७ ते २२:१८
वर्ज्य : ११:४४ ते १३:१५

गुरुपुष्यामृत योग म्हणजे गुरुवारी पुष्य नक्षत्र आल्यावर तयार होणारा अत्यंत शुभ आणि पुण्यदायी काळ याला ‘गुरुपुष्य योग’ असेही म्हणतात.

गुरुपुष्यामृत योग हा नवीन सुरुवात करण्यासाठी आणि आर्थिक प्रगतीसाठी पंचांगानुसार एक अत्यंत शुभ मुहूर्त आहे
हा योग वर्षातून केवळ काही वेळाच येतो, त्यामुळे याला विशेष महत्त्व आहे.

आज गुरुपुष्यामृत योग आहे. ( सूर्योदय ते उत्तर रात्री २.५० पर्यंत )

आज जागतिक दहशतवाद विरोधी दिवस आहे.

  • पंतप्रधान राजीव गांधीनी तंत्रज्ञानसंबंधी क्षेत्रात आयातीवर सूट दिली. खासकरुन संगणक, दूरसंचार क्षेत्र यात त्यांनी खास प्रयत्न केले. लायसन्स राज संपवण्याचा प्रयत्न करत त्यांनी आयातीचे नियम शिथिल केले.

३१ ऑक्टोंबर इ.स. १९८४ रोजी इंदिराजींची हत्या झाली. राजीव गांधीवर पंतप्रधान पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. इ. स. १९८८ मध्ये त्यांनी श्रीलंकेत शांतिसेना पाठविण्याचा निर्णय घेतला. त्याची परिणती लिट्टेसोबतच्या संघर्षात झाली. याच सुमारास बोफोर्स घोटाळ्यात त्यांच्यावर झालेल्या आरोपांनी त्यांची स्वच्छ राजकारण्याची प्रतिमा मलिन झाली. अखेर इ.स. १९८९ च्या लोकसभा निवडणुकांत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

१९९१ मध्ये लोकसभा निवडणुकांचा प्रचारसभे दरम्यान लिट्टे ने मानवी बॉम्बचा ( “धनु” नावाची मुलगी ) वापर करून राजीव गांधींची हत्या केली.

• १९९१: भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या. (जन्म: २० ऑगस्ट १९४४)

आदरणीय प.पु. गुरुमाऊली सद्गुरु मोरेदादा यांचा जन्म २१ मे १९२४ रोजी झाला. त्यांचे नाव खंडोबा या कुलदैवताच्या नावावरून पडले आहे.

त्यांचे नित्य सामाजिक जीवन आनंदाने जगत असताना, सद्गुरु मोरेदादा यांना ज्ञानप्राप्तीसाठी सद्गुरु पिठले महाराजांकडे जाण्याचे रहस्यमय निर्देश देण्यात आले.

खरं तर, सद्गुरु मोरेदादा हे भगवान श्री श्रीरामांचे उत्कट भक्त होते. तथापि, भगवान श्रीरामांनी त्यांना दृष्टान्तात दर्शन दिले आणि त्यांना सद्गुरु पिठले महाराजांकडे जावे आणि भविष्यातील कृतीसाठी तयार राहावे असे सांगितले. कलियुगाचे प्रमुख देव स्वामी महाराज आहेत जे यापूर्वी भगवान श्री श्रीराम, श्रीकृष्ण, श्री पांडुरंग, श्री वेंकटेश म्हणून त्यांच्या महाविष्णू अवतारांचा भाग म्हणून प्रकट झाले आहेत, त्यामुळे स्वामी सेवेचा प्रसार करणे हे दिव्य ध्येय होते.

सद्गुरु पिठले महाराजांनी आपल्या मर्त्य कुंडली सोडल्यानंतर, सद्गुरु मोरेदादांनी स्वामी दरबार दिंडोरी येथील त्यांच्या शेतात आणला आणि तेथून स्वामी सेवेला सुरुवात केली. तेव्हापासून ते दिंडोरी दरबार म्हणून ओळखले जाते. स्वामी महाराजांनी स्वतः अक्कलकोटमध्ये असताना ज्याप्रमाणे सद्गुरु मोरेदादांनी महाराष्ट्राच्या विविध भागांतून अनेक समर्पित भक्त (सेवेकरी) निर्माण केले. अशाप्रकारे, इतरांना साखळीत मदत करण्यासाठी शेकडो दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रे सुरू करण्यात आली. स्वतः स्वामी महाराजांच्या दृष्टिकोनातून एक प्रचंड आध्यात्मिक जाळे गूढ पद्धतीने बांधले गेले.

सद्गुरु मोरेदादा यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात स्वामी समर्थ सेवाकार्यांचा प्रसार करण्यासाठी नेहमीच स्वतःच्या पैशाने आणि अनेकदा योग्य वाहतुकीच्या साधनाशिवाय परिश्रम घेतले. सद्गुरु मोरेदादा हे एक सामान्य शेतकरी असूनही हे मोठे काम साध्य केले.

१९८८ : २१ मे १९८८ रोजी, सद्गुरु मोरेदादांनी त्यांचे ज्येष्ठ पुत्र, परमपूज्य गुरुमाऊली श्री श्रीराम उर्फ अण्णासाहेब मोरे यांना आध्यात्मिक वंश सोपवल्यानंतर काही मिनिटांतच देहत्याग केला. ( जन्म: २० मार्च, १९५५ )

• घटना :
१८८१: वॉशिंग्टन (डी. सी.) येथे अमेरिकन रेड क्रॉस ची स्थापना झाली.
१९०४: पॅरिसमध्ये फेड्रेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशन (फिफा) ची स्थापना झाली.
१९२७: चार्ल्स लिंडबर्ग यांनी एकट्याने जगातील पहिले न थांबता अटलांटिक महासागर पार करणारे उड्डाण पूर्ण केले.
१९३२: अमेलिया इअरहार्ट ह्या अटलांटिक महासागर एकटयाने पार करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या.
१९९२: चीनने १,००० किलो टन क्षमतेच्या अणुबॉम्बची यशस्वी चाचणी केली. हा जगातील सर्वात शक्तिशाली अणुस्फोट आहे.
१९९४: ४३ व्या जागतिक सौंदर्य स्पर्धेत मिस इंडिया सुश्मिता सेनने मिस युनिव्हर्स हा किताब पटकावला. हा किताब मिळवणारी ती पहिलीच भारतीय आहे.
१९९६: सांगली जिल्ह्यातील माधवराव पाटील हे ब्रिटन मधील इलिंग शहराचे महापौर झाले.

• मृत्यू :
• १९७९: स्वातंत्र्य वीरांगना जानकीदेवी बजाज यांचे निधन. (जन्म: ७ जानेवारी १८९३)
१९९८: इंटकचे सोलापुरातील नेते आबासाहेब बाबूराव किल्लेदार यांचे निधन.
• २०२१ : पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय पर्यावरणवादी असून चिपको आंदोलनाचे प्रणेते सुंदरलाल बहुगुणा यांचे निधन ( जन्म : ९ जानेवारी, १९२७ )

  • जन्म :
    १९२८: कला समीक्षक व लेखक ज्ञानेश्वर नाडकर्णी यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर, २०१०)
    १९३१: हिन्दी कवी, लेखक व उपहासकार शरद जोशी यांचा जन्म. (मृत्यू: ५ सप्टेंबर १९९१)
    १९५६: अभिनेता रविन्र्द मंकणी यांचा जन्म.
    १९६०: दक्षिण भारतीय अभिनेता मोहनलाल यांचा जन्म.
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »