छत्रपतीची ऊस गाळपात आघाडी

आवडल्यास ही बातमी शेअर करा

बारामती : बारामती येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याने गेल्या 178 दिवसांमध्ये 12 लाख टन उसाचे गाळप केले आणि 13 लाख 15 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले. जोपर्यंत संपूर्ण शेतकऱ्यांच्या उसाचे गाळप होणार नाही तोपर्यंत कारखान्याची धुराडी बंद केली जाणार नसल्याचे आश्वासन कारखाना प्रशासानाने दिले आहे.

ऑक्टोंबर 2021 मध्ये यंदाच गाळप हंगाम सुरु झाला होता. ऊसाचे वाढते क्षेत्र लक्षात घेता प्रशासकीय स्तरावरुन योग्य ते नियोजन करण्यात आले होते. पण अपेक्षेपेक्षा यंदा उसाचे क्षेत्र वाढल्याने मराठवाड्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न हा कायम आहे. मात्र, छत्रपती सहकारी साखर कारखान्याने हंगामाच्या सुरवातीपासूनच गाळपाचे योग्य नियोजन केले. शिवाय गाळपाची क्षमताही वाढवली त्यामुळेच 178 दिवसांमध्ये 12 लाख टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान तर टळले आहेच पण कारखान्याची क्षमताही वाढलेली आहे.

साखरेच्या उताऱ्यावरच उत्पादन अवलंबून असते. पण योग्य वेळी झालेल्या गाळपामुळे याचा शेतकऱ्यांनाही फायदा झाला आहे. 12 लाख टन उसाचे गाळप केल्यानंतर यातून कारखान्याला 13 लाख 15 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. देशात सर्वाधिक साखरेचे उत्पादन हे महाराष्ट्रात झालेले आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा समावेश आहे.छत्रपती साखर कारखान्याचा उतारा 11.07 टक्के राहिलेला आहे. अधिकच्या उताऱ्यामुळेच साखर उत्पादनात वाढ झाल्याचे कारखाना प्रशासनाने सांगितले आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »