जागतिक पुस्तक दिन

आज बुधवार, एप्रिल २३, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर वैशाख ३, शके १९४७
सूर्योदय : ०६:१६ सूर्यास्त : १८:५८
चंद्रोदय : ०३:३१, एप्रिल २४ चंद्रास्त : १४:३४
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
उत्तरायण
ऋतु : वसंत
चंद्र माह : चैत्र
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : दशमी – १६:४३ पर्यंत
नक्षत्रधनिष्ठा – १२:०७ पर्यंत
योग : शुक्ल – १८:५१ पर्यंत
करण : विष्टि – १६:४३ पर्यंत
द्वितीय करण : बव – ०३:४२, एप्रिल २४ पर्यंत
सूर्य राशि : मेष
चंद्र राशिकुंभ
राहुकाल : १२:३७ ते १४:१२
गुलिक काल : ११:०२ ते १२:३७
यमगण्ड : ०७:५१ ते ०९:२६
अभिजित मुहूर्त : कोई नहीं
दुर्मुहूर्त : १२:११ ते १३:०२
अमृत काल : ०४:०१, एप्रिल २४ ते ०५:३१, एप्रिल २४
वर्ज्य : १८:५६ ते २०:२७
२३ एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन आणि जगप्रसिध्द साहित्यिक शेक्सपिअरचा जन्मदिन आणि मृत्यूदिनही! वाचन संस्कृतीच्या चर्चेशिवाय पुस्तकदिन पोरकाच. वाचन संस्कृतीवर आलेली अवकळा व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा सुळसुळाट यांचा अकारण सकारण संबंध जोडला जातो आणि संबंधाचा सबळ पुरावा देण्यासाठी अलीकडच्या मुलांच्या वाचन सवयीवर अमर्याद चर्चा होऊन पूर्णविराम दिला जातो.
अलिकडची मुलं वाचत नाहीत. मुलांना पुस्तक उपलब्ध नाही. ही विधाने जितकी खरी वाटतात तितकेच प्रश्नही निर्माण करतात व तिथेच थांबतात. मात्र आजच्या दिनाच्या औचित्याने आडातले पोहणा-यांना नक्कीच आणता येईल.
आज जागतिक पुस्तक दिन आहे.
आज इंग्रजी भाषा दिन (यूएन) आहे.
लेके पहला पहला प्यार
भरके आँखों मैं खुमार
जादू नगरी से आया है कोई जादूगर
लेके पहला पहला प्यार …
उसकी दीवानी हाय कहूँ कैसे हो गई
जादूगर चला गया मैं तो यहाँ खो गई
नैना जैसे हुए चार
गया दिल का क़रार
जादू नगरी से आया है कोई जादूगर
लेके पहला पहला प्यार …
- गायिका शमशाद बेगम
हिंदी चित्रपट सृष्टीतील पहिल्या पार्श्वगायिकांपैकी एक होत्या. त्यांनी ५७७ पेक्षा जास्त चित्रपटांत गाणी गायली आहेत.
शमशाद बेगम यांनी गायनाची सुरुवात रेडियो पासून केली .. इ.स. १९३७ मध्ये लाहौर येथे रेडियोवर त्यांनी पाहिले गाणे गायले. आणि त्यांनतर त्यांना पेशावर, लाहोर आणि दिल्ली रेडियो स्टेशनवरही गाणी गायला मिळाली. त्या नंतर त्यांनी लाहोरमध्ये निर्माण झालेले चित्रपट खजांची आणि खानदान यांसाठी गाणी म्हटली. ही गाणी अतिशय लोकप्रिय झालीआणि भारतभ गाजली. त्यानंतर इ.स. १९४४ मध्ये त्या स्वप्नाची नगरीत, मुंबईत, आल्या.
मुंबईमध्ये आल्यानंतर शमशाद यांनी नौशाद अली, राम गांगुली, एस.डी. बर्मन, सी रामचंद्र, खेमचंद प्रकाश आणि ओ.पी. नय्यर सारख्या दिग्गज संगीतकारांसाठी गाणी गायली .
२०१३: पार्श्वगायिका पद्मभूषण शमशाद बेगम यांचे निधन. (जन्म: १४ एप्रिल, १९१९)
सत्यजित राय हे ऑस्कर पुरस्कारविजेते भारतीय लेखक, पटकथालेखक, संगीतकार, निर्माते आणि दिग्दर्शक होते. चित्रपट जगतातील त्यांच्या कामगिरीबद्दल इ.स. १९९२ मध्ये त्यांना जीवनगौरव ऑस्कर पुरस्कार देण्यात आला. ऑस्कर मिळवणारे ते एकमेव भारतीय दिग्दर्शक आहेत. त्यांनी अपु के वर्ष (इ.स. १९५० ते इ.स. १९५८) व इ.स. १९५५ मध्ये पथेर पांचाली या चित्रपटाची निर्मिती केली. यांनी एकूण ३७ चित्रपटांची निर्मिती केली. ते स्वतःच चित्रपटांना संगीत देत, पटकथा लेखन, दिग्दर्शन व संपादन अशी अनेक कामे करत.
यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल भारत सरकार तर्फे पद्मश्री हा पुरस्कार देण्यात आला. या शिवायही त्यांना युगोस्लाव्हियाचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार, ऑक्सफर्ड विश्वविद्यालयातर्फे डी. लिट. असे अनेक मान सन्मान प्राप्त झाले. फ्रान्स येथील कान चित्रपट महोत्सव यांसहित यांना एकूण ११ आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले.
• १९९२: ख्यातनाम चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक सत्यजित रे यांचे निधन. (जन्म: २ मे, १९२१)
- घटना :
१६३५: अमेरिकेतील पहिली सार्वजनिक शाळा बोस्टन लॅटिन स्कूल स्थापन झाली.
१८१८: इंग्रज अधिकारी मेजर हॉल यास कर्नल प्रॉयर याने रायगड किल्ल्याची टेहळणी करण्यास पाठवले.
१९४० : श्री.नरहरी नारायण भिडे रचित, रा.स्व. संघ शाखेत नित्य म्हटली जात असणाऱ्या “नमस्ते सदा वत्सले मात्रूभुमे” या वर्तमान प्रार्थनेला चाल लावली ती श्री.यादवराव जोशी यांनी व पहिल्यांदा श्री.अनंतराव काळे यांनी ती दि.२३ एप्रिल,१९४० रोजी पुण्याच्या संघ शिक्षा वर्गात तर स्वत: यादवराव जोशी यांनी ती दि.१८ मे,१९४० रोजी नागपूरच्या संघ शिक्षा वर्गात गायली.त्यांची ही विलक्षण प्रतिभा व संगीत साधना पाहून पंडित भीमसेन जोशी देखील थक्क झाले होते.
१९९०: नामिबियाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
• मृत्यू :
• १९५८: निष्ठावान समर्थभक्त, समर्थ वाङ्मयाचे आणि संप्रदायाचे अभ्यासक व प्रकाशक शंकर श्रीकृष्ण देव यांचे निधन. (जन्म: १० ऑक्टोबर , १८७१)
• २०००: ४० वर्षे लालबागमधील भारतमाता चित्रपटगृह चालवणारे बाबासाहेब भोपटकर यांचे निधन.
• २००१: संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते आणि गोवा मुक्ती संग्रामातील सेनापती जयंतराव टिळक यांचे निधन. (जन्म: १२ ऑक्टोबर, १९२१)
- जन्म :
१८५८: समाजसुधारक पंडिता रमाबाई सरस्वती यांचा जन्म. (मृत्यू: ५ एप्रिल १९२२)
१८७३: अस्पृश्यता निवारण हे जीवनध्येय मानलेले व्यासंगी समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म. (मृत्यू: २ जानेवारी, १९४४)
१९०० : शास्त्रीय गायक.पंडित शंकरराव बोडस यांचा जन्म ( मृत्यू : १० जुलै १९८६ )
१९१३ : स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, राजर्षी शाहू या महापुरुषांची अतिशय समर्पक चरित्रे लिहून आधुनिक चरित्रलेखनाचा उच्च कोटीचा मानदंड प्रस्थापित करणारे सव्यसाची लेखक म्हणून ओळख असणारे धनंजय कीर यांचा जन्म ( मृत्यू : १२ मे १९८४ )
१९१८ : लोणावळा येथील मन:शक्ती प्रयोग केंद्राचे प्रथम चिंतक पुरूषोत्तम रामचंद्र भिडे तथा स्वामी विज्ञानानंद यांचा जन्म . ( मृत्यू : १८ नोव्हेंबर १९९३ )
१९३८: दक्षिण भारताच्या ‘सुर कोकिला’ शास्त्रीय गायिका एस. जानकी यांचा जन्म.
१९५९ : जेष्ठ पत्रकार निखील वागळे यांचा जन्म
१९७७: भारतीय-अमेरिकन अभिनेते काल पेन यांचा जन्म.