आदि शंकराचार्य

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज शुक्रवार, मे २, २०२५ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर वैशाख दिनांक १२ , शके १९४७
सूर्योदय : ०६:१० सूर्यास्त : १९:०१
चंद्रोदय : १०:१२ चंद्रास्त : ००:०७, मे ०३
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
उत्तरायण
ऋतु : वसंत
चंद्र माह : वैशाख
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : पञ्चमी – ०९:१४ पर्यंत
नक्षत्र : आर्द्रा – १३:०४ पर्यंत
योग : धृति – ०३:२०, मे ०३ पर्यंत
करण : बालव – ०९:१४ पर्यंत
द्वितीय करण : कौलव – २०:२७ पर्यंत
सूर्य राशि : मेष
चंद्र राशि : मिथुन
राहुकाल : १०:५९ ते १२:३६
गुलिक काल : ०७:४६ ते ०९:२३
यमगण्ड : १५:४८ ते १७:२५
अभिजितमुहूर्त : १२:१० ते १३:०१
दुर्मुहूर्त : ०८:४४ ते ०९:३६
दुर्मुहूर्त : १३:०१ ते १३:५३
वर्ज्य : ००:४९, मे ०३ ते ०२:२३, मे ०३

आदि ( आद्य ) शंकराचार्य हे अद्वैत वेदान्तमताचे उद्गाते व भारतीय हिंदू धर्मीयांचे तत्त्वज्ञ होते. त्यांनी अणुवादास खोडून काढत अद्वैताचा पुरस्कार केला. इ.स.च्या आठव्या-नवव्या शतकात कन्याकुमारी ते काश्मीर, आणि द्वारका ते जगन्नाथपुरी असे सर्व भारतभर भ्रमण करून, त्यांनी हिंदू धर्माची पुर्न:स्थापना केली.

शंकराचार्य हे हिंदू धर्मातील सर्वोच्च आचार्य मानले जातात. आद्य शंकराचार्यांनी द्वारका, जगन्नाथपुरी, शृंगेरी आणि बद्रीकेदार येथे चार पीठे निर्मून, त्यांवर प्रत्येकी एक पीठासीन शंकराचार्य नेमून आचार्य परंपरा घालून दिली.

या आदि शंकराचार्यांनी प्रस्थानत्रयींवर (वेद, उपनिषदे व भगवद्गीता) आणि अन्य विषयांवर अनेक भाष्यग्रंथ लिहिले आहेत. त्यांनी तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ, संस्कृत स्तोत्रे, आणि तत्सम काव्ये रचली आहेत. त्यांच्या अनेक पद्यरचना अनुप्रासादी काव्यालंकारांनी ओथंबलेल्या आहेत.

७८८: आदि शंकराचार्य यांचा जन्म. ( तिथी नुसार )

।। लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया
झळाळती कोटी ज्योती या – हां – हां हां. ।।

।। चला धरू रिंगण, चुडी गुढी उंचावून
आकाशीच्या अंगणात, मंजुळ रुणझुण
नाचती चंद्र तारे वाजती पैंजण
छुन छुन झुम झुम, हां हां. ।।

।। झोत रुपेरी भूमिवरी, गगनात
धवळली सारी सृष्टी, नाचत डोलत
कणकण उजळीत, हासत हसवीत
करी शिणगार, हां हां.।।

आनंदून रंगून, विसरुनि देहभान
मोहरली सारी काया हरपली मोहमाया
कुडी चुडी पाजळून प्राणज्योती मेळवून
एक होऊ या, हां हां.

  • गीतकार शांताराम आठवले
    • १९७५: चित्रपट दिग्दर्शक, लेखक, कवी व गीतकार शांताराम आठवले यांचे निधन. (जन्म: २१ जानेवारी, १९१०)

चित्रतपस्वी – भालचंद्र गोपाळ पेंढारकर ऊर्फ भालजी पेंढारकर हे मराठी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, पटकथालेखक, संवादलेखक होते.

भारताला स्वातंत्र्य मिळाले होते. गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त झाल्याच्या भावनेचा व स्वातंत्र्याचा दिव्य संदेश भालजींनी आपल्या चित्रपटांतून दिला. बहिर्जी नाईक, नेताजी पालकर, मोहित्यांची मंजुळा यांतील संवादांमधून भालजींनी दुबळेपणा व लाचारीविरुद्ध शाद्बिक आसूड ओढले. स्वातंत्र्य मिळाले तरी सुराज्य निर्माण करण्यासाठी त्याग, निष्ठा, औदार्य व संयमी असा खंबीरपणा आणि आत्मविश्वास असलेली तरुण पिढी तयार व्हावी यासाठी त्यांनी समृद्ध आशयासह कला व तंत्र या दोन्ही दृष्टिकोनातून उत्कृष्ट अशा चित्रपटांची निर्मिती केली.

भालजींचे चित्रपट किंवा त्यांची निर्मिती संस्था म्हणजे कलाकार व तंत्रज्ञ घडवणारी एक मोठी कार्यशाळाच होती. तसेच त्यांचा संच म्हणजे कुटुंबच होते. शिस्तबद्धता, वेळापत्रकानुसार काम, कामांचे नेटके वाटप, स्तोत्रपठण, प्रार्थना, रेखीव दिनक्रम, वगैरे… चित्रपटाच्या माध्यमातून भालजींनी सुलोचनादीदी, चंद्रकांत मांडरे, सूर्यकांत मांडरे, जयश्री गडकर असे असंख्य कलाकार घडवले.

शिवाजीचा काळ आणि त्या काळातील व्यक्तिरेखा व प्रसंग ही भालजींच्या चित्रपटांची प्रमुख वैशिष्ट्ये होती. त्यांच्या युगप्रवर्तक अशा कारकिर्दीमुळे भालजींना यथार्थतेने चित्रतपस्वी असे म्हटले जाते.

१९४८ मध्ये गांधीजींची हत्या झाल्यानंतरच्या दंगलीमध्ये भालजींचा कोल्हापूर येथील जयप्रभा स्टुडिओ जाळला गेला. नुकताच तयार झालेला मीठभाकर व बाळ गजबरांचा मेरे लाल हे चित्रपट आगीत भक्षस्थानी पडले. दीडशे ते दोनशे कामगार बेकार झाले. भालजींनी पुन्हा लाखो रुपये खर्चून जयप्रभास परत उभे केले. जिद्दीतून मीठभाकर व मेरे लाल ची पुनर्निर्मिती केली. मीठभाकरने चांगला व्यवसाय केला. भालजींनी कोल्हापुरात मराठी चित्रनिर्मितीस पुन्हा एकदा वेग मिळवून दिला.

१८९९: मराठी चित्रपटसृष्टी चे चित्रमहर्षी भालजी पेंढारकर यांचा जन्म. (मृत्यू: २६ नोव्हेंबर १९९४)

  • घटना :
    १९०८: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लंडनमधे प्रथमच शिवजयंती उत्सव साजरा केला.
    १९१८: जनरल मोटर्सने शेवरले मोटर कंपनी विकत घेतली.
    १९२१ : अंदमानच्या काळकोठडीत ११ वर्षे सश्रम कारावास भोगल्यावर दि. २ मे १९२१ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाबाराव सावरकर मुक्त होऊन कोलकात्यात अलीपुर येथे जाण्यासाठी अंदमानातून निघाले .
    १९४५: दुसरे महायुद्ध – सोविएत सैन्याने बर्लिनचा पाडाव केला.
    १९९४: बँक ऑफ कराड चे बँक ऑफ इंडिया मधे विलिनीकरण झाले.
    १९९४: नगर जिल्ह्यातील रामदास ढमाले या अपंग युवकाने पुण्यातील टिळक तलावात सलग ३७ तास ४५ मिनिटे पोहून एक नवा विक्रम प्रस्थापित केला.
    १९९७: राष्ट्रीय अ बुद्धीबळ अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याच्या अभिजित कुंटेने इंटरनॅशनल मास्टर किताबासाठीचे निकष पूर्ण केले.
    १९९९: कोल्हापूर येथील शर्वरी मानसिंग पवार या तीन वर्षे चार महिन्याच्या बालिकेने ५१.१ कि. मी. अंतर न थांबता स्केटिंग करुन ३ तास ५१ मिनिटांत पार केले.
    २०११: अमेरिकन सैन्याच्या Navy Seals 6 या विशेष तुकडीने ओसामा बिन लादेन याची पाकिस्तानातील अॅबोटाबाद येथे हत्या केली.
    २०१२: नॉर्वेजियन चित्रकार एडवर्ड माँच यांचे द स्क्रीम हे चित्र लिलावात १२० मिलियन डॉलर्सला विकले गेले. हा एक नवा जागतिक विक्रम बनला.

• मृत्यू :
• १६८३:शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरुन राज्य व्यवहारकोश तयार करणारे मुत्सद्दी रघुनाथ नारायण हणमंते तथा रघुनाथपंडित यांचे निधन.
• १९०७ : सद्गुरू श्री गजानन महाराजांनी आपले पट्टशिष्य श्री भास्कर महाराजांना ( दि. २l५l१९०७ – चैत्र कृ.५ गुरूवार) रोजी स्वहस्ते संजीवन समाधी दिली . ह्याच भास्कर शिष्याने समाधी पूर्वी महाराजांचे मंदिर बांधण्याचे वचन भक्त गणांकडून घेतले.
• १९६३: महाराष्ट्रातील जादूगारांचे आचार्य डॉ. के. बी. लेले यांचे निधन. (जन्म: २ नोव्हेंबर, १८८२)
• १९७३: लेखक, तत्त्वचिंतक व समीक्षक दिनकर केशव तथा दि. के. बेडेकर यांचे निधन. (जन्म: ८ जून, १९१०)
• १९९८: गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, काँग्रेसचे नेते, ५व्या लोकसभेचे सदस्य पुरुषोत्तम काकोडकर यांचे निधन. (जन्म: १८ मे , १९१३)
• १९९९: जयपूर-अत्रौली घराण्याचे शास्त्रीय गायक पं. सुधाकरबुवा डिग्रजकर यांचे निधन.

  • जन्म :
    १९२०: शास्त्रीय व नाट्यसंगीत गायक डॉ. वसंतराव देशपांडे यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै , १९८३)
    १९२१: ख्यातनाम चित्रपट निर्माते व दिग्दर्शक आणि विशेष ऑस्कर पुरस्कार विजेते भारतरत्न सत्यजित रे यांचा जन्म. (मृत्यू: २३ एप्रिल, १९९२)
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »