विठ्ठलराव शिंदे कारखान्यावर आहेर यांचे व्याख्यान

आवडल्यास ही बातमी शेअर करा

‘… शून्य टक्के मिल बंद तास’चे महत्त्व विशद

सोलापूर : साखर उद्योगतील मान्यवर सल्लागार आणि डीएसटीए पुणेचे संचालक वा. र. ‌आहेर यांचे “एकच ध्यास,एकच ध्यास”, “शून्य टक्के मिल बंद तास ” या संकल्पनेची अंमलबजावणी या विषयावर विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना लि. युनिट १ आणि २ येथे व्याख्याने झाली.

दिनांक २३ आणि २४ मे रोजी कारखाना साईटवर त्यांनी प्रमुख अधिकाऱी आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार श्री.बबनराव शिंदे यांच्या सक्रिय मार्गदर्शनाखाली आणि जनरल मॅनेजर एस. आर. यादव यांच्या सहकार्याने आणि कार्यकारी संचालक एस. एन. डिग्रजे यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या कार्यक्रमात, दोन्ही कारखान्यावर अधिकारी आणि कारखाना कर्मचारी यांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि टेक्निकल स्कील डेव्हलपमेंट कार्यक्रमांतर्गत श्री. आहेर यांनी ही संकल्पना उदाहरणांसह समजावून सांगितली.

श्री. यादव साहेब यांनी प्रास्ताविक करताना श्री. आहेर यांचा परिचय करून दिला,
“एकच ध्यास, शून्य टक्के मिल बंद तास” या संकल्पनेचे महत्त्व विशद करताना, श्री. आहेर यांनी हे विचारपुष्प कर्मयोगी स्व. विठ्ठलराव शिंदे यांना अर्पण केले. शेवटी त्यांनी उपस्थितांच्या शंकांचे समाधान केले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »