देशातील साखर उत्पादन २५७ लाख मे.टनांवर : NFCSF

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने (NFCSF) देशातील साखर उत्पादनाबाबत ताजे विश्लेषण जाहीर केले असून, त्यानुसार देशांतर्गत एकूण साखर उत्पादन सुमारे २५७ लाख मे. टन झाले आहे. ते सुमारे २६१ लाख टनांपर्यंत जाईल, असा अंदाज वर्तवला आहे. गत हंगामात ३१९ लाख मे. टन साखर उत्पादन झाले होते.

महाराष्ट्रामध्ये सुमारे ८०.९० लाख मे. टन साखर उत्पादन झाले आहे, आणि ते हंगाम अखेरीस ८०.९५ लाख मे. टनांपर्यंत जाऊ शकते, असे महासंघाच्या ३० एप्रिल पर्यंतच्या आकडेवारीत म्हटले आहे. गत हंगामात राज्यात ११०.२० ला टन साखर उत्पादन झाले होते, इतर उत्तर प्रदेशात एकूण १०३.६५ लाख टन साखर उत्पादित झाली होती. यावेळी त्यात घसरण होऊन ९२.५० लाख टनांपर्यंत जाईल. आतापर्यंत ९२.४५ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. मात्र महाराष्ट्राच्या तुलनेत ही घट कमी आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशला महाराष्ट्राच्या पुढे जाऊन देशात पहिला क्रमांक पटकावता आला.

३० एप्रिल २०२५ पर्यंत, देशभरातील साखर गाळप हंगामात मागील वर्षाच्या तुलनेत मिश्रित कामगिरी दिसून येत आहे. २०२४-२५ साखर हंगामासाठी प्रत्यक्ष साखर उत्पादन २५६.९५ लाख मेट्रिक टन (LMTs) इतके झाले आहे, जे २०२३-२४ च्या ३१४.६५ LMTs च्या तुलनेत कमी आहे (इथेनॉलसाठी वळवलेली साखर वगळून). इथेनॉलसाठी वळवलेली साखर समाविष्ट केल्यास, उत्पादन २६०.८५ LMTs झाले आहे, जे मागील हंगामाच्या ३१९.०० LMTs च्या तुलनेत कमी आहे. कर्नाटक व तमिळनाडूतील विशेष हंगामातून मिळालेल्या ३.८० LMTs साखरेसह देशभरातील एकूण साखर उत्पादन सुमारे २६१ LMTs इतके होण्याचा अंदाज आहे.

देशभरात २०२४-२५ मध्ये एकूण ५३४ साखर कारखाने गाळप करत होते, त्यातील ५१५ कारखान्यांचा हंगाम संपला आहे.  मागील र्षी ५१२ कारखान्यांचा हंगाम आटोपला होता. एकूण ऊस गाळप २७५८.५७ LMTs झाले असून, २०२३-२४ मध्ये हे ३११५.१२ LMTs होते. देशभरातील सरासरी साखर उतारा २०२४-२५ मध्ये ९.३१% इतका नोंदवला गेला असून, तो मागील वर्षाच्या १०.१०% च्या तुलनेत कमी आहे.

तीन महत्त्वाच्या राज्यांमधील परिस्थिती:

  • उत्तर प्रदेश: प्रत्यक्ष साखर उत्पादन ९२.४५ LMTs झाले आहे. ( इथेनॉलसाठी वळवलेली सोडून), यंदा १२२ कारखाने सुरू होते. त्यातील  ११ कारखानेच सध्या सुरू आहेत.  ऊस गाळप: ९४८.२१ LMTs, सरासरी उतारा: ९.७५%
  • महाराष्ट्र: प्रत्यक्ष उत्पादन ८०.९० LMTs (इथेनॉलसाठी वळवलेली सोडून), यंदा गाळप घेणाऱ्या एकूण २०० १९९ बंद, श्री विघ्नहर कारखान सुरू. एकूण गाळप : ८५१.५८ LMTs, सरासरी उतारा: ९.५०%
  • कर्नाटक: प्रत्यक्ष उत्पादन ४०.४० LMTs, हंगामाच्या अखेरीसचा अंदाज ४२ लाख मे. टन. ऊस गाळप: ५०१.८६ LMTs, सरासरी उतारा: ८.०५%

इतर राज्यांचे योगदान:

  • गुजरात: ८.९० LMTs
  • आंध्र प्रदेश: ०.९० LMTs
  • बिहार: ६.२० LMTs
  • हरियाणा: ५.१० LMTs
  • मध्य प्रदेश: ५.१० LMTs
  • पंजाब: ५.७० LMTs
  • तमिळनाडू: ४.८० LMTs
  • तेलंगणा: १.७० LMTs
  • उत्तराखंड: ३.७० LMTs
  • उर्वरित भारत: १.१० LMTs

इथेनॉलसाठी स्थिती:

साखर उद्योगाने इथेनॉल पुरवठा वर्ष (ESY) २०२४-२५ साठी ५० LMTs साखर इथेनॉलकडे देण्याची तयारी दर्शवली होती. त्यामधून ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी (OMCs) ४० LMTs चे डायव्हर्सन मंजूर केले. मात्र, पूर्वी अपेक्षित ३५ LMTs आता सुमारे ३२ LMTs पर्यंत होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत अंदाजे २९ LMTs साखर इथेनॉलसाठी वळवण्यात आली आहे.

इथेनॉलसाठी ऊस रस व B-heavy मोलॅसेसवर दरवाढ न झाल्यामुळे डायव्हर्सन अपेक्षेपेक्षा कमी राहिले. परिणामी, साखर उत्पादन फायदेशीर ठरत असल्याने सुमारे LMTs अतिरिक्त साखरेचे उत्पादन झाले आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »