ओरिया साहित्यिक गोपीनाथ मोहंती

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज रविवार, एप्रिल २०, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर चैत्र ३०, शके १९४७
सूर्योदय : ०६:१८ सूर्यास्त : १८:५७
चंद्रोदय : ०१:२४, एप्रिल २१ चंद्रास्त : ११:३८
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
उत्तरायण
ऋतु : वसंत
चंद्र माह : चैत्र
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : सप्तमी – १९:०० पर्यंत
नक्षत्र : पूर्वाषाढा – ११:४८ पर्यंत
योग : सिद्ध – ००:१३, एप्रिल २१ पर्यंत
करण : विष्टि – ०६:४६ पर्यंत
द्वितीय करण : बव – १९:०० पर्यंत
सूर्य राशि : मेष
चंद्र राशि : धनु – १८:०४ पर्यंत
राहुकाल : १७:२२ ते १८:५७
गुलिक काल : १५:४७ ते १७:२२
यमगण्ड : १२:३७ ते १४:१२
अभिजित मुहूर्त : १२:१२ ते १३:०३
दुर्मुहूर्त : १७:१६ ते १८:०७
अमृत काल : ०६:४३ ते ०८:२४
अमृत काल : ०६:००, एप्रिल २१ ते ०७:३९, एप्रिल २१
वर्ज्य : २०:०४ ते २१:४४

वारकरी संप्रदायाचे अध्वर्यु, तत्त्वज्ञ – सोनोपंत दांडेकर – ऐहिक आणि पारलौकिक क्षेत्रात अग्रेसर राहणार्या व्यक्तींपैकी एक, व्यवहार आणि परमार्थ दोन्ही एकाच जीवनाच्या दोन बाजू मानणारे वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू प्रा. शंकर वामन दांडेकर मूळचे कोकणातले.
त्यांचे प्राथमिक शिक्षण केळवे माहीमच्या प्राथमिक शाळेत पूर्ण झाले. पुढे ते माध्यमिक शिक्षणासाठी त्यांच्या बंधूंसह पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयात दाखल झाले (१९०५) आणि मॅट्रिकची परीक्षा उत्तम रीत्या उत्तीर्ण झाले (१९१२). त्याच सुमारास ते विष्णुबुवा जोग या साक्षात्कारी पुरुषाच्या संपर्कात आले. विष्णू नरसिंह जोग तथा ‘जोग महाराज’ हे वारकरी संप्रदायाचे एक अध्वर्यू होते व लोकमान्य टिळकांचे निकटचे मित्र होते.

सोनोपंतांना जोग महाराजांमुळे हरिभक्ती व देशभक्तीबरोबरच ज्ञानेश्वरीची गोडी लहान वयात लागली. पुढे त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून बी.ए. पदवी घेतली (१९१७). त्या काळी रॅंग्लर र. पु. परांजपे, गुरुदेव रा. द. रानडे अशा अनेक नामवंत व्यक्ती तेथे प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या. त्यांपैकी तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक गुरुदेव रानडे व जोग महाराज या दोन उत्तुंग व्यक्तींच्या सहवासाचा सोनोपंतांच्या जडणघडणीत मोठा वाटा आहे. त्यांना मुंबई विद्यापीठाची प्रल्हाद सीताराम स्कॉलरशिप मिळाली आणि पुढे ते गुरुदेव रानडे यांच्या सांगण्यावरून पाश्चात्त्य तत्त्वज्ञानातील ग्रीक तत्त्वज्ञ प्लेटो हा विषय घेऊन एम.ए. झाले (१९१९).

त्यांनी शिक्षण प्रसारक मंडळ, पुणे या प्रसिद्ध शिक्षण संस्थेचे आजीव सदस्यत्व घेऊन शिक्षणक्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला व न्यू पूना कॉलेजात (सध्याचे स. प. महाविद्यालय) तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तेथे सोनोपंतांनी तत्त्वज्ञान मंडळाची स्थापना केली (१९२१). त्या मंडळात व्याख्यान देण्यासाठी डॉ. राधाकृष्णन् आले असताना ते सोनोपंतांविषयी म्हणाले, ‘‘I see nothing less in Prof. Dandekar a true follower of my friend Prof. R.D. Ranade – a great philosopher of today.’’ वरील उद्गारावरून तरुणपणीच त्यांची योग्यता किती होती, हे स्पष्ट होते.

ईश्वरवाद या ग्रंथात त्यांनी एकेश्वरवाद, नास्तिकवाद, देवधर्माचे भवितव्य व ईश्वरदर्शन या विषयांची चर्चा केली आहे.
अध्यात्मवादाची मूलतत्त्वे या ग्रंथात त्यांनी अध्यात्मवादाचा उगम तसेच विज्ञान, मानसशास्त्र, नीतिधर्म इत्यादी ज्ञानशाखांशी अध्यात्मवादाचा काय संबंध आहे, याचीही मीमांसा केली आहे.
श्री ज्ञानदेव चरित्र या ग्रंथात त्यांनी ज्ञानदेवांचे चरित्र आणि तत्त्वज्ञान यांच्याशी सामान्य वाचकांचा स्थूल परिचय व्हावा, या उद्देशाने ज्ञानदेवांच्या तत्त्वज्ञानाचा ऊहापोह केला आहे.
गीतेच्या श्लोकांवरील प्रवचने या ग्रंथात त्यांनी परमात्म्याचा अपरोक्षानुभव, त्याचे सर्वव्यापी दर्शन व त्याच्याशी समरसता ही कोणत्या साधनाने प्राप्त होते, हे सांगितले आहे.

वारकरी पंथांचा इतिहास या ग्रंथात वारकरी पंथांचे ओझरते दर्शन व तत्त्वज्ञान यांची चर्चा त्यांनी केली आहे.
धार्मिक ग्रंथांची पारायणे करण्यापेक्षा त्यातले विचार आचरणात आणा; धर्माला अध्यात्माची जोड द्या; धर्म म्हणजे आत्मधर्म, तो साधण्यासाठी भक्तिप्रधान, उदार भागवतधर्माची गरज आहे, असे विचार त्यांनी मांडले. कीर्तनासाठी अभंग घेताना त्यांनी रामदासी संप्रदायाचाही समावेश जाणीवपूर्वक करून घेतला. अनेक फडाफडांमधील द्वेषभाव काढून टाकण्यासाठी एका फडावरचे, दुसऱ्या फडावरचे कीर्तन असा भेद करून कीर्तन ऐकायला आडकाठी केली नाही. कोणत्याही देवतेच्या कोणत्याही मंदिरात कीर्तनाला (कीर्तन करण्यास व ऐकण्यास) पूर्ण मुभा दिली.

श्रीक्षेत्र आळंदी येथे गुरुवर्य जोग महाराजांनी भूषविलेल्या वारकरी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा सोनोपंतांनी बराच काळ समर्थपणे सांभाळली होती.

१८९६: सार्थ ज्ञानेश्वरी चे लेखक प्रा. ह. भ. प. शंकर वामन उर्फ सोनोपंत (मामासाहेब) दांडेकर यांचा माहीम, ठाणे येथे जन्म. (मृत्यू: ९ जुलै १९६८)

साहित्यिक गोपीनाथ मोहंती – वयाच्या बाराव्या वर्षी पोरके झालेल्या गोपीनाथ यांचे शिक्षण आपल्या भावाजवळ पाटना येथून झाले. १९३० मध्ये मॅट्रीकच्या परीक्षेत ते दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. १९३६ मध्ये कटक विद्यापीठातून इंग्रजी विषयात एम. ए. झाले. १९३८ पासून ते ओडिशाच्या प्रशासकीय सेवेत रूजू झाले. विविध पदांवर काम करीत असताना ओडिशाच्या अनेक गावातून त्यांची नियुक्ती झाली. त्यामुळे ओडिशातील ग्रामीण जीवन, आदिवासी जीवनपद्धती, त्यांचे आचार-विचार, त्यांच्या समस्या ते जाणून घेऊ शकले.

२६व्या वर्षी त्यांनी आपल्या साहित्य लेखनाला प्रारंभ केला. त्यांचे १९ कादंबऱ्या, ६ कथासंग्रह, २ नाटके, एक निबंधसंग्रह, दोन चरित्रे व आदिवासींच्या भाषेसंबंधात ८ पुस्तके आदी त्यांची एकूण ४५ पुस्तके प्रकाशित झाली असून चार हिंदी, बंगाली व इंग्रजीतून अनुवादित आहेत. गोपीनाथ मोहंती यांचे प्रकाशित साहित्य : कादंबरी – मन गहिरर चाष (१९४०), दादी बुद्धा (१९४४), परजा (१९४५),अमृतर संतान (१९४७), दाणापाणी (१९५५), अपहंचा (१९६१), माटीमटाल (१९६४), आकाश सुंदरी (१९७२), मनारा निआन (१९७९), डिगा दिहुडी (१९७९) ; कथासंग्रह – नववधू (१९५२),चाइ अलुआ (१९५६), नंमाने नही (१९६८); संशोधन आणि भाषांतरे – गड्बा भाषा परिचय (१९५६), कुभी कोंढ भाषा तत्त्व (१९५६), सावोरा भाषा (१९७८) याशिवाय त्यांनी भारतीय साहित्यातील थोर साहित्यिकांच्या लोकविख्यात कृतींचा अनुवाद केला आहे.

अमृतर संतान या कादंबरी मध्ये अमृततारा संतान या प्राचीन कवीच्या कुवी – कोढ वंशाचे चित्रण आतिशय कुशलतेने करून त्या काळातील अध्ययनावर प्रकाश टाकला आहे. स्वराबू सौधाचे निधन झाल्यानंतर एका नव्या युगाच्या प्रतिकाचा प्रारंभ होतो आणि त्यातून विलक्षण आधुनिकवादातील वंशाच्या आक्रमणाच्या समृद्धीचा उगम आदिवासी जीवनामध्ये कशा प्रकारे होतो हे महाकाव्य या कादंबरीमध्ये गीतात्मक पद्धतीने सांगितले आहे. येथे मोहंती यांच्या लेखनातील कल्पकता दिसून येते.

निर्धन, शोषित, पददलित व आदिवासींच्या जीवनाचं चित्रण करणाऱ्या त्यांच्या या साहित्यकृतीमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. आदिवासीतील परजा, कन्ध, कोल्ह, डंब यांच्याबरोबर राहताना ते जमीनदार कुटुंबातील असूनही त्यांच्यात मिसळून गेले. विशेषत: कोराटपूर आणि तेथील आदिवासींशी त्यांचे अतूट नाते निर्माण झाले.

एक प्रकारे सामाजिक बांधिलकी वृत्ती जोपासणारे लेखक म्हणून त्यांची भारतीय साहित्यिकांमध्ये नोद होते. त्यांच्यातील संयम आणि इंद्रिय गोचरता यामुळे त्यांचे लेखन एक विशिष्ट उंची गाठते. केंद्रीय साहित्य अकादमी (१९५५), सोविएत लँड नेहरू पुरस्कार (१९७०) या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. भारतीय ज्ञानपीठाचा १९७३ चा साहित्य पुरस्कार गोपीनाथ मोहंती यांना त्यांच्या माटीमटाल या कादंबरीसाठी प्रदान करण्यात आला. ही कादंबरी १९६२ ते १९६६ या कालावधीतील सर्व भारतीय भाषांतून निवडली गेली. त्या वर्षी हा पुरस्कार विभागून (कन्नड कवी द. रा. बेन्द्रे यांच्यासह) देण्यात आला. त्यानंतर इ. स. १९८१ मध्ये त्यांना पदमभूषण या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.

१९१४: ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित , पद्मभूषण पुरस्कार सन्मानित ओरिया साहित्यिक गोपीनाथ मोहंती यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑगस्ट १९९१)

  • घटना :
    १७४९: मराठा सत्तेचा ध्वज अटकेपार नेणार्या पेशव्यांचे श्रद्धास्थान असलेल्या देवदेवेश्वर मंदिराची नानासाहेब पेशवे यांनी पर्वतीवर स्थापना केली.
    १७७०: प्रसिद्ध दर्यावर्दी सागर संशोधक कॅप्टन जेम्स कूक यांनी ऑस्ट्रेलिया खंडाचा शोध लावला.
    १९४५: दुसरे महायुद्ध – अमेरिकन फौजांनी लाइपझिग शहराचा ताबा घेतला.
    १९४६: राष्ट्रसंघ ही संस्था बरखास्त करून पुढे याचेच संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेमध्ये (United Nations) रूपांतर झाले.
    २००८: डॅनिका पॅट्रिक ह्या इंडी कार रेस जीकणाऱ्या पहिल्या महिला चालक झाल्या.

• मृत्यू :

• १९३८: न्यायाधीश व कायदेपंडित चिंतामणराव वैद्य यांचे निधन. (जन्म: १८ ऑक्टोबर, १८६१)
• १९६०: बासरीवादक संगीतकार पन्नालाल घोष यांचे निधन. (जन्म: ३१ जुलै , १९११)
• १९७०: गीतकार आणि शायर शकील बदायूँनी यांचे निधन. (जन्म: ३ ऑगस्ट १९१६ – बदायूँ, उत्तर प्रदेश)
●१९९९: दोन लाख सुनांची एकच आई ! रुचिरा पुस्तकाच्या लेखिका कमलाबाई कृष्णाजी ओगले याचे निधन. (जन्म: १६ सप्टेंबर १९१३)

२०२२ : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांचा सुपरहिट चित्रपट ‘अंधा कानून’ आणि हिंदीतील ‘नाचे मयूरी’ हा बायोपिक तयार करणारे प्रसिद्ध दिग्दर्शक टी रामा राव यांचं निधन.

जुदाई, एक ही भूल, अंधा कानून, वतन के रखवाले, दोस्ती दुश्मन, नाचे मयूरी, जॉन जॉनी जनार्दन, मुकाबला, हथकडी, जंग या चित्रपटांचे टी रामा राव यांनी दिग्दर्शन केलं.1966 ते 2000 या दरम्यान प्रदर्शित झालेल्या अनेक हिट चित्रपटांचे टी रामा राव यांनी दिग्दर्शन केलं.टी रामा राव यांच्या ‘जीवन तरंगल’, ‘अनुराग देवता’ आणि ‘पचनी कपूरम’ यांसारख्या तेलुगू चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.
१९५० च्या अखेरीस त्यांनी आपले चुलत भाऊ तातिनेनी प्रकाश राव आणि कोटय्या प्रत्यागत्मा यांच्यासोबत करिअरची सुरुवात केली. १९६६ ते २००० या काळात टी रामाराव यांनी हिंदी आणि तेलुगू चित्रपटांचं दिग्दर्शन केलं.

  • जन्म :
    १९२८: हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक व अभिनेते ओ. पी. रल्हन यांचा जन्म ( मृत्यू : २० एप्रिल , १९९९)
    १९३९: ध्रुपद गायक सईदुद्दीन डागर यांचा जन्म.
    १९५०: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा जन्म.
    १९८०: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक अरीन पॉल यांचा जन्म.
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »