Category आणखी महत्त्वाचे

ऊसतोड मजूर गणेश डोंगरे यांचा अपघाती मृत्यू

मदतीसाठी नातेवाईकांचे ‘बिराजदार’ कारखान्यात आंदोलन उमरगा : तालुक्यातील कोंडजीगड येथील भाऊसाहेब बिराजदार साखर कारखान्यात (क्युनिर्जी इंडस्ट्रीज) एका दुर्दैवी अपघातात ‘रीलस्टार’ ऊसतोड मजूर गणेश डोंगरे यांचा ऊसाखाली दबून मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ आणि पीडित कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी या मागणीसाठी…

तेरणा साखर कारखान्याला प्रदुषण नियंत्रण मंडळाची नोटीस

terna sugar factory

धाराशिवच्या राजकारणात पुन्हा नवा कलगीतुरा! तेर(धाराशिव) : ढोकी येथील भैरवनाथ शुगर वर्क्स संचलित तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडून नदी पात्रात मळीमिश्रित पाणी सोडल्याने मोठे जलप्रदूषण झाले आहे. या गंभीर प्रकारामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, गेल्या १५ दिवसांपासून तेर गावचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे.…

करवीरमध्ये उसाला आग : २०० शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर

burned Sugarcane field

करवीर : गुरुवारी दुपारी १:३० च्या सुमारास वडकशिवाले येथील शिवारात आग लागल्याची दुर्घटना घडली. बाचणी रस्त्यावरील स्मशानभूमीपासून सुरू झालेली आग वाऱ्यामुळे वेगाने पसरली. स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांनी उसाचा पट्टा तोडून आग थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत ११० एकर ऊस जळाला…

साखर कारखान्यात मृत्यूचे तांडव: उकळत्या मळीने ७ कामगारांचा बळी

मुरकुंबी : बेळगाव जिल्ह्यातील मुरकुंबी येथील इनामदार साखर कारखान्यात बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास काळाने घाला घातला. ‘एव्हीसीपी क्रमांक १’ च्या व्हॉल्व्हची दुरुस्ती करत असताना अचानक बॉयलरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे बाहेर पडलेली अतिउष्ण मळी कामगारांच्या अंगावर पसरली. या भीषण आगीत…

‘महा -सहकार’चे प्रकाशन

Mangesh Titkare

पुणे – महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश तिटकरे यांनी ‘यशदा’च्या कार्यालयात जाऊन अतिरिक्त महासंचालक आणि महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे स्वतंत्र संचालक शेखर गायकवाड यांची सदिच्छा भेट घेतली आणि महामंडळाच्या ‘महा -सहकार’ या त्रैमसिकाचे प्रकाशनही केल.. यावेळी त्यांच्या सोबत…

आरआरसी सर्टिफिकेट देण्यासाठी दबाव आणणार- राजू शेट्टी 

RAJU SHETTI

सातारा : ऊसतोडीनंतर पंधरा दिवसांत पेमेंट न करणाऱ्या साखर कारखान्यांना आयुक्तांना भेटून आरआरसी सर्टिफिकेट देण्यासाठी दबाव टाकण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली. दरम्यान, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी खमकी माणसं जिल्हा परिषदेच्या सभागृहात जाण्यासाठी स्वाभिमानी संघटना जिल्हा परिषद निवडणुकीत उतरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सातारा येथे शासकीय विश्रामगृहात, आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष राजू शेळके व पदाधिकारी उपस्थित होते.  यावेळी राजू शेट्टी म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका लढवणार आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये पैशाचा प्रचंड पाऊस पडला. हा पैसा संबंधित नेत्यांनी रोजगार हमीवर जाऊन मिळवला नाही. भ्रष्ट मार्गाने मिळवलेला काळा पैसाच निवडणुकीत बाहेर येतो. आम्हाला या साठमारीत पडायचे नाही. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचे पावित्र  डागाळायचे नाही. मात्र, आज स्थानिक स्वराज्य संस्था कोणासाठी आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. राजकारणात काळ्या पैशांचा अमर्याद वापर वाढला आहे. काळ्या पैशांपाठोपाठ गुंडागर्दी येते. एका हातात दंडुका आणि एका हातात नोटांची थप्प्या घेऊन निवडणुका मॅनेज होत आहेत. त्यामुळे जनतेने निवडणूक हातात घेण्याची गरज आहे. हा क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जिल्हा आहे. त्यांनी चोरांच्या पायात पत्र्या ठोकल्या. आज पत्र्या ठोकण्याची गरज नाही, सातारकरांनी मतपेटीतून त्यांचा बंदोबस्त करावा, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले.

ऊसतोड मजुरांच्या झोपड्या जळून खाक; अडीच लाखांचे नुकसान

सांगली(वाळवा) : वाळवा तालुक्यातील शिगाव येथे असलेल्या ऊसतोड मजुरांच्या वस्तीला शुक्रवारी भीषण आग लागली. या आगीत सुमारे २० झोपड्या पूर्णपणे जळून खाक झाल्या असून, मजुरांचे संसार उघड्यावर आले आहेत. सुदैवाने, सर्व मजूर ऊसतोडीसाठी शेतात गेलेले असल्याने मोठी जीवितहानी टळली. आगीमध्ये मजुरांचे…

राजकारण बाजूला ठेवून जपली माणुसकी! ऊसतोड कामगारांना सभापतींचा आधार

Helping Hand

पुणे/खेड: राजकारणात केवळ मतांचे गणित न पाहता माणुसकीला प्राधान्य देत खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे पाटील यांनी एका ऊसतोड मजूर कुटुंबाला मदतीचा हात दिला आहे. खेड तालुक्यातील मरकळ येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन बैल गमावलेल्या परजिल्ह्यातील मजुरांना शिंदे…

अरे माणसा माणसा

aher poem

अरे माणसा माणसा |जै डोंबारी तारेवर||तै समतोल नजर|मग मिळेल भाकर||१|| अरे माणसा माणसा|खोटं कधी बोलू नये||सुगरणीच्या घरट्याला|खोपा, कधी म्हणू नये||२|| अरे माणसा माणसा|निसर्गाची कला न्यारी||जरि शेंग ती काटेरी| सागरगोटे अंतरी||३|| अरे माणसा माणसा|माझ्या जीवाचा मैतरं||आहे मोठा जादूगार|त्यांवर माझी मदार||४|| अरे माणसा…

साखर कारखाना हे शेती संस्कृतीचे आधुनिक रूप : इंद्रजित भालेराव

मंगळवेढा: “माणसाने शिकारीऐवजी पेरून खाण्याची सुरुवात केली, तेव्हापासून शेती संस्कृतीचा खऱ्या अर्थाने उदय झाला. आजच्या काळात साखर कारखाना हे या प्राचीन शेती संस्कृतीचेच आधुनिक रूप आहे,” असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक व व्याख्याते इंद्रजित भालेराव यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषद (मसाप) मंगळवेढा शाखेच्या वतीने…

Select Language »