समर्थ व सागर कारखान्याच्या वतीने ऊसतोड व वाहतूक कराराचा शुभारंभ

आवडल्यास ही बातमी शेअर करा

घनसावंगीः अंबड तालुक्यातील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना लि., युनिट नं. १ अंकुशनगर व युनिट नं. २ (सागर) तीर्थपुरी येथील गळीत हंगाम २०२५ २६ करिता ऊस तोड व वाहतूक कराराचा शुभारंभ नुकताच करण्यात आला.

याप्रसंगी कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक, कार्यकारी संचालक, केन मॅनेजर, चीफ अकौन्टंट, उप शेती अधिकारी, शेतकरी, ऊसतोड व वाहतूक कंत्राटदार उपस्थित होते. यावेळी उपस्थित ऊसतोड व वाहतूक कंत्राटदारांनी विचार व्यक्त केले.

याप्रसंगी व्यवस्थापकीय संचालक यांनी सांगितले की, गळीत हंगाम २०२५-२६ करिता कारखाना कार्यक्षेत्रात शेती विभागाचे अहवालानुसार २४ ते २५ लाख मे.टन ऊस उपलब्धतेचा अंदाज आहे. या हंगामात कारखान्याचे युनिट नं.१ अंकुशनगरकडे १५ लाख व युनिट नं. २ (सागर) तीर्थपुरीकडे ७ लाख असे २२ लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. दैनंदिन गाळप क्षमतेनुसार पुरेशा उसाचा पुरवठा व्हावा यासाठी ट्रक, डबल ड्रॉली ट्रॅक्टर, छोटे ट्रॅक्टर, टायरगाडी व हार्वेस्टर यंत्रणेशी ऊसतोड व वाहतुकीचे करार करण्याचा शुभारंभ करण्यात आला आहे.

कारखाना व ऊस तोड वाहतूक यंत्रणांनी परस्पर सहकायनि पुढील हंगाम यशस्विरीत्या संपन्न व्हावा यासाठी सांघिक प्रयत्न करावेत. कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस वेळेत तोडणी व वाहतूक होणे आवश्यक असल्याचे मत व्यवस्थापकीय संचालक बी. टी. पावसे यांनी व्यक्त केले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »