प्रेमगीत

प्रेम म्हणजे काय असतं
दुसरं तिसरं काही नसतं
तुमचंआमचं सारखचंअसतं
म्हणून म्हणतो प्रेमगीत गावे.।। धृ।।
प्रेम लहानपणी बागेत,गच्चीवर,
कॅन्टीनमध्ये,सहलीत अनुभवलं
सुरवंटाच फूलपाखरू झालं
कळी उमलली,फूल जहालं
म्हणून म्हणतो प्रेमगीत गावे.।।1।।
प्रेमासाठी शाळा काॅलेजात,नाटक सिनेमात,
रूसणं फुगणं ,मौजमजा,मस्ती केली
प्रेमाचे इशारे झाले,विरहाचे कढ सोसले
म्हणून म्हणतो प्रेमगीत गावे.।।2।।
पुढे डिग्री मिळाली,आणाभाका झाल्या
नोकरी मिळाली,अन दोनाचे चार झाले
अन मग प्रेमाचे पाट वाहू लागले
म्हणून म्हणतो प्रेमगीत गावे.।।3।।
फूल गळे बघ फळ गोड जहाले
कळलंच नाही,चाराचे आठ कधी झाले
आता एकच बाणा,आणा आणा
विसरलो मी आता चहाटळपणा,
तरीही म्हणतो प्रेमगीत गावे.।।4।।
नाही आता हिरवटंपणा
नाही आता हावरटपणा
नाही आता गवाक्ष,नाही आता कटाक्ष
तरीही म्हणतो प्रेमगीत गावे.।।5।।
अरे नाही मी आंबटशौकीन
पण प्रेमासाठी वज्राहून कठीण
लिहून झाली प्रेमाची ही गाथा
आवडीने वाचा ही प्रेमकथा
तरीही म्हणतो प्रेमगीत गावे.।।6।।
।।आहेर वाळू रघुनाथ,नासिक।।
(कवी साखर उद्योग क्षेत्रातील नामवंत सल्लागार)