कवी ग्रेस

आज शनिवार, मे १०, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर वैशाख दिनांक २०, शके १९४७
सूर्योदय : ०६:०६सूर्यास्त : १९:०४
चंद्रोदय : १७:१४ चंद्रास्त : ०४:५५, मे ११
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
उत्तरायण
ऋतु : वसंत
चंद्र माह : वैशाख
पक्ष :शुक्ल पक्ष
तिथि : त्रयोदशी – १७:२९ पर्यंत
नक्षत्र : चित्रा – ०३:१५, मे ११ पर्यंत
योग : सिद्धि – ०४:०१, मे ११ पर्यंत
करण : तैतिल – १७:२९ पर्यंत
द्वितीय करण : गर – पूर्ण रात्रि पर्यंत
सूर्य राशि :मेष
चंद्र राशि : कन्या – १३:४२ पर्यंत
राहुकाल : ०९:२० ते १०:५८
गुलिक काल : ०६:०६ ते ०७:४३
यमगण्ड : १४:१२ ते १५:५०
अभिजित मुहूर्त : १२:०९ ते १३:०१
दुर्मुहूर्त : ०६:०६ ते ०६:५८
दुर्मुहूर्त : ०६:५८ ते ०७:५०
अमृत काल : २०:०१ ते २१:५०
वर्ज्य : ०९:११ ते १०:५९
कधी हिडिंबा पारोशी, शूर्पणखाही उदास;
देहभावाला जाणवे, देहभावाची किळस.
कधी राधा, काळी कुब्जा देहाखालून चालते;
शूर्पणखेच्या पोटी नवे लक्ष्मणाचे नाते.
मराठी साहित्यसृष्टीला लाभलेल्या समृद्ध कवितांच्या परंपरेमध्ये एक महत्त्वाचे आणि विलोभनीय नाव म्हणजे कविवर्य ग्रेस – माणिक गोडघाटे हे साहित्यक्षेत्रामध्ये एक नवे पर्व म्हणून उदयाला आले.
१९३७: आधुनिक मराठी कवी ग्रेस तथा माणिक गोडघाटे यांचा जन्म. (मृत्यू: २६ मार्च, २०१२)
१९०९: पद्मश्री पुरस्कार सन्मानित आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ग्रंथालयशास्त्रज्ञ, इंडियन नॅशनल सायंटिफिक डॉक्युमेंटेशन सेंटर चे पहिले संचालक बेल्लारी शामण्णा केशवन यांचा जन्म. (मृत्यू: १६ फेब्रुवारी, २०००)
- घटना :
१८१८: इंग्रज व मराठे यांच्यात तह होऊन रायगड किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
१८२४: लंडनमधील नॅशनल गॅलरी सर्वसाधारण लोकांसाठी खुली करण्यात आली.
१९०७: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामाचा सुवर्णमहोत्सव लंडनमधे साजरा केला.
१९३७: स्वातंत्र्यवीर सावरकर यांची रत्नागिरीच्या स्थानबद्धतेतून बिनशर्त मुक्तता.
१९४०: दुसरे महायुद्ध – हिटलरने हॉलंड, बेल्जिअम आणि फ्रान्सवर आक्रमण केले.
१९४०: दुसरे महायुद्ध – नेव्हिल चेम्बरलेनने राजीनामा दिल्यावर विन्स्टन चर्चिल युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानपदी.
१९६२: मार्वल कॉमिक्सने द इक्रीडिबल हल्क या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित केला.
१९७९: मायक्रोनेशिया प्रजासत्ताक बनले.
१९८१: फ्रान्सवा मितराँ फ्रान्सचे अध्यक्ष बनले.
१९९३: संतोष यादव हि दोनदा एव्हरेस्ट पर्वत सर करणारी पहिली भारतीय महिला ठरली.
१९९४: दक्षिण आफ्रिकेचे पहिले श्वेतवर्णीय राष्ट्राध्यक्ष नोबेल पारितोषिक विजेते नेल्सन मंडेला यांनी देशाची सूत्र हाती घेतली.
१९९७: ७.३ रिश्लेटरच्या भूकंपाच्या तीव्र धक्क्याने इराण मधील सुमारे १५६७ लोक ठार, २३०० लोक जखमी आणि ५०००० लोक बेघर झाले.
• मृत्यू :
१८९९: रँड वधाच्या प्रकरणी द्रविड बंधूंची हत्या केल्याबद्दल महादेव विनायक रानडे यांना फाशी.
१९८१: विनोदी लेखक प्राध्यापक विमादि तथा विनायक माधव दीक्षित पटवर्धन यांचे निधन.
१९९८: पत्रकार, समाजसेवक, लेखक, चरित्रकार, साधना मासिकाचे संपादक यदुनाथ दत्तात्रय थत्ते यांचे निधन. (जन्म: ५ ऑक्टोबर,१९२२)
२०००: कवी नागोराव घन:श्याम तथा ना. घ. देशपांडे यांचे निधन. (जन्म: २१ ऑगस्ट, १९०९)
२००१: महाराष्ट्राचे १३ वे मुख्यमंत्री, हिमाचल प्रदेशचे राज्यपाल सुधाकरराव नाईक यांचे निधन. (जन्म: २१ ऑगस्ट, १९३४)
२००२: पद्मश्री पुरस्कार सन्मानित गीतकार सय्यद अख्तर हुसेन रिझवी ऊर्फ कैफी आझमी यांचे निधन. (जन्म: १४ जानेवारी, १९१९)
२०१५: भारतीय इतिहासकार, लेखक निनाद बेडेकर यांचे निधन. (जन्म: १७ ऑगस्ट, १९४९)
- जन्म :
१८५५: भारतीय गुरु आणि शिक्षक युकतेश्वर गिरी यांचा जन्म. (मृत्यू: मार्च ,१९३६)
१९०५: गायक व संगीतकार पंकज मलिक यांचा जन्म. (मृत्यू: १९ फेब्रुवारी,१९७८)
१९१४: चित्रपट निर्माते ताराचंद बडजात्या यांचा जन्म. (मृत्यू: २१ सप्टेंबर, १९९२)
१९१८: रिसर्च अँड अॅनॅलेसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रामेश्वरनाथ काओ यांचा जन्म. (मृत्यू: २० जानेवारी, २००२)
१९२७: भारतीय लेखिका नयनतारा सहगल यांचा जन्म.
१९३१: ज्येष्ठ गीतकार जगदीश खेबूडकर यांचा जन्म. ( मृत्यू : ३ मे, २०११ )
१९८६: बुद्धीबळपटू पेंड्याला हरिकृष्ण यांचा जन्म.