चंदगडमध्ये ऊसउत्पादकांची ३० कोटींची लूट; ‘स्वाभिमानी’ आक्रमक

चंदगड: ऊसतोडणी आणि वाहतुकीच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून बेकायदेशीरपणे वसूल केली जाणारी ‘खुशाली’ थांबवावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चंदगड तालुक्यातील कारखान्यांना इशारा दिला आहे. या लुटीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी सुमारे ३० कोटी रुपयांचा फटका बसत असल्याचा खळबळजनक आरोप संघटनेने केला आहे.…












