Author 1

Author 1

‘एआय’ उसाला वरदान ठरणार : बिपीन कोल्हे

Bipin Kolhe

अहिल्यानगर : ‘एआय’ तंत्रज्ञानामुळे सर्व क्षेत्रांत मोठे फेरबदल होण्याची भीती व्यक्त केली जाते. त्यावर जगभर मंथन सुरू आहे. मात्र, ‘एआय’ तंत्रज्ञान ऊस पिकाला वरदान ठरणार आहे. उत्पादन खर्च आणि पाण्याचा वापर कमी आणि उत्पादनात भरीव वाढ अशी किमया या तंत्रज्ञानाने…

‘उसासह सहा पिकांत ‘एआय’चा वापर करणार’

Ajit Pawar

पुणे : राज्यात यापुढे उसासह कापूस, सोयाबीन, भात, कांदा आणि मका शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्र वापरण्याचे निश्चित करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. ‘एआय’ तंत्र विस्ताराची पुढील दिशा ठरविण्यासाठी सोमवारी येथील साखर संकुलमधील ‘व्हीएसआय’च्या सभागृहात बैठक आयोजित केली…

गाळपात पुणे जिल्ह्यातील पाच कारखाने टॉपवर

पुणे : प्रतिकूलतेतही राज्यात दहा लाख टनांपेक्षा अधिकचे गाळप करण्यात पुणे जिल्ह्यातील पाच, कोल्हापूर चार, तर अहिल्यानगर, सोलापूर, सातारा जिल्ह्यातील प्रत्येकी एका कारखान्याचा समावेश आहे. खासगी कारखान्यांनी गाळप जास्त केले. मात्र, सहकारी कारखान्यांनी साखर उतारा जास्त मिळवत साखरनिर्मितीत आघाडी घेतली.…

‘सोमेश्वर’च्या सभासदांसाठीचा ‘एआय’ मेळावा उत्साहात

Someshwar Sugar

सोमेश्वरनगर : शेतकऱ्यांनी ‘एआय’च्या माध्यमातून उसाचे जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करावा. या हेतूने  शेतकऱ्यांमध्ये ‘एआय’संदर्भात जनजागृती व्हावी, यासाठी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने बारामती येथील कोऱ्हाळे बुद्रक येथे ‘एआय’ मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. हा मेळावा डॉ.…

‘सौरऊर्जेमुळे को-जन, इथेनॉल प्रकल्प अडचणीत’

कोल्हापूर : आधुनिकीकरणामुळे सौरऊर्जेचा वापर वाढल्यामुळे सौरऊर्जा आणि विजेवर चालणाऱ्या वाहनांचे उत्पादन पाहता, कष्टाने उभे केलेले सहवीज व इथेनॉल प्रकल्प आगामी दहा वर्षांत भंगार होतील की काय, अशी भीती वाटत असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री व कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ…

धाराशिव कारखान्याच्या अधिकाऱ्यास कोटीचा गंडा

धाराशिव : भामट्याने साखर कारखान्याचा चेअरमन असल्याचे भासवून एका अधिकाऱ्यास तब्बल एक कोटीचा गंडा घातल्याचा प्रकार धाराशिवमध्ये १५ एप्रिल ते १७ एप्रिलच्यादरम्यान घडला आहे. यासंदर्भात धाराशिव साखर कारखान्याचे अधिकारी बाबासाहेब वाडेकर यांनी सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात भामट्याविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल…

साखरेसह ट्रकची चोरी; चालक पोलिसांच्या ताब्यात

श्रीरामपूर : भोकरदनमध्ये ट्रान्सपोर्टचालकानेच १२ लाख ४४ हजार ५६५ रुपये किमतीची साखर परस्पर विक्री केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता श्रीरामपूरमध्येही चालकाकडून साखरेसह चक्क ट्रकचीही चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. उल्हासनगर येथे २४ टन साखर पोहोचविण्याची ऑर्डर असताना चालकाने ट्रकची…

कर्नाटक, तमिळनाडूत विशेष हंगामाची शक्यता

पुणे : दक्षिण कर्नाटकात व तमिळनाडूत उसाच्या वाढत्या लागवडीमुळे पुरेशा प्रमाणात ऊस उपलब्ध आहे, त्यामुळे या दोन्ही राज्यांतील काही कारखाने आपला विशेष हंगाम जुलै ते सप्टेंबर या कालावधीत सुरू करण्याची शक्यता इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (इस्मा) व्यक्त केली…

१२ लाखांची साखर परस्पर विकली; गुन्हा दाखल

भोकरदन : तब्बल १२ लाख ४४ हजार ५६५ रुपये किमतीची साखर ठरवून दिलेल्या ठिकाणी पोहच न करता परस्पर विक्री केल्याप्रकरणी एका ट्रान्सपोर्टचालकावर भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात हातकणंगले येथील एका व्यापाऱ्याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.…

राज्यातील गाळप हंगाम समाप्त; साखर उत्पादनात घट

Sugar Prices

पुणे : राज्यातील अंतिम टप्प्यात असलेला गाळप हंगाम अखेर संपला आहे. यंदा राज्यात ८० लाख टन साखरेचे उत्पादन झाले असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत ते तब्बल ३० लाख टनांनी घटल्याचे स्पष्ट होते. अवकाळी पावसाचा अभाव, कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव या कारणांमुळे…

Select Language »