Author 1

Author 1

‘भोगावती’त क्रेनवरून पडून परप्रांतीयाचा मृत्यू

भोगावती : शाहूनगर परिते (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याचे पत्रे बदलण्याचे काम करताना क्रेनवरून तोल जाऊन पडल्याने एका परप्रांतीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. छोटनकुमार ज्ञानदेव सहनी (वय २५) असे त्या तरुणाचे…

दौंडमधून 8 ऊसतोड मजुरांची नजरकैदेतून सुटका

जळगाव : आठ सदस्यीय मजूर कुटुंबीयांना ऊसतोडणीच्या कामासाठी नेऊन पुण्यातील दौंडमध्ये  नजरकैदेत ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यांची जनसाहस संस्थेच्या माध्यमातून पुणे आणि जळगाव प्रशासनाने सुटका करून त्यांना सुखरुप घरी पाठवले आहे. महिंदळे (ता. भडगाव) येथील रेखाबाई प्रकाश भिल…

चांगल्या कारभारामुळे जनतेचा विश्वास : थोरात

संगमनेर : चांगल्या कारभारामुळे थोरात कारखान्यावर सभासद शेतकरी व तालुक्यातील जनतेचा मोठा विश्वास असल्याचे गौरवोद्गार माजी महसूलमंत्री तथा काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांनी काढले आहेत. गुंजाळवाडी येथील कृष्णा लॉन्स व समनापूर येथे झालेल्या कारखाना सभासद, शेतकरी व…

‘व्हीएसआय’ म्हणजे पांढरा हत्ती : राजू शेट्टी

RAJU SHETTI

पाडेगाव केंद्रालाही AI अनुदान देण्याची मागणी पुणे : कृषी विद्यापीठाच्या पाडेगाव ऊस संशोधन केंद्राद्वारे एआय तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी शासनाने प्रयत्न करायला हवा. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) पांढरा हत्ती बनला आहे. ऊस संशोधनात पाडेगावचा सिंहाचा वाटा असून, त्यांनी अनेक उसाच्या जाती…

शेतकऱ्यांनी पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे : पवार

Sharad Pawar

पुणे : सध्या पाण्याची चिंताजनक परिस्थिती असली, तरी शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक वापर आणि नियोजन करण्याची गरज असल्याचे  मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले. ते मंगळवारी (दि. २२)  बारामतीत पत्रकारांशी बोलत होते. ‘एआय’संदर्भात ते म्हणाले की, शेतीमध्ये या तंत्रज्ञानाच्या वापरासाठी…

‘आजरा’च्या अध्यक्षपदी मुकुंदराव देसाई

आजरा  : येथील वसंतराव देसाई आजरा साखर अध्यक्षपदी उदयसिंह ऊर्फ मुकुंदराव बळीराम देसाई यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. दरम्यान, देसाई यांनी आपल्या समर्थकांसह ग्रामदैवत असलेल्या रवळनाथ व चाळोबा देव यांचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. अध्यक्षपदासाठी…

‘जरंडेश्वर’ची फसवणूक; मुकादमास पोलिस कोठडी

सातारा : जरंडेश्वर शुगर मिल्स साखर कारखान्याची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात पोलिसांनी एका मुकादमास अटक करून न्यायालयात दाखल केले असता त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश  देण्यात आला आहे. हणमंत नामदेव आजबे, (रा. शिराळ, ता. आष्टी, जि. बीड) असे…

साखर व्यापाऱ्याची कार फोडल्याप्रकरणी गुन्हा

सांगली : खंडणी देण्यास नकार दिल्याच्या रागातून आणि एका जुन्या व्यवहारातील खटल्याच्या वादातून एका साखर व्यापाऱ्याच्या कारची आज्ञाताने तोडफोड केली आहे. ही घटना येथील संजयनगरमध्ये नुकतीच घडली. याप्रकरणी विक्रम दिनकर पाटील (वय ४०) या साखर व्यापाऱ्याने पोलिसांत तक्रार दाखल केली.…

‘एआय’ उसाला वरदान ठरणार : बिपीन कोल्हे

Bipin Kolhe

अहिल्यानगर : ‘एआय’ तंत्रज्ञानामुळे सर्व क्षेत्रांत मोठे फेरबदल होण्याची भीती व्यक्त केली जाते. त्यावर जगभर मंथन सुरू आहे. मात्र, ‘एआय’ तंत्रज्ञान ऊस पिकाला वरदान ठरणार आहे. उत्पादन खर्च आणि पाण्याचा वापर कमी आणि उत्पादनात भरीव वाढ अशी किमया या तंत्रज्ञानाने…

‘उसासह सहा पिकांत ‘एआय’चा वापर करणार’

Ajit Pawar

पुणे : राज्यात यापुढे उसासह कापूस, सोयाबीन, भात, कांदा आणि मका शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्र वापरण्याचे निश्चित करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. ‘एआय’ तंत्र विस्ताराची पुढील दिशा ठरविण्यासाठी सोमवारी येथील साखर संकुलमधील ‘व्हीएसआय’च्या सभागृहात बैठक आयोजित केली…

Select Language »