Tag sugar industry news and updates

ऊसतोडणी बांधवांच्या मुलांसाठी मोफत लसीकरण, आरोग्य तपासणी शिबीर

Health Camp Shrinath Mhaskoba Sugar

श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचा उपक्रम पुणे : पाटेठाण येथील श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याच्या वतीने ऊस तोडणी वाहतूक करणार्‍या मजुरांच्या लहान मुलांचे लसीकरण व मजुरांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. मंगळवार रोजी श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्यावर ऊस तोडणी बांधवांकरिता कारखान्याने प्राथमिक…

१३९ साखर कारखान्यांकडे २,७६८ कोटींची एफआरपी थकीत

FRP of sugarcane

पुणे: साखर आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य यांनी सन २०२५-२६ च्या गाळप हंगामाचा ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचा ऊस दर थकबाकीचा (FRP Arrears) पाक्षिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, राज्यातील १९६ साखर कारखान्यांनी गळीत हंगामात सहभाग घेतला असून, त्यापैकी १३९ कारखान्यांकडे शेतकऱ्यांची…

आ. रोहित पवारांचा बारामती ॲग्रो गाळप आणि FRP थकबाकीतही आघाडीवर

Baramati Agro

राज्यातील गाळपाचा टप्पा ६३२ लाख टनांवर पुणे: महाराष्ट्रातील साखर गाळप हंगाम २०२५-२६ आता वेगाने पुढे सरकत असून, ८ जानेवारी अखेर राज्यातील १९७ साखर कारखान्यांनी मिळून ६३२.९२ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे . मागील हंगामात याच कालावधीत ४३४.१४…

आरआरसी सर्टिफिकेट देण्यासाठी दबाव आणणार- राजू शेट्टी 

RAJU SHETTI

सातारा : ऊसतोडीनंतर पंधरा दिवसांत पेमेंट न करणाऱ्या साखर कारखान्यांना आयुक्तांना भेटून आरआरसी सर्टिफिकेट देण्यासाठी दबाव टाकण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली. दरम्यान, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी खमकी माणसं जिल्हा परिषदेच्या सभागृहात जाण्यासाठी स्वाभिमानी संघटना जिल्हा परिषद निवडणुकीत उतरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सातारा येथे शासकीय विश्रामगृहात, आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष राजू शेळके व पदाधिकारी उपस्थित होते.  यावेळी राजू शेट्टी म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका लढवणार आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये पैशाचा प्रचंड पाऊस पडला. हा पैसा संबंधित नेत्यांनी रोजगार हमीवर जाऊन मिळवला नाही. भ्रष्ट मार्गाने मिळवलेला काळा पैसाच निवडणुकीत बाहेर येतो. आम्हाला या साठमारीत पडायचे नाही. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचे पावित्र  डागाळायचे नाही. मात्र, आज स्थानिक स्वराज्य संस्था कोणासाठी आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. राजकारणात काळ्या पैशांचा अमर्याद वापर वाढला आहे. काळ्या पैशांपाठोपाठ गुंडागर्दी येते. एका हातात दंडुका आणि एका हातात नोटांची थप्प्या घेऊन निवडणुका मॅनेज होत आहेत. त्यामुळे जनतेने निवडणूक हातात घेण्याची गरज आहे. हा क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जिल्हा आहे. त्यांनी चोरांच्या पायात पत्र्या ठोकल्या. आज पत्र्या ठोकण्याची गरज नाही, सातारकरांनी मतपेटीतून त्यांचा बंदोबस्त करावा, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले.

कर्जाचा दुरूपयोग केल्याचा २१ साखर कारखान्यांवर ठपका

NCDC

मुंबई: राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने (एनसीडीसी) आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या कारखान्यांना कर्ज दिले होते. मात्र ३३ पैकी २१ सहकारी साखर कारखान्यांनी या कर्जाचा विनियोग वेगळ्याच कारणासाठी करून गैरवापर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तर अन्य तीन कारखान्यांनी काही प्रमाणात उल्लंघन केल्याचे…

A Global Torchbearer of Digital Transformation in the Sugar Industry

Rajendra Gangarde, Founder- Vishwaguru Infotech

I recently had the opportunity to speak at a state-level conference jointly organized by the Padma Shri Dr. Vitthalrao Vikhe Patil Chair of Cooperation and the Department of Commerce, Savitribai Phule Pune University, on the theme “Economic Pathways for the…

साखर कारखान्यांच्या डिजिटायझेशनचा *विश्वगुरू*

Vishwaguru Infotech Pune, all IT solutions

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकार अध्यासन व वाणिज्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय परिषद साखर उद्योगाच्या उत्कर्षासाठी अर्थकारणाची दिशा या विषयावर नुकतीच बोलण्याची संधी मिळाली. हा माझ्यासाठी केवळ सन्मान नव्हता, तर हृदयाला स्पर्श करणारा…

सरासरी ८.७५ टक्के उताऱ्याने ४९ लाख टन साखर उत्पादन

Sugar Production

राज्यातील ५६२ लाख टन ऊसाचे गाळप पूर्णअहिल्यानगर/सुखदेव फुलारीमहाराष्ट्र राज्यात ऊस गाळप हंगामाने जोर पकडला असून साखर आयुक्तालया तर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, राज्यातील ९७ सहकारी व ९८ खाजगी अशा एकूण १९५ साखर कारखान्यांनी यंदाच्या गळीत हंगामात ३१ डिसेंबर २०२५ अखेर एकूण…

गेवराईतील कृषीप्रदर्शन शेतकऱ्यांच्या आर्थिक क्रांतीचा मार्ग : बोत्रे-पाटील

Omkar Sugar Mills Group

गेवराई(बीड) : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून शेतीत उत्पादन वाढवावे आणि आर्थिक प्रगती साधावी, या उद्देशाने आयोजित केलेले कृषी प्रदर्शन अत्यंत स्तुत्य आहे. गेल्या १८ वर्षांच्या सातत्यामुळे या भागातील शेतीत मोठे सकारात्मक बदल झाले आहेत, असे प्रतिपादन ओंकार उद्योग…

हुतात्मा साखर कारखान्यामध्ये भरती

vsi jobs sugartoday

सांगली : पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्यामध्ये साखर व आसवणी प्रकल्पासाठी खालील जागा त्वरित भरावयाच्या आहेत. त्‍यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत दैनिक गाळप क्षमता ५००० मे. टन साखर कारखाना व ३० केएलपीडी डिस्टीलरी प्रकल्पामधील सदर…

Select Language »