ब्लॉग

A Global Torchbearer of Digital Transformation in the Sugar Industry

Rajendra Gangarde, Founder- Vishwaguru Infotech

I recently had the opportunity to speak at a state-level conference jointly organized by the Padma Shri Dr. Vitthalrao Vikhe Patil Chair of Cooperation and the Department of Commerce, Savitribai Phule Pune University, on the theme “Economic Pathways for the…

साखर कारखान्यांच्या डिजिटायझेशनचा *विश्वगुरू*

Vishwaguru Infotech Pune, all IT solutions

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकार अध्यासन व वाणिज्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय परिषद साखर उद्योगाच्या उत्कर्षासाठी अर्थकारणाची दिशा या विषयावर नुकतीच बोलण्याची संधी मिळाली. हा माझ्यासाठी केवळ सन्मान नव्हता, तर हृदयाला स्पर्श करणारा…

सरासरी ८.७५ टक्के उताऱ्याने ४९ लाख टन साखर उत्पादन

Sugar Production

राज्यातील ५६२ लाख टन ऊसाचे गाळप पूर्णअहिल्यानगर/सुखदेव फुलारीमहाराष्ट्र राज्यात ऊस गाळप हंगामाने जोर पकडला असून साखर आयुक्तालया तर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, राज्यातील ९७ सहकारी व ९८ खाजगी अशा एकूण १९५ साखर कारखान्यांनी यंदाच्या गळीत हंगामात ३१ डिसेंबर २०२५ अखेर एकूण…

ऊसतोड मजुरांच्या झोपड्या जळून खाक; अडीच लाखांचे नुकसान

सांगली(वाळवा) : वाळवा तालुक्यातील शिगाव येथे असलेल्या ऊसतोड मजुरांच्या वस्तीला शुक्रवारी भीषण आग लागली. या आगीत सुमारे २० झोपड्या पूर्णपणे जळून खाक झाल्या असून, मजुरांचे संसार उघड्यावर आले आहेत. सुदैवाने, सर्व मजूर ऊसतोडीसाठी शेतात गेलेले असल्याने मोठी जीवितहानी टळली. आगीमध्ये मजुरांचे…

माणगंगा कारखान्यात चोरीचा प्रयत्न; सुरक्षा रक्षकावर हल्ला

सांगली : आटपाडी तालुक्यातील सोनारसिद्धनगर येथील माणगंगा सहकारी साखर कारखान्यात २७ डिसेंबरच्या मध्यरात्री चोरीचा मोठा प्रयत्न उघडकीस आला आहे. चोरट्यांनी कारखान्यातील सुमारे १२ लाख रुपये किमतीच्या इलेक्ट्रिक मोटारी चोरून नेण्याचा प्रयत्न केला, तसेच यावेळी सुरक्षा रक्षकावर हल्लाही केला. आटपाडी पोलिसांनी तातडीने…

राजकारण बाजूला ठेवून जपली माणुसकी! ऊसतोड कामगारांना सभापतींचा आधार

Helping Hand

पुणे/खेड: राजकारणात केवळ मतांचे गणित न पाहता माणुसकीला प्राधान्य देत खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे पाटील यांनी एका ऊसतोड मजूर कुटुंबाला मदतीचा हात दिला आहे. खेड तालुक्यातील मरकळ येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन बैल गमावलेल्या परजिल्ह्यातील मजुरांना शिंदे…

केन ॲग्रो कारखान्याकडून १८.८३ कोटींची थकबाकी वसूल

सांगली : कर्जवसुलीसाठी संघर्ष करणाऱ्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. कडेगाव येथील केन ॲग्रो एनर्जी (इंडिया) लि. साखर कारखान्याने आपल्या थकीत कर्जाचा पहिला हप्ता १८ कोटी ८३ लाख रुपये व्याजासह बँकेत जमा केला आहे. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने (NCLT)…

गेवराईतील कृषीप्रदर्शन शेतकऱ्यांच्या आर्थिक क्रांतीचा मार्ग : बोत्रे-पाटील

Omkar Sugar Mills Group

गेवराई(बीड) : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून शेतीत उत्पादन वाढवावे आणि आर्थिक प्रगती साधावी, या उद्देशाने आयोजित केलेले कृषी प्रदर्शन अत्यंत स्तुत्य आहे. गेल्या १८ वर्षांच्या सातत्यामुळे या भागातील शेतीत मोठे सकारात्मक बदल झाले आहेत, असे प्रतिपादन ओंकार उद्योग…

हुतात्मा साखर कारखान्यामध्ये भरती

vsi jobs sugartoday

सांगली : पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्यामध्ये साखर व आसवणी प्रकल्पासाठी खालील जागा त्वरित भरावयाच्या आहेत. त्‍यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत दैनिक गाळप क्षमता ५००० मे. टन साखर कारखाना व ३० केएलपीडी डिस्टीलरी प्रकल्पामधील सदर…

ऊसतोडीसाठी आलेल्या परप्रांतीय अल्पवयीन मुलींवर अत्याचार

बीड : जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. ऊसतोडणीसाठी छत्तीसगड राज्यातून आलेल्या दोन अल्पवयीन मुलींवर स्थानिक नराधमांनी अत्याचार केल्याची घटना माजलगाव ग्रामीण परिसरात  २४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ च्या सुमारास घडली आहे. या…

गुड न्यूज! साखर उत्पादनात महाराष्ट्र देशात पुन्हा अव्वल

sugar production increase

नवी दिल्ली : चालू गळीत हंगामात महाराष्ट्राने साखर उत्पादनात देशात आघाडी घेतली असून, ३१ डिसेंबर २०२५ अखेर राज्याने ४९ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. यंदा देशातील एकूण साखर उत्पादन तब्बल ३५० लाख टनांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज असून, उत्तर प्रदेश  हे ३५…

अरे माणसा माणसा

aher poem

अरे माणसा माणसा |जै डोंबारी तारेवर||तै समतोल नजर|मग मिळेल भाकर||१|| अरे माणसा माणसा|खोटं कधी बोलू नये||सुगरणीच्या घरट्याला|खोपा, कधी म्हणू नये||२|| अरे माणसा माणसा|निसर्गाची कला न्यारी||जरि शेंग ती काटेरी| सागरगोटे अंतरी||३|| अरे माणसा माणसा|माझ्या जीवाचा मैतरं||आहे मोठा जादूगार|त्यांवर माझी मदार||४|| अरे माणसा…

कार्यातून तळपणारा ‘भास्कर’!

Bhaskar Ghule Birthday Article

विविध पुरस्कारांनी गौरवलेला आणि महाराष्ट्रातील प्रसिद्ध सहकारी साखर कारखाना म्हणजे श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना…. या कारखान्याचे अष्टपैलू कार्यकारी संचालक अर्थात एमडी श्री. भास्करराव घुले यांचा 1 जानेवारी रोजी वाढदिवस. प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात, पण घुले यांना खडतर आव्हाने पेलणे…

साखर कारखाना हे शेती संस्कृतीचे आधुनिक रूप : इंद्रजित भालेराव

मंगळवेढा: “माणसाने शिकारीऐवजी पेरून खाण्याची सुरुवात केली, तेव्हापासून शेती संस्कृतीचा खऱ्या अर्थाने उदय झाला. आजच्या काळात साखर कारखाना हे या प्राचीन शेती संस्कृतीचेच आधुनिक रूप आहे,” असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक व व्याख्याते इंद्रजित भालेराव यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषद (मसाप) मंगळवेढा शाखेच्या वतीने…

सोलापूर जिल्ह्यात ऊसदराचा नवा विक्रम!

sugarcane FRP

२३ कारखान्यांकडून ३,००० रुपयांपेक्षा जास्त पहिली उचल जाहीर सोलापूर: जिल्ह्याच्या साखर उद्योगाच्या इतिहासात यंदाचा गाळप हंगाम ऐतिहासिक ठरत आहे. जिल्ह्यातील तब्बल २३ साखर कारखान्यांनी ३,००० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेची ‘पहिली उचल’ जाहीर करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. जिल्ह्यात…

ओव्हरलोड ऊस वाहतुकीला आळा घाला, अन्यथा कारखान्यांवर कारवाई

Sugarcane Crushing

अहिल्यानगर : जिल्ह्यातील धोकादायक आणि ओव्हरलोड ऊस वाहतुकीमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी साखर कारखानदारांना कठोर इशारा दिला आहे. “ओव्हरलोड वाहतुकीला प्रोत्साहन देणाऱ्या कारखान्यांनाही आता जबाबदार धरले जाईल,” असे स्पष्ट करत त्यांनी तातडीने सुधारणा करण्याचे आदेश दिले आहेत.…

साखर उद्योगः शिष्टमंडळ जाणार केंद्रीय सहकारमंत्र्यांच्या भेटीला!

Amit Shah at NCDC

पुणे : साखरेसह या उद्योगाबाबतच्या अनेक प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी आणि त्यावर अनुकूल निर्णय घेण्यासाठी एक शिष्टमंडळ लवकरच दिल्लीला जाणार आहे. हे शिष्टमंडळ केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांना भेटणार असून, ते याबाबत सविस्तर चर्चा करणार आहेत, अशी माहिती व्हीएसआयचे अध्यक्ष खासदार…

पुणे जिल्‍ह्यातील पारगावमध्ये एका उसाला तब्बल ४३ कांडे

जुन्नर (पुणे ) : जुन्नर तालुक्यातील पारगावतर्फे आळे येथील प्रगतशील शेतकरी विक्रम तट्टू यांनी ऊस शेतीत नवा आदर्श निर्माण केला आहे. आपल्या ३ एकर शेतात त्यांनी ८६०३२ जातीच्या आडसाली उसाचे भरघोस उत्पादन घेतले असून, एका उसाची लांबी तब्बल ४३ कांड्यांपर्यंत पोहोचली…

चंदगडमध्ये ऊसउत्पादकांची ३० कोटींची लूट; ‘स्वाभिमानी’ आक्रमक

चंदगड: ऊसतोडणी आणि वाहतुकीच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून बेकायदेशीरपणे वसूल केली जाणारी ‘खुशाली’ थांबवावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चंदगड तालुक्यातील कारखान्यांना इशारा दिला आहे. या लुटीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी सुमारे ३० कोटी रुपयांचा फटका बसत असल्याचा खळबळजनक आरोप संघटनेने केला आहे.…

राज्यातील गाळप हंगाम अपडेट्‌स!

sugar industry new rules

पुणे : चालू गाळप हंगाम २०२५-२६ मधील महाराष्ट्रातील नोंदणीकृत साखर कारखान्यांचा २६ डिसेंबर २०२५ अखेरचा विभागनिहाय प्राप्त गाळप अहवाल खालीलप्रमाणे…..

आर्थिक शिस्तीत ‘नॅचरल शुगर’ अव्वल

natural sugar

व्हीएसआयचा सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन’ पुरस्कार जाहीर धाराशिव: रांजणी (ता. कळंब) येथील नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज या साखर कारखान्याने २०२३-२४ या वर्षासाठीचा मानाचा ‘(कै.) कर्मयोगी शंकररावजी पाटील सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार’ पटकावला आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटतर्फे (VSI) सोमवारी (२९ डिसेंबर) होणाऱ्या वार्षिक सभेत हा पुरस्कार…

उसाची काटामारी, अपघात रोखण्यासाठी यूपी सरकार ॲक्शन मोडवर; नवे नियम लागू 

लखनऊ : उत्तर प्रदेशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक थांबवण्यासाठी आणि वाहतुकीदरम्यान होणारे अपघात टाळण्यासाठी राज्य सरकारने नुकतीच कडक पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस खरेदी आणि वाहतुकीबाबत नियमावली अधिक कडक करण्यात आली आहेत. काय आहेत नवे कडक नियम?…

ऊस व्यवस्थापन मेळाव्यास शेतकऱ्यांचा प्रतिसाद

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास ऊस शेती फायदेशीर ः  माजी आमदार धोंडे बीड : आष्टी तालुक्यातील कडा येथील महेश सहकारी साखर कारखान्याच्या वतीने आयोजित केलेल्या ‘योग्य ऊस व्यवस्थापन’ या विषयावरील भव्य मेळाव्यास शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. या मेळाव्याला माजी आमदार…

पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक उतारा कोल्हापूर विभागाचा

Sugar Market

पुणे : ऊस गाळप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटून गेला असून, पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक उतारा कोल्हापूर विभागाचा आहे. निव्वळ साखर उतारा ही ९.६५ इतके असून, तुलनेने सर्वाधिक साखर कारखाना असलेल्या सोलापूर जिल्ह्यात मात्र सरासरी उताराही ९ टक्क्याच्या खाली आहे.…

Select Language »